शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पाच धरणांत केवळ ८.५ टीएमसी पाणी : कुकडी प्रकल्पात अत्यल्प साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 00:55 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.

नारायणगाव  - कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. प्रथमच दुष्काळी परिस्थितीमध्ये पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे, अशी चिन्हे पाण्याच्या नियोजनाअभावी दिसू लागली आहेत.कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ६.२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र प्रत्यक्षात १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आल. २५ वर्षात प्रथमच ६२ दिवसानंतर आवर्तन सोडण्यात असल्याने यावर्षी उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतीला पाणी मिळणार नसल्याने शेतक-यांचे यावर्षीचे नियोजन कोलमडून जाणार आहे. शेतीला पाणी नसले तरी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.कालवा सल्लागार समितीची बैठक ३ आॅक्टोबर २०१८ ला होऊन कुकडी प्रकल्पातून २० आॅक्टोबर पासून नदीद्वारे आणि २५ आॅक्टोबर २०१८ पासून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर कालवा समितीची १६ आॅक्टोबर २०१८ रोजी दुसरी बैठक होऊन जादा पाणी सोडण्याचा निर्णय झाला. ५५ दिवसाचे आवर्तन सोडण्याचे ठरल. मात्र, प्रत्यक्ष ६२ दिवसानंतर पाणी बंद करण्यात आल्याने इतक्या मोठ्या आवर्तनात १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. ४.४६ टीएमसी पाणी जादा सोडण्यात आल्याने आता धरणात अवघे ८.४८४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी साठा डिंभे धरणात शिल्लक आहे. या धरणात ५.०७२ टीएमसी पाणी साठा आहे. १५ जानेवारी पासून या धरणातून डिंभा डावा कालव्यातून येडगाव धरणात पाणी सोडण्यात येत आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या नियोजना अभावी प्रथमच जुन्नर तालुक्यांसह आंबेगाव, शिरूर आणि पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा या तालुक्यांना पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.पाच धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारीसध्या येडगाव धरणात ०.७५६ टीएमसी (३८.८९ टक्के), वडज धरणात ०.३१४ टीएमसी (२६.८० टक्के), माणिकडोह धरणात १.३१४ टीएमसी (१२.९० टक्के) , पिंपळगाव जोगा १.०२९ टीएमसी (२६.४५ टक्के) , डिंभा धरणात ५.०७२ टीएमसी (४०.५१ टक्के) असे एकूण ०८.४८४ टीएमसी ( २७.७८ टक्के) पाणी शिल्लक आहे , गेल्यावर्षी आज अखेर १८.९९२ टीएमसी ( ६२.१९ टक्के) पाणी साठा होता , गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४.४१ टक्के पाणी कमी आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीPuneपुणे