शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीत मुबलक पाणी… पण वीज रात्रीची..! शिरूर तालुक्यातील शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:01 IST

अवकाळी पाऊस, रोगराई, बाजारभावाचा अभाव आणि आता रात्रीचा वीजपुरवठा या सर्व संकटांनी शेतकरी कोलमडून गेले आहेत. ‘पाणी आहे… पण वीज नाही!’ अशी हाक शेतकऱ्यांच्या तोंडी ऐकू येत आहे.

रांजणगाव सांडस : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणाऱ्या भीमा–मुळा–मुठा नद्यांत पाणी मुबलक असतानाही विजेच्या अनियमित पाळीमुळे या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळत नाही. अवकाळी पाऊस, रोगराई, बाजारभावाचा अभाव आणि आता रात्रीचा वीजपुरवठा — या सर्व संकटांनी शेतकरी कोलमडून गेले आहेत. ‘पाणी आहे… पण वीज नाही!’ अशी हाक शेतकऱ्यांच्या तोंडी ऐकू येत आहे.

भीमा नदीकाठच्या बहुतांश गावांना ग्रामस्थांच्या मागणीमुळे दिवसा वीज उपलब्ध केली जाते. मात्र आलेगाव पागा, राक्षेवाडी, रांजणगाव, सांडस परिसरातील पठारे, शिंदे, कोळपे वस्ती, शितोळे, बारवकर, दुबे वस्ती या भागांना रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेतच थ्री-फेज वीज दिली जाते. बिबट्यांचा वावर असल्याने या वेळेत शेतात जाणे धोकादायक ठरते. त्यामुळे शेतकरी रात्रीच पाणी सोडून ठेवतात आणि पहाटे महिला मजुरांना घेऊन कांदालागवड करत आहेत.

दिवसा आठ तास वीज असली तरी ती वारंवार खंडित होते. परिणामी मोटर बंद पडणे, पाइपलाइनला गळती लागणे या समस्यांवर अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. भीमा नदीवरील बंधारे तुडुंब भरलेले असतानाही विजेच्या अनियमित पाळीमुळे पाणी शेतीपर्यंत पोहोचत नाही.

आर्थिक गणित बिघडले

अवकाळी पावसामुळे अनेकांचे काढणीला आलेले कांदापीक पाण्यातच गेले. वखारीतील थोडाफार साठाही खराब झाला. यामुळे कांदा उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शासनाने पंचनामे केले असले तरी अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यात मदत जमा झालेली नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. 

तालुक्यातील जवळपास सर्व गावांना दिवसा वीज मिळते. मग रांजणगाव सांडस–राक्षेवाडी भागालाच रात्रीची पाळी का? वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एक दिवस तरी शेतकऱ्यांबरोबर रात्री लागवड करून पाहावी. - रोहिणी काळभोर, ग्रामपंचायत सदस्या  

खर्च करून पीक घेतो, पण वीज अनियमित, बाजारभाव नाही; अशा परिस्थितीत शेतकऱ्याचा संसार कसा चालणार? - सतीश राक्षे-पाटील, कांदा उत्पादक.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhima River Full, But Night Power Plagues Shirur Farmers

Web Summary : Despite ample water in the Bhima River, Shirur farmers struggle with irregular, nighttime electricity. Crop loss from unseasonal rain, disease, and poor market prices exacerbate their woes. Farmers are forced to irrigate at night, facing dangers from wildlife.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAgriculture Schemeकृषी योजना