सर्वाधिक ६ लातूर विभागात, अमरावती ५; बारावीच्या पेपरला कॉपीच्या २० घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 11:54 IST2026-02-22T11:50:25+5:302026-02-22T11:54:17+5:30
यात सर्वाधिक ६ लातूर विभागात, अमरावती ५, छत्रपती संभाजीनगर ४, नागपूर ३ आणि पुणे व मुंबई विभागात प्रत्येकी १ घटना घडली आहे. अन्य विभागात काॅपीचा प्रकार घडलेला नाही.

सर्वाधिक ६ लातूर विभागात, अमरावती ५; बारावीच्या पेपरला कॉपीच्या २० घटना
पुणे : दहावीच्या परीक्षेत शनिवारी काॅपीचा एकही प्रकार घडला नाही, तर बारावीच्या पेपरला सकाळच्या सत्रात २० प्रकार घडले आहेत. दुपारच्या सत्रात मात्र एकही प्रकार घडलेला नाही. यावरून बारावीच्या गणित आणि संख्याशास्त्र या विषयाला काॅपी करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. यात सर्वाधिक ६ लातूर विभागात, अमरावती ५, छत्रपती संभाजीनगर ४, नागपूर ३ आणि पुणे व मुंबई विभागात प्रत्येकी १ घटना घडली आहे. अन्य विभागात काॅपीचा प्रकार घडलेला नाही.
दहावीसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम विषयाचा पेपर हाेता, जाे निरंक राहिला आहे. त्याचबराेबर बारावीचा दुपारच्या सत्रातील तालवाद्य विषयाचा पेपरदेखील निरंक राहिला. काॅपीचे प्रकार फक्त बारावीच्या परीक्षेत आणि सकाळच्याच सत्रात घडले आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
---------
शनिवारी घडलेली विभागनिहाय काॅपी प्रकरणे
विभागीय मंडळ - दहावी - बारावी (सकाळच्या सत्रात काॅपीचे २० प्रकार घडले).
पुणे - निरंक - ०१
नागपूर - निरंक - ०३
छत्रपती संभाजीनगर - निरंक - ०४
मुंबई - निरंक - ०१
कोल्हापूर - निरंक - निरंक
अमरावती - निरंक - ०५
नाशिक - निरंक - निरंक
लातूर - निरंक - ०६
कोकण - निरंक - निरंक
एकूण - निरंक - २०
-------------