शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

पाच धरणांत केवळ ८.५ टीएमसी पाणी : कुकडी प्रकल्पात अत्यल्प साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 00:55 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.

नारायणगाव  - कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. प्रथमच दुष्काळी परिस्थितीमध्ये पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे, अशी चिन्हे पाण्याच्या नियोजनाअभावी दिसू लागली आहेत.कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ६.२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र प्रत्यक्षात १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आल. २५ वर्षात प्रथमच ६२ दिवसानंतर आवर्तन सोडण्यात असल्याने यावर्षी उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतीला पाणी मिळणार नसल्याने शेतक-यांचे यावर्षीचे नियोजन कोलमडून जाणार आहे. शेतीला पाणी नसले तरी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.कालवा सल्लागार समितीची बैठक ३ आॅक्टोबर २०१८ ला होऊन कुकडी प्रकल्पातून २० आॅक्टोबर पासून नदीद्वारे आणि २५ आॅक्टोबर २०१८ पासून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर कालवा समितीची १६ आॅक्टोबर २०१८ रोजी दुसरी बैठक होऊन जादा पाणी सोडण्याचा निर्णय झाला. ५५ दिवसाचे आवर्तन सोडण्याचे ठरल. मात्र, प्रत्यक्ष ६२ दिवसानंतर पाणी बंद करण्यात आल्याने इतक्या मोठ्या आवर्तनात १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. ४.४६ टीएमसी पाणी जादा सोडण्यात आल्याने आता धरणात अवघे ८.४८४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी साठा डिंभे धरणात शिल्लक आहे. या धरणात ५.०७२ टीएमसी पाणी साठा आहे. १५ जानेवारी पासून या धरणातून डिंभा डावा कालव्यातून येडगाव धरणात पाणी सोडण्यात येत आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या नियोजना अभावी प्रथमच जुन्नर तालुक्यांसह आंबेगाव, शिरूर आणि पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा या तालुक्यांना पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.पाच धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारीसध्या येडगाव धरणात ०.७५६ टीएमसी (३८.८९ टक्के), वडज धरणात ०.३१४ टीएमसी (२६.८० टक्के), माणिकडोह धरणात १.३१४ टीएमसी (१२.९० टक्के) , पिंपळगाव जोगा १.०२९ टीएमसी (२६.४५ टक्के) , डिंभा धरणात ५.०७२ टीएमसी (४०.५१ टक्के) असे एकूण ०८.४८४ टीएमसी ( २७.७८ टक्के) पाणी शिल्लक आहे , गेल्यावर्षी आज अखेर १८.९९२ टीएमसी ( ६२.१९ टक्के) पाणी साठा होता , गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४.४१ टक्के पाणी कमी आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीPuneपुणे