शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे : अतिवेगाला आवर घातल्याने घटले अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 6:43 AM

तीन वर्षांत अपघातांची संख्या कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३६० असणारी संख्या ३०६ पर्यंत खाली आली आहे. तर अमृतांजन पूल खंडाळा ते बोरजदरम्यान अपघातांची संख्या निम्म्याने घटली आहे.

- हणमंत पाटील/ विशाल विकारी लोणावळा (पुणे) : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचेप्रमाण घटले आहे. तीन वर्षांत अपघातांची संख्या कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३६० असणारी संख्या ३०६ पर्यंत खाली आली आहे. तर अमृतांजन पूल खंडाळा ते बोरजदरम्यान अपघातांची संख्या निम्म्याने घटली आहे.पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामागावर अपघाताचे प्रमाण वाढल्याने वेगाला आवर घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली होती. तसेच अपघातांची ठिकाणे शोधून उपाययोजना केल्या होत्या. त्याचा परिणाम गेल्या तीन वर्षांत अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.४७ हजार वाहनांवर कारवाईवाहतुकीचे नियम मोडत वेगाने वाहने चालविणे, लेन कटिंग असे प्रकार करणाºया तब्बल ४७ हजार ४९३ वाहनांवर दोन वर्षांत खंडाळा महामार्ग पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून ६२ लाख ८० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. २०१८ मध्ये द्रुतगती मार्गावर अमृतांजन पूल ते मळवली बोरजदरम्यान ५१ अपघात झाले होते. २०१९ मध्ये ही संख्या घटून ३२ झाली आहे. तर मागील दोन महिन्यांत केवळ एक अपघात झाला आहे.वेगावर नियंत्रण महत्त्वाचेसततची पेट्रोलिंग, वेगमर्यादा व लेन कटिंगचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईमुळे अपघातांचे प्रमाण घटले आहे.वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास व लेन कटिंगचा मोह टाळल्यास अपघातांचे प्रमाण निश्चित मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे खंडाळा महामार्गाचे सहायकपोलीस निरीक्षक प्रशांत मंडले यांनी सांगितले.द्रुतगती महामार्गावरील अपघात कमी करण्यासंदर्भात २०१८ पासून उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू केल्याने वाहनांची वेग मर्यादा ताशी शंभरवर आणण्यात यश आले आहे. त्यामुळे भरधाव वेगामुळे अपघात कमी झाले आहे.-मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा 

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेAccidentअपघात