शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वैमानिकाचे करावे तेवढे कौतुक कमीच! ताशी २२२ किमी. वेग असताना टळला विमानाचा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 20:53 IST

उड्डाणावेळी धावपट्टीवर आली जीप : १८० प्रवासी होते विमानात 

ठळक मुद्दे विमानाचा खालचा भाग धावपट्टीला घासून गेल्याने विमानाचे नुकसान जवळपास ताशी २२२ किमी असल्याने शक्य नव्हते विमान थांबविणे

पुणे : पुणेविमानतळावर एअर इंडियाच्या दिल्लीला जाणाऱ्या विमानातील १८० प्रवासी अपघातातून थोडक्यात बचावले. विमान उड्डाण करताना धावपट्टीवर अचानक जीप आडवी आली. या प्रकारामुळे वैमानिकाने काही अंतर आधीच उड्डाण केले. त्यामुळे विमानाचा खालचा भाग धावपट्टीला घासून गेल्याने विमानाचे नुकसान झाले. दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे विमान उतरल्यानंतर ही बाब लक्षात आली. वैमानिकाने दाखविलेल्या या प्रसंगावधानामुळे विमानतळावर मोठा अपघात टळला. एअर इंडिया कंपनीचे विमान (एआय ८५२) सकाळी ७.५५ वाजता पुणे विमानतळावरून दिल्लीकडे उड्डाण करणार होते. त्यानुसार सुमारे १८० प्रवासी व कर्मचाऱ्यांना घेऊन हे विमान उड्डाणासाठी सज्ज झाले. उपलब्ध माहितीनुसार, धावपट्टीवरून पुढे जात असताना काही अंतरावर एक जीप उभी असल्याचे वैमानिकाचे लक्षात आले. विमानाचा वेग जवळपास ताशी २२२ किमी असल्याने विमान थांबविणे शक्य नव्हते. त्यामुळे नियोजित अंतराआधीच वैमानिकाने तातडीने विमानाचे उड्डाण केले. पण हे विमान धावपट्टीला घासून गेल्याने मागील बाजुचे विमानाचे आवरण निघाले. त्यानंतरर दिल्ली विमानतळावर हे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. वैमानिकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अपघात झाला नाही. हेच विमान पुढे श्रीनगरला जाणार होते. त्याआधी तपासणी करताना विमानाचा खालील भागाला काहीतरी घासल्याचे लक्षात आले. त्यानंतर या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. नागरी विमानवाहतुक महासंचालनालया(डीजीसीए) ने घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी सुरू केली आहे. पुणे विमानतळ हे भारतीय हवाई दलाचे आहे. त्यामुळे या विमानतळावर हवाई दलाच्या नियमित कामे सुरू असतात. त्यामुळे ‘डीजीसीए’ने एअर ट्रॅफिक कंट्रोलचे रेकॉर्डिंग ठेवण्यास सांगितले आहे. तसेच एअर इंडियाकडूनही कॉकपीटमधील ध्वनीमुद्रणही मागविण्यात आले आहे. चौकशीसाठी हे विमान सेवेतून बाहेर काढण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.------------श्रीनगरला उड्डाण करणाºया विमानाच्या मागील बाजुला काही घासल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे विमान चौकशीसाठी सेवेतून बाजुला करण्यात आले आहे. कॉकपीट व्हाईस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि सॉलीड-स्टेट फ्लाईट डाटा रेकॉर्डर (एसएसएफडीआर) द्वारे माहिती मिळविली जाईल. - धनंजय कुमार, प्रवक्ते, एअर इंडिया------------

  धावपट्टीवर विमानाने ठराविक वेग घेतल्यानंतर ते अचानक थांबविणे शक्य नसते. त्यामुळे धावपट्टीवर जीप दिसल्यानंतर वैमानिकाने तातडीने उड्डाण करण्याचा निर्णय घेतला असावा. पण अचानक उड्डाणामुळे विमानाची पुढील बाजु थोडी अधिक वर गेली असेल. त्यामुळे मागील बाजुला धावपट्टीला घासली. वेगात असलेले विमान थांबविण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित विमान जीपला धडकले असते. त्यामुळे वैमानिकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक आहे. पण त्याचवेळी विमान धावपट्टीला घासल्यानंतर ते त्यांच्या लक्षात येणे अपेक्षित होते. कदाचित लक्षात आले असले तरी कोणताही धोका नसल्याने ते दिल्लीपर्यंत नेण्यात आले असावे. पण धावपट्टीवर विमान उड्डाणावेळी अशाप्रकारे जीप येणे, ही बाब खुपच गंभीर आहे. एअर ट्रॅॅफिक कंट्रोलची ही जबाबदारी असून मानवी चुक आहे. याबाबत सखोल चौकशी व्हायला हवी.- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतुक तज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेairplaneविमानAccidentअपघातpilotवैमानिक