शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांच्या भांडणात पादचारी सुरक्षारक्षकाचा मृत्यू, फुरसुंगीत गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 22:34 IST

दोन गटात सुरू असलेल्या भांडणातून झालेल्या गोळीबारात गोळी लागून रस्त्यावरून पायी जाणा-या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. 

पुणे : दोन गटात सुरू असलेल्या भांडणातून झालेल्या गोळीबारात गोळी लागून रस्त्यावरून पायी जाणा-या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. पंचय्या सिद्धय्या स्वामी (वय ५८, रा़ गंगानगर, फुरसुंगी) असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. ही घटना फुरसुंगी गावातील गंगानगर येथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबतची माहिती अशी, पंचय्या स्वामी हे एका सहकारी बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. काम संपवून ते घरी जात होते. त्यांच्या घरापासून काही अंतरावर मयुर गुंजाळ व तेजाब कल्याणी यांच्यामध्ये जुन्या वादातून भांडणे सुरू होती. त्यावेळी तेजाबने आपल्याकडील पिस्तुलातून मयुरच्या दिशेने गोळीबार केला. पण गोळी मयुरला न लागता तेथून जाणाऱ्या पंचय्या स्वामी यांच्या मांडीला दोन गोळ्या लागल्या. ते तेथेच खाली पडले. स्वामी यांना गोळी लागल्याचे पाहताच दोघेही पळून गेले. तेथील नागरिकांनी स्वामी यांना रिक्षात घालून हडपसर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तातडीने त्यांना नोबेल हॉस्पिटलला नेले. परंतु डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अतिरक्तस्त्रावामुळे स्वामी यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.मयुर गुंजाळ आणि तेजाब कल्याणी हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. फुरसुंगीमधील या दोन गटात त्यामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तेथील बंदोबस्तात वाढ केली आहे. गुंजाळ आणि कल्याणी याच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरात झडती घेण्याचे काम सुरू केले आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत. गुन्हेगारीशी कोणताही संबंध नसताना गुन्हेगारांच्या भांडणात एका सुरक्षारक्षकाला मात्र आपला प्राण गमविण्याची पाळी आली.