शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

पाच धरणांत केवळ ८.५ टीएमसी पाणी : कुकडी प्रकल्पात अत्यल्प साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 00:55 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.

नारायणगाव  - कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. प्रथमच दुष्काळी परिस्थितीमध्ये पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे, अशी चिन्हे पाण्याच्या नियोजनाअभावी दिसू लागली आहेत.कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ६.२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र प्रत्यक्षात १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आल. २५ वर्षात प्रथमच ६२ दिवसानंतर आवर्तन सोडण्यात असल्याने यावर्षी उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतीला पाणी मिळणार नसल्याने शेतक-यांचे यावर्षीचे नियोजन कोलमडून जाणार आहे. शेतीला पाणी नसले तरी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.कालवा सल्लागार समितीची बैठक ३ आॅक्टोबर २०१८ ला होऊन कुकडी प्रकल्पातून २० आॅक्टोबर पासून नदीद्वारे आणि २५ आॅक्टोबर २०१८ पासून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर कालवा समितीची १६ आॅक्टोबर २०१८ रोजी दुसरी बैठक होऊन जादा पाणी सोडण्याचा निर्णय झाला. ५५ दिवसाचे आवर्तन सोडण्याचे ठरल. मात्र, प्रत्यक्ष ६२ दिवसानंतर पाणी बंद करण्यात आल्याने इतक्या मोठ्या आवर्तनात १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. ४.४६ टीएमसी पाणी जादा सोडण्यात आल्याने आता धरणात अवघे ८.४८४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी साठा डिंभे धरणात शिल्लक आहे. या धरणात ५.०७२ टीएमसी पाणी साठा आहे. १५ जानेवारी पासून या धरणातून डिंभा डावा कालव्यातून येडगाव धरणात पाणी सोडण्यात येत आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या नियोजना अभावी प्रथमच जुन्नर तालुक्यांसह आंबेगाव, शिरूर आणि पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा या तालुक्यांना पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.पाच धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारीसध्या येडगाव धरणात ०.७५६ टीएमसी (३८.८९ टक्के), वडज धरणात ०.३१४ टीएमसी (२६.८० टक्के), माणिकडोह धरणात १.३१४ टीएमसी (१२.९० टक्के) , पिंपळगाव जोगा १.०२९ टीएमसी (२६.४५ टक्के) , डिंभा धरणात ५.०७२ टीएमसी (४०.५१ टक्के) असे एकूण ०८.४८४ टीएमसी ( २७.७८ टक्के) पाणी शिल्लक आहे , गेल्यावर्षी आज अखेर १८.९९२ टीएमसी ( ६२.१९ टक्के) पाणी साठा होता , गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४.४१ टक्के पाणी कमी आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीPuneपुणे