शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

थरारक! औरंगाबाद दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; अवघ्या १०० मीटर अंतरावर मालगाडी थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 21:36 IST

मजुरांना मालगाडीने चिरडल्याची घटना शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये घडल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी पुण्यात उरळीजवळ 'त्याची' पुनरावृत्ती टळली..

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाकडून या घटनेबाबत अधिकृत माहिती देण्यास असमर्थता अजिबात करून जीव धोक्यात घालू नये, रेल्वे प्रशासनाकडून आवाहन

पुणे : रेल्वेमार्गावर झोपलेल्या १६ मजुरांना मालगाडीने चिरडल्याची घटना शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये घडल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पुण्यात उरळीजवळ त्याची पुनरावृत्ती टळली. चालकाच्या सतर्कतेमुळे रेल्वेमार्गावर बसलेल्या २० लोकांपासून १०० मीटर अंतरावर मालगाडी थांबल्याने मोठा अनर्थ टळला.मध्य प्रदेशच्या दिशेने रेल्वेमार्गावरून निघालेले मजुर शुक्रवारी पहाटे औरंगाबादजवळ मार्गावरच झोपले होते. पहाटेच्या सुमारास आलेल्या मालगाडीने त्यातील १६ जणांना चिरडले. चालकाने हॉर्न वाजवून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. पण वेग जास्त असल्याने थांबेपर्यंत मजुर गाडीखाली आले होते. अशीच घटना शुक्रवारी सायंकाळी उरळी ते लोणी स्टेशनदरम्यान होता होता टळली. ही घटना ताजी असतानाही काही लोक उरळीजवळ मार्गावरच ठाण मांडून बसले होते. उरळीवरून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे निघालेल्या मालगाडी चालकाला काही अंतरावर हे लोक दिसले. त्याने तातडीने हॉर्न वाजवून आपत्कालीन ब्रेक लावला. वेळीच सतर्कता दाखविल्याने ही लोकांपासून १०० मीटर अंतरावरच थांबविली. त्यामुळे त्यावेळी जवळपास २० लोक गाडीखाली येण्यापासून बचावले व मोठी दुर्घटना टळली.चालकाने तातडीने नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळात ट्रॅकवर बसलेल्या लोकांना तिथून हटविण्यात आले. त्यांना घटनेचे गांभीर्य समजावून सांगत रेल्वेमार्गावरून चालून जीव धोक्यात न घालण्याचे सांगण्यात आले. या लोकांतील काही जणांकडे सामानही होते. त्यामुळे ते बाहेरगावी निघाले असण्याची शक्यता आहे. पण ते नेमके कुठे चालले होते, याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या घटनेबाबत अधिकृत माहिती देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली.

--------------

जीव धोक्यात घालू नकाऔरंगाबाद येथे घडलेल्या घटनेनंतरही जीव धोक्यात घालून अजूनही काही लोक रेल्वे ट्रॅकवर येत आहेत. यापार्श्वभुमीवर रेल्वे ट्रॅक किंवा त्याच्या आसपास असणे धोकादायक आहे. येण्या-जाण्यासाठी याचा उपयोग अजिबात करून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतुक पुर्णपणे बंद असल्याचे लोकांना वाटत आहे. पण पहिल्या दिवसापासून केवळ प्रवासी वाहतुक बंद आहे. मालगाड्या नियमितपणे धावत आहेत. तसेच काही दिवसांपासून श्रमिक स्पेशल गाड्याही सोडण्यात येत आहेत. त्यामुळे कोणत्या ट्रॅकवरून कोणती गाडी कधी येईल, हे सांगता येत नाही.  पण परराज्यात जाणारे अनेक मजुर रेल्वे ट्रॅकवरूनच पायी जात आहेत. तसेच विश्रांतीसाठीही ट्रॅकचाच आधार घेत आहेत. याच कारणामुळे शुक्रवारची घटना घडली आहे. त्यामुळे रेल्वेने लोकांना रेल्वे ट्रॅकवरून किंवा जवळून न चालून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन केले आहे.--------------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादLabourकामगारuruli kanchanउरुळी कांचन