शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
2
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
3
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
4
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
5
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
6
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
7
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
8
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
9
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
10
२०२५ शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ राजयोग, बाप्पा ११ राशींना मागा ते देईल; हवे ते घडेल, शुभ होईल!
11
"मला सवत आणलीस...", निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत
12
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
13
AUS vs ENG 2nd Test : आधी गोलंदाजीत कहर! मग अर्धशतकी खेळीसह मिचेल स्टार्कनं केली विक्रमांची 'बरसात'
14
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
15
डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
16
Psycho Killer Poonam: "जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान
17
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
18
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
19
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
20
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकाच्या मृत्यूसंबंधी सरकारच्या निष्काळजीपणाविरुद्ध मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 17:38 IST

- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी ही तक्रार कायदेशीर मानवाधिकार आयोगाकडे केली

पुणे :मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आंदोलकाचा मृत्यू झाला. यामध्ये सरकारचा निष्काळजीपणा आहे. त्यामुळे त्याविरुद्ध राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी ही तक्रार कायदेशीर मानवाधिकार आयोगाकडे केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान शनिवारी (दि. ३०) आझाद मैदान, मुंबई येथे अहमदपूर तालुक्यातील (जि. लातूर) विजय घोगरे यांचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात ही तक्रार ॲड. मनोज आखरे यांनी ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्या मार्फत केली आहे. तक्रारीत नमूद आहे की, शासन आणि प्रशासन आंदोलनादरम्यान पिण्याचे पाणी, शौचालय व स्वच्छता सुविधा, वैद्यकीय मदत व ॲम्ब्युलन्स सेवा, पावसापासून किंवा इतर हवामानापासून संरक्षण, विजेची व अन्य मूलभूत सुविधा अशा आवश्यक सुविधा पुरविण्यास अपयशी ठरले. महाराष्ट्र सरकारला व प्रशासनाला आंदोलनाची अगोदरच माहिती होती तसेच मुंबई उच्च न्यायालयात परवानगीसाठी अर्जही होता. तरीही, सरकारकडून आंदोलनकर्त्यांचे आरोग्य आणि सुरक्षेची योग्य खबरदारी घेतली गेली नाही. यामुळे घटनेतील कलम २१ नुसार (जीवनाचा अधिकार) कलम २१ची स्पष्ट हानी झाली असून, राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी मृत्यू घडला आहे.

कै. घोगरे यांच्या मृत्यूच्या परिस्थितीची सखोल चौकशी केली जावी. जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय कारवाई केली जावी. मृतकांच्या कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई / आर्थिक मदत दिली जावी. भविष्यातील आंदोलनादरम्यान, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पाणी, शौचालय, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा तत्काळ उपाय अनिवार्य करण्यात यावेत, अशा मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत. ही तक्रार सामाजिक न्यायासाठी दाखल करण्यात आली असून, महाराष्ट्र सरकार व प्रशासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा आणि घटनेतील कलम २१ च्या उल्लंघनासाठीची जबाबदारी घ्यावी, अशी विनंती या याचिकेत आयोगाकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Reservationमराठा आरक्षण