शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

गेल्या 70 वर्षात गरिबी गेली नाही, आता काय घालवणार ; साेशल मीडियावर पुणेकरांची मतमतांतरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 11:45 AM

राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदींनी 2014 च्या निवडणुकीच्या प्रचारात सत्तेत आल्यास प्रत्येकाच्या खातात 15 लाख जमा करण्याचे आश्वासन दिले हाेते. गेल्या पाच वर्षांमध्ये काेणाच्याच खात्यात 15 लाख जमा न झाल्याने माेदींना त्यांच्या घाेषणेवरुन वेळाेवेळी घेरण्यात आले. आता राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. यातून गरिबी हटावचा नारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी साेशल मिडीयावर ट्राेल केले जात आहेत. यात पुणेकर आघाडीवर असून गेल्या 70 वर्षात गरिबी घालवू शकला नाहीत तर आता काय घालवणार असा प्रश्न विचारला जात आहे. 

काँग्रेसनं पुन्हा एकदा 'गरिबी हटाव'चा नारा दिला आहे. दुपारी राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्तेस आल्यास गरिब कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ श्रीमंत उद्योगपतींना मदत करतात. मात्र आम्ही गरिबांना मदत करणार आहोत, असेही ते पत्रकार परिषदेत म्हंटले. काँग्रेसचं सरकार आल्यावर गरिबांना न्याय मिळेल, असंही ते म्हणाले. 

यावर राहुल गांधी आता साेशल मीडियावर चांगलेच ट्राेल हाेत आहेत. गेल्या 70 वर्षात काॅंग्रेस गरिबी घालवू शकली नाही आणि आता निवडणुकींच्या ताेंडावर अशी विधाने करणे बराेबर नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे हे 75 हजार नागरिकांच्या करातूनच दिले जाणार आहेत. म्हणजे नागरिकांना लुबाडण्याचा हा प्रकार असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. गरिबांना पैसे नकाे तर त्यांच्या हाताला काम द्या असा सूर देखील उमटताना दिसत आहे. 70 वर्षात गरिबी हटली नाही आता हे मान्य करा आणि लाेकांच्या हाताला काम द्या अशी मागणी केली जात आहे.  

  साेशल मिडीयावर राहुल गांधींच्या बातमीवर उमटलेल्या प्रतिक्रीया 

- गडबड करू नका. आधी मोदींनी दिलेले 15 लाख तरी संपू द्या, मग तुमचे घेऊ ! 

- अशाने लोक तुझ्यासारखेच रिकामटेकड होतील ,काम करण्याच सोडून देतील.

- गरीबाला फुकट काही देऊ नका त्याच्या हाताला रोजगार द्या ,

- सरकार कोणतेही असो या फुकट च्या योजना सगळ्या बंद करा या मुळे तरुण पिढी व्यसनाधीन आणि आळशी बनत आहे.

- 1971 मध्ये इंदीराजी गांधी ने गरीबी हटाव चा नारा दिला होता.परंतु आज पर्यंत गरीबी हटली नाही।निवडणुकीत मतदानासाठी ही फसवी घोषणा केली आहे. जनता यात फसणार नाही.

- आधी इतके वर्ष सत्ता भोगली तेव्हा तुम्ही लोकांच्या गरजा पूर्ण नाही केल्या आता परत सत्ता मिळविण्यासाठी लोकांना मुर्ख बनवत आहेत.

- गरीबी हटाव मोहिम 60 वर्षा पासून सुरु आहे आणि आज पुन्हा हाच मुद्धा घेऊन तुम्ही इलेक्शन मध्ये यायले लाजा वाटतात का काँग्रेस ल. चार पिढ्या तुमच्या हाच मुद्दा जनता काय येडी नाही आत्ता.

- 70 वर्षात गरिबी हटली नाही, हे तर मान्य करा आता. गरिबांना हाताला कामं द्या त्यालाही तुमच्या घोषणांचा वीट आला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPuneपुणेcongressकाँग्रेसSocial Mediaसोशल मीडिया