शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणा नडला; पवना धरणात बोट घेऊन फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या २ तरुणांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:38 IST

पिकनिकला आलेल्या या तरुणांनी लाईफ जॅकेट न घालता बोट घेऊन पाण्यात जाण्याचे धाडस केले

पवनानगर: पवनाधरण परिसरातील दुधिवरे गावाच्या हद्दीमध्ये बुधवार (दि.४ ) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पवनाधरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा बोट उलटल्याने मृत्यू झाला आहे. पवनाधरण जलाशयात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बोटी फिरत असून त्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना आणि नोंदणी क्रमांक देखील नाहीत. मयूर रविंद्र भारसाके (वय २५) तर तुषार रविंद्र अहिरे (वय.२६ दोघेही सध्या रा.पुणे, मुळ,रा.लालजैन मंदिराच्या पाठिमागे, पद्मावती नगर,वरणगांव,भुसावळ)असे बुडून मृत्यू झालेल्यांची नावे असून ते बालेवाडी येथे एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत होते.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी पुणे येथील स्केन रियालिटी प्राव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनी मध्ये काम करणारे सुमारे ८ मित्र पवना धरण लगत असलेल्या दुधिवरे येथील एका हाँटेल वर फिरण्यासाठी आले होते. यामधील काहीजण पवनाधरणाच्या पाण्यात दुपारी ०४:०० वाजण्याच्या सुमारास बोट घेऊन पाण्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले. ती उलट्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टिम व मावळ वन्य जीव रक्षक यांच्या वतीने धरणात बुडालेल्या दोन पर्यटकांचा शोध सुरु केल्यानंतर बुधवार ( दि.४ रोजी ) संध्याकाळी आठ च्या सुमारास एकाचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर रात्री अंधार झाल्यामुळे शोधकार्य बंद करण्यात आले व गुरुवार दि.५ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शोधकार्य सुरु केले व दुपारी ०२:३० वाजण्याच्या सुमारास दुसरा मृतदेह मिळून आला. यानंतर श्ववच्छदेनेसाठी खंडळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, युवराज बनसोडे, सिताराम बोकड, नवनाथ चपटे, नितीन कदम हे करत आहे.

लाईफ जॅकेट घातले नव्हते 

मिळालेल्या माहितीनुसार तरुणांनी कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. त्यामुळे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवीला असून या प्रकरणी हाँटेल मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

कडक कारवाईची मागणी 

पवनाधरण परिसरात असे अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. पंरतु बोट मध्ये जीवरक्षक उपकरणे नसतात. दरवर्षी पवनाधरणात अशा अनेक दुर्घटना घडतात ज्यात पर्यटकांना जीव गमवावा लागतो. परंतु यांच्यावर पवनाधरण, मत्स्य विभाग किंवा स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच बेकायदेशीरपणे बोट चालकांनवर बुधवार च्या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने बेकायदेशीर बोट चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Puneपुणेpavana nagarपवनानगरDamधरणWaterपाणीDeathमृत्यूSocialसामाजिकPoliceपोलिसlonavalaलोणावळा