शहरं
Join us  
Trending Stories
1
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
2
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
3
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
4
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
5
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
6
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
7
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
9
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
10
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
11
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
12
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
13
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
14
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
15
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
16
TCS च्या नफ्यात १४ टक्क्यांची मोठी घट! तरी गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लाभांश जाहीर
17
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
18
हत्येनंतर मृतदेह पाण्यानं स्वच्छ धुतला अन् त्यानंतर...; थरकाप उडवणारी घटना समोर, नरभक्षकाला अटक
19
अंघोळीसाठी गेलेली मुलं बाहेर येईना; ४ वर्षांच्या रयानचा मृत्यू, दरवाजा तोडताच दिसलं भयंकर
20
अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये 'सोनिक वेपन' वापरले? हे हत्यार कानातून रक्त काढते
Daily Top 2Weekly Top 5

पाच धरणांत केवळ ८.५ टीएमसी पाणी : कुकडी प्रकल्पात अत्यल्प साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 00:55 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.

नारायणगाव  - कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. प्रथमच दुष्काळी परिस्थितीमध्ये पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे, अशी चिन्हे पाण्याच्या नियोजनाअभावी दिसू लागली आहेत.कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ६.२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र प्रत्यक्षात १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आल. २५ वर्षात प्रथमच ६२ दिवसानंतर आवर्तन सोडण्यात असल्याने यावर्षी उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतीला पाणी मिळणार नसल्याने शेतक-यांचे यावर्षीचे नियोजन कोलमडून जाणार आहे. शेतीला पाणी नसले तरी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.कालवा सल्लागार समितीची बैठक ३ आॅक्टोबर २०१८ ला होऊन कुकडी प्रकल्पातून २० आॅक्टोबर पासून नदीद्वारे आणि २५ आॅक्टोबर २०१८ पासून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर कालवा समितीची १६ आॅक्टोबर २०१८ रोजी दुसरी बैठक होऊन जादा पाणी सोडण्याचा निर्णय झाला. ५५ दिवसाचे आवर्तन सोडण्याचे ठरल. मात्र, प्रत्यक्ष ६२ दिवसानंतर पाणी बंद करण्यात आल्याने इतक्या मोठ्या आवर्तनात १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. ४.४६ टीएमसी पाणी जादा सोडण्यात आल्याने आता धरणात अवघे ८.४८४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी साठा डिंभे धरणात शिल्लक आहे. या धरणात ५.०७२ टीएमसी पाणी साठा आहे. १५ जानेवारी पासून या धरणातून डिंभा डावा कालव्यातून येडगाव धरणात पाणी सोडण्यात येत आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या नियोजना अभावी प्रथमच जुन्नर तालुक्यांसह आंबेगाव, शिरूर आणि पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा या तालुक्यांना पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.पाच धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारीसध्या येडगाव धरणात ०.७५६ टीएमसी (३८.८९ टक्के), वडज धरणात ०.३१४ टीएमसी (२६.८० टक्के), माणिकडोह धरणात १.३१४ टीएमसी (१२.९० टक्के) , पिंपळगाव जोगा १.०२९ टीएमसी (२६.४५ टक्के) , डिंभा धरणात ५.०७२ टीएमसी (४०.५१ टक्के) असे एकूण ०८.४८४ टीएमसी ( २७.७८ टक्के) पाणी शिल्लक आहे , गेल्यावर्षी आज अखेर १८.९९२ टीएमसी ( ६२.१९ टक्के) पाणी साठा होता , गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४.४१ टक्के पाणी कमी आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीPuneपुणे