शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

पाच धरणांत केवळ ८.५ टीएमसी पाणी : कुकडी प्रकल्पात अत्यल्प साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 00:55 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.

नारायणगाव  - कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा ८.५ टीएमसी (२७.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील ४ महिन्यांचे पाणी नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. प्रथमच दुष्काळी परिस्थितीमध्ये पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे, अशी चिन्हे पाण्याच्या नियोजनाअभावी दिसू लागली आहेत.कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ६.२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र प्रत्यक्षात १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आल. २५ वर्षात प्रथमच ६२ दिवसानंतर आवर्तन सोडण्यात असल्याने यावर्षी उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतीला पाणी मिळणार नसल्याने शेतक-यांचे यावर्षीचे नियोजन कोलमडून जाणार आहे. शेतीला पाणी नसले तरी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.कालवा सल्लागार समितीची बैठक ३ आॅक्टोबर २०१८ ला होऊन कुकडी प्रकल्पातून २० आॅक्टोबर पासून नदीद्वारे आणि २५ आॅक्टोबर २०१८ पासून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर कालवा समितीची १६ आॅक्टोबर २०१८ रोजी दुसरी बैठक होऊन जादा पाणी सोडण्याचा निर्णय झाला. ५५ दिवसाचे आवर्तन सोडण्याचे ठरल. मात्र, प्रत्यक्ष ६२ दिवसानंतर पाणी बंद करण्यात आल्याने इतक्या मोठ्या आवर्तनात १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. ४.४६ टीएमसी पाणी जादा सोडण्यात आल्याने आता धरणात अवघे ८.४८४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी साठा डिंभे धरणात शिल्लक आहे. या धरणात ५.०७२ टीएमसी पाणी साठा आहे. १५ जानेवारी पासून या धरणातून डिंभा डावा कालव्यातून येडगाव धरणात पाणी सोडण्यात येत आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या नियोजना अभावी प्रथमच जुन्नर तालुक्यांसह आंबेगाव, शिरूर आणि पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा या तालुक्यांना पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.पाच धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारीसध्या येडगाव धरणात ०.७५६ टीएमसी (३८.८९ टक्के), वडज धरणात ०.३१४ टीएमसी (२६.८० टक्के), माणिकडोह धरणात १.३१४ टीएमसी (१२.९० टक्के) , पिंपळगाव जोगा १.०२९ टीएमसी (२६.४५ टक्के) , डिंभा धरणात ५.०७२ टीएमसी (४०.५१ टक्के) असे एकूण ०८.४८४ टीएमसी ( २७.७८ टक्के) पाणी शिल्लक आहे , गेल्यावर्षी आज अखेर १८.९९२ टीएमसी ( ६२.१९ टक्के) पाणी साठा होता , गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४.४१ टक्के पाणी कमी आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीPuneपुणे