शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगाव सांडस येथे साठ एकराच्या वर ऊस जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:27 IST

आगीने उसाची रांगोळी केल्याने शेतकऱ्यांच्याही स्वप्नांचे जळीत झाले

रांजणगाव सांडस : टोकर वाट, बुवांचा चा मळा या परिसरातील भीमा नदी काठावरील शेतकरी वर्गाचा साठ एकराच्या वर ऊस जळून खाक झालेला आहे. विशेष म्हणजे हा ऊस तोडणी योग्य झालेला असून तोडणीसाठी शेतकरी वर्ग वाट पाहत होते. ऊस शेत एकमेकांच्या शेजारी शेतकऱ्यांचे ऊस असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले व परिसरातील अडसाली ऊस ,खोडवा ऊस, लागण ऊस पूर्णपणे आगीत जळून खाक झाला आहे. या आगीत शेतकरी वर्गांचे पाईपलाईन चे मोठे नुकसान झाले आहे. 

अनेक ठिकाणी पाणी काढण्यासाठी ठेवलेले वॉल पूर्णपणे जळून गेले आहेत. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. कारण या भागात विजेचे बाहेर नियमन असल्यामुळे वीज उपलब्ध नव्हती. कोणत्या कारणामुळे आग लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऊसाला लागलेली आग प्रचंड प्रमाणात आगेच्या ज्वाला उसातून दुसऱ्या शेतकऱ्याच्या उसात पसरत होत्या. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. परंतु शेतकरी वर्गाचा हाता तोंडाशी आलेला घास या आगीने जळून खाक केलेला आहे. शेतकरी वर्गाने ऊस पेटू नये. म्हणून ट्रॅक्टरच्या साह्याने आगीपासून दूर अंतरावर उसाच्या शेतात ट्रॅक्टर घालून रोटर वेटरच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

अल्पभूधारक शेतकऱ्यांची रोजी रोटी ऊस पिकावरच अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या घरात कोणाचे लग्न ,कर्ज फेडणे, नवीन संसारासाठी काहीतरी करणे अशी स्वप्न अल्पभूधारक शेतकऱ्यांनी या ऊस पिकावर ती रंगवलेली होती. परंतु आगीने उसाची रांगोळी केल्याने शेतकऱ्यांच्याही स्वप्नांचे जळीत झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेfireआगWaterपाणीFarmerशेतकरी