शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळासाठीच्या क्षेत्रातच मोठी घट; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:48 IST

- गावठाणे जात नसल्याचा दावा, पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न

 पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पूर्वी निर्धारित करण्यात आलेले २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे क्षेत्र कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात एकही गाव जात नाही. तरीदेखील बाधित शेतकऱ्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल. त्यांच्यासाठी अन्य ठिकाणी शेती आणि घरांची व्यवस्था करण्यात येईल. शक्यतो हे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करण्याचा विचार आहे. बाधितांना योग्य तो मोबदला दिला जाईल, त्यांना वाऱ्यावर सोडण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पुरंदरविमानतळासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांना विश्वास घेऊनच पुढील शंभर वर्षांचा विचार करून हे विमानतळ उभारले जात आहे. सध्याचे लोहगाव येथील विमानतळ संरक्षण विभागाच्या अखत्यारित असल्याने येथे अनेक मर्यादा येत आहेत. त्यामुळे सर्वेक्षणातून सासवड येथील जागा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निश्चित करण्यात आली आहे. या विमानतळाच्या भूसंपादनासाठी सुरुवातीला सात गावांमधील सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे ठरले होते. मात्र, यात आता मोठी कपात करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यात आता एकही गावठाण प्रकल्पात जात नसल्याने बाधितांचे पुनर्वसन आहे, त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे.

या शेतकऱ्यांना इतर ठिकाणी शेती करता येईल, असेदेखील नियोजन करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील हे सर्व ग्रामस्थ आमचे लोक आहेत. त्यांनी या प्रकल्पाबाबत कोणताही गैर अर्थ काढू नये. परिसराच्या दृष्टिकोनातून विमानतळाची जागा योग्य आहे. हे विमानतळ होणार असून, बाधित शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. या ठिकाणी दोन धावपट्ट्यांचे विमानतळ उभारण्यात येणार असून, येथे कार्गो हब आणि आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत वाहतूक केली जाणार आहे. पुढील १०० वर्षांचा विचार करण्यात आला आहे. पुण्यासह अहिल्यानगर, सातारा, सांगली कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांसाठी हे विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून सुरू असलेल्या भूसंपादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवेशन काळात यासंबंधी बैठकीही झाल्या आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सध्याचे पुण्याचे विमानतळ संरक्षण विभागाच्या अखत्यारीत येते व ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. पंतप्रधानांनी ५०० कोटी खर्च करून नव्या टर्मिनलचे काम पूर्ण केले आहे. मात्र, संरक्षण विभागाच्या अटी-शर्तींमुळे तेथे वेळोवेळी अडचणी येतात. विमान उड्डाणासाठी वेळेची मर्यादा येत आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेता आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक त्या सुविधा असलेले स्वतंत्र विमानतळ आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPurandarपुरंदरAirportविमानतळ