शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

थरारक! औरंगाबाद दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; अवघ्या १०० मीटर अंतरावर मालगाडी थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 21:36 IST

मजुरांना मालगाडीने चिरडल्याची घटना शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये घडल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी पुण्यात उरळीजवळ 'त्याची' पुनरावृत्ती टळली..

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाकडून या घटनेबाबत अधिकृत माहिती देण्यास असमर्थता अजिबात करून जीव धोक्यात घालू नये, रेल्वे प्रशासनाकडून आवाहन

पुणे : रेल्वेमार्गावर झोपलेल्या १६ मजुरांना मालगाडीने चिरडल्याची घटना शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये घडल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पुण्यात उरळीजवळ त्याची पुनरावृत्ती टळली. चालकाच्या सतर्कतेमुळे रेल्वेमार्गावर बसलेल्या २० लोकांपासून १०० मीटर अंतरावर मालगाडी थांबल्याने मोठा अनर्थ टळला.मध्य प्रदेशच्या दिशेने रेल्वेमार्गावरून निघालेले मजुर शुक्रवारी पहाटे औरंगाबादजवळ मार्गावरच झोपले होते. पहाटेच्या सुमारास आलेल्या मालगाडीने त्यातील १६ जणांना चिरडले. चालकाने हॉर्न वाजवून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. पण वेग जास्त असल्याने थांबेपर्यंत मजुर गाडीखाली आले होते. अशीच घटना शुक्रवारी सायंकाळी उरळी ते लोणी स्टेशनदरम्यान होता होता टळली. ही घटना ताजी असतानाही काही लोक उरळीजवळ मार्गावरच ठाण मांडून बसले होते. उरळीवरून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे निघालेल्या मालगाडी चालकाला काही अंतरावर हे लोक दिसले. त्याने तातडीने हॉर्न वाजवून आपत्कालीन ब्रेक लावला. वेळीच सतर्कता दाखविल्याने ही लोकांपासून १०० मीटर अंतरावरच थांबविली. त्यामुळे त्यावेळी जवळपास २० लोक गाडीखाली येण्यापासून बचावले व मोठी दुर्घटना टळली.चालकाने तातडीने नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळात ट्रॅकवर बसलेल्या लोकांना तिथून हटविण्यात आले. त्यांना घटनेचे गांभीर्य समजावून सांगत रेल्वेमार्गावरून चालून जीव धोक्यात न घालण्याचे सांगण्यात आले. या लोकांतील काही जणांकडे सामानही होते. त्यामुळे ते बाहेरगावी निघाले असण्याची शक्यता आहे. पण ते नेमके कुठे चालले होते, याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या घटनेबाबत अधिकृत माहिती देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली.

--------------

जीव धोक्यात घालू नकाऔरंगाबाद येथे घडलेल्या घटनेनंतरही जीव धोक्यात घालून अजूनही काही लोक रेल्वे ट्रॅकवर येत आहेत. यापार्श्वभुमीवर रेल्वे ट्रॅक किंवा त्याच्या आसपास असणे धोकादायक आहे. येण्या-जाण्यासाठी याचा उपयोग अजिबात करून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतुक पुर्णपणे बंद असल्याचे लोकांना वाटत आहे. पण पहिल्या दिवसापासून केवळ प्रवासी वाहतुक बंद आहे. मालगाड्या नियमितपणे धावत आहेत. तसेच काही दिवसांपासून श्रमिक स्पेशल गाड्याही सोडण्यात येत आहेत. त्यामुळे कोणत्या ट्रॅकवरून कोणती गाडी कधी येईल, हे सांगता येत नाही.  पण परराज्यात जाणारे अनेक मजुर रेल्वे ट्रॅकवरूनच पायी जात आहेत. तसेच विश्रांतीसाठीही ट्रॅकचाच आधार घेत आहेत. याच कारणामुळे शुक्रवारची घटना घडली आहे. त्यामुळे रेल्वेने लोकांना रेल्वे ट्रॅकवरून किंवा जवळून न चालून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन केले आहे.--------------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादLabourकामगारuruli kanchanउरुळी कांचन