शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांमुळे पुराच्या पाण्याला अडथळा; खटकेवस्ती ग्रामस्थांची चारी काढण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:56 IST

- रस्त्याच्या बाजूपट्टीवर मुरूम टाकून व शेततळे बांधून पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण करण्यात आला आहे.

इंदापूर : शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे पावसाचे व पुराचे पाणी वाहून जाण्यास मार्ग उरला नसल्याने पोलिस बंदोबस्तात रस्त्याच्या दुतर्फा चारी काढण्यात याव्यात, अशी मागणी कळस गाव परिसरातील बागवाडी खटकेवस्ती येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि देसाई इन्फ्रा कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, कळस गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या खटकेवस्ती भागातून डाळज-कळस-जंक्शन-वालचंदनगर-दहीवडी-नातेपुते-कराड या रस्ता सुधारणा प्रकल्पाचे काम करण्यात आले. हे काम देसाई इन्फ्रा कंपनीने नुकतेच पूर्ण केले आहे.

ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या दत्तात्रय विष्णू ओमासे आणि कांताबाई सखाराम खटके यांच्या शेतांलगतच्या भागात चारी काढण्यात आलेल्या नाहीत. तसेच रस्त्याच्या बाजूपट्टीवर मुरूम टाकून व शेततळे बांधून पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण करण्यात आला आहे.

पूर्वीपासून असलेल्या ओढ्यावर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने उभारलेला पूलही मुरूम टाकून बंद करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात ओढ्याला पूर आल्यानंतर पाणी थेट घरांमध्ये शिरत असून आर्थिक नुकसानीबरोबरच जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

धनाजी आण्णा खटके, ज्ञानदेव संपत खटके, महादेव पिराजी खटके, विठ्ठल पांडुरंग खटके, आण्णा शंकर खटके, वामन मारुती खटके, अंबादास आण्णा खटके आणि संभाजी पिराजी खटके यांच्या सह्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

धनाजी खटके म्हणाले, “अतिक्रमणांमुळे पावसाचे व पुराचे पाणी वाहून जाण्यास मार्ग राहिलेला नाही. मागील पावसाळ्यात संपूर्ण खटकेवस्तीतील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्याचे पंचनामेही झाले आहेत. रस्त्याच्या उत्तरेकडील घरे पूर्णपणे रस्त्यालगत असून, अतिक्रमण न काढताच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पूल बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कालव्यातून ५० ते ६० ट्रॉली मुरूम आणण्यात आल्याची चौकशी व्हावी.”

English
हिंदी सारांश
Web Title : Encroachments Block Floodwater; Villagers Demand Drainage in Khatkevasti.

Web Summary : Khatkevasti villagers demand drainage due to encroachments blocking floodwater passage after road construction. They allege blocked waterways cause flooding, damaging homes. Authorities are urged to address encroachments and restore natural drainage.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा