शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

इंदापूरात थैमान! एकाच पावसामुळे १३ गावांमधील १७३ कुटुंबे उघड्यावर, शेतपिकांचेही नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 19:39 IST

इंदापूरात मे महिन्यानंतर आणखी एकदा घातलेल्या सर्वदूर थैमानामुळे ओढे- नाले पाण्याने भरुन पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे

इंदापूर: रविवारच्या रात्रीपासून सोमवारच्या सकाळपर्यंत पावसाने तालुक्यात मे महिन्यानंतर आणखी एकदा घातलेल्या सर्वदूर थैमानामुळे ओढे- नाले पाण्याने भरुन पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इंदापूर तालुक्यातील १३ गावामध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन १७३ कुटुंबे बाधित झाली आहेत. चार गावांमधील ७ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. सणसरमधीत बाधित कुटुंबांची संख्या सर्वाधिक (८०) आहे.    इंदापूर शहरात देखील व्यापारी संकुले, देवालयांमध्ये पाणी घुसले आहे. शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. पुणे परिसरातील घाटमाथा व उजनी धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळी उच्चतम पातळीवर पोहचली असल्याने पूर नियंत्रणासाठी धरण व्यवस्थापनाने सोमवारी विसर्ग सुरु केला आहे. आवश्यकतेनुसार तो वाढवण्यात येणार असल्याने लोकांनी नदीपात्रात जाऊ नये, सखल भागातील जनावरे व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, गेल्या दोन दिवसांत इंदापूर तालुका व शहर परिसरात कमी जास्त प्रमाणात पाऊस चालूच आहे. मात्र रविवारी रात्री दहा वाजल्यापासून सोमवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. भिगवण (४६ मि.मी.),इंदापूर. (६४ मि.मी.),लोणी देवकर (६५ मि.मी.), बावडा (४९ मि.मी.),काटी (५२ मि.मी.),निमगाव केतकी (४९ मि.मी.),अंथुर्णे (४० मि. मी.),सणसर.( ६२ मि.मी.),पळसदेव (५२ मि.मी.) एवढ्या पावसाची नोंद या एका दिवसाच्या पावसामुळे झाली.    शेटफळ गढे गावात एकाच रात्रीत १५६ मिलीमीटर पाऊस झाला. गावात झालेल्या पावसाचे व वरुन येणारे पाणी तेथील ओढ्यात पाणी बसले नाही. त्यामुळे नजीकच्या आठ ते नऊ घरात पाणी घुसले. वरच्या भागातील पाणी मदनवाडी तलावातून उजनी धरणाकडे पाणी जाताना डाळज भागातील पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होवून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दौंड पासून येणारे पावसाचे पाणी खडकवासला कालव्यातून खाली आले. पाण्याच्या दबावामुळे ४४ क्रमांकाचा जोडफाटा फुटला. त्यातील पाणी सणसरमधील घरात व शेतात पाणी घुसले. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ८० कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. पावसाचे पाणी शेतात साठल्याने पेरु, डाळिंब व तरकारीच्या पिकांसह इतर पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे.    पावसामुळे इंदापूर शहरातील भार्गवराव तलाव परिसर, टाऊन हॉल समोरचा भाग,तळ्याची पाळी ते पाणदरा नाला, पाणदरा नाला ते डॉ.आंबेडकर चौक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. बाब्रस मळा,बावडावेस माळी गल्ली संत सावता माळी मंदिर परिसर,राजेवली नगर,तापी व विमल अपार्टमेंट परिसर, मालोजीराजे गढी भोवतालच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. रुग्णालयाच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचल्याने आरोग्यसेवा ही विस्कळीत झाली. १०० फुटी रोडवरील नगरपरिषदेचे गाळ्यांभोवती व आतमध्ये पाणी शिरल्याने गाळेधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. विद्या प्रतिष्ठान व इरा किड्स या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सुरु असणा-या परीक्षा १८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आठभाईमळ्यातील शेती जलमय झाली आहे.

दरम्यान या पावसामुळे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारचे आपले सर्व दौरे रद्द केले. प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या समवेत त्यांनी सणसर भागातील परिस्थितीची पहाणी केली. वातावरणात होत असणाऱ्या बदलामुळे वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस एकाच दिवसात पडतो आहे. येणा-या १९ तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी २९ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ४१ लाख ५७ हजार एकर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे वित्त व मनुष्य वा पशुंची जीवितहानी झाली असेल तर या सर्वांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानूसार तातडीने पंचनामे पूर्ण करण्यात यावेत. झालेल्या नोंदींनुसार नुकसान भरपाई दिली जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले. मे महिन्यात झालेल्या पावसानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सणसर परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने दिवाळीनंतर त्या कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात येतील. जानेवारीत ती कामे सुरु करुन मे महिन्यापर्यंत ती काम कशी पूर्ण होतील याकडे शासन लक्ष देईल, असे भरणे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरFarmerशेतकरीMONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSocialसामाजिक