शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
4
भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व! मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
5
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
6
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
7
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
8
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
9
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
10
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
11
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
12
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
13
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
14
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
15
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
16
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
17
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
18
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
19
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
20
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!

आंदोलकाच्या मृत्यूसंबंधी सरकारच्या निष्काळजीपणाविरुद्ध मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 17:38 IST

- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी ही तक्रार कायदेशीर मानवाधिकार आयोगाकडे केली

पुणे :मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आंदोलकाचा मृत्यू झाला. यामध्ये सरकारचा निष्काळजीपणा आहे. त्यामुळे त्याविरुद्ध राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी ही तक्रार कायदेशीर मानवाधिकार आयोगाकडे केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान शनिवारी (दि. ३०) आझाद मैदान, मुंबई येथे अहमदपूर तालुक्यातील (जि. लातूर) विजय घोगरे यांचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात ही तक्रार ॲड. मनोज आखरे यांनी ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्या मार्फत केली आहे. तक्रारीत नमूद आहे की, शासन आणि प्रशासन आंदोलनादरम्यान पिण्याचे पाणी, शौचालय व स्वच्छता सुविधा, वैद्यकीय मदत व ॲम्ब्युलन्स सेवा, पावसापासून किंवा इतर हवामानापासून संरक्षण, विजेची व अन्य मूलभूत सुविधा अशा आवश्यक सुविधा पुरविण्यास अपयशी ठरले. महाराष्ट्र सरकारला व प्रशासनाला आंदोलनाची अगोदरच माहिती होती तसेच मुंबई उच्च न्यायालयात परवानगीसाठी अर्जही होता. तरीही, सरकारकडून आंदोलनकर्त्यांचे आरोग्य आणि सुरक्षेची योग्य खबरदारी घेतली गेली नाही. यामुळे घटनेतील कलम २१ नुसार (जीवनाचा अधिकार) कलम २१ची स्पष्ट हानी झाली असून, राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी मृत्यू घडला आहे.

कै. घोगरे यांच्या मृत्यूच्या परिस्थितीची सखोल चौकशी केली जावी. जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय कारवाई केली जावी. मृतकांच्या कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई / आर्थिक मदत दिली जावी. भविष्यातील आंदोलनादरम्यान, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पाणी, शौचालय, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा तत्काळ उपाय अनिवार्य करण्यात यावेत, अशा मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत. ही तक्रार सामाजिक न्यायासाठी दाखल करण्यात आली असून, महाराष्ट्र सरकार व प्रशासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा आणि घटनेतील कलम २१ च्या उल्लंघनासाठीची जबाबदारी घ्यावी, अशी विनंती या याचिकेत आयोगाकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Reservationमराठा आरक्षण