शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

ग्रामीण भागात लग्नाचा नवा 'फंडा' ; ३०० ते ५०० वऱ्हाडी सर्रास लावतात हजेरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 2:21 PM

पोलिसांकडून कारवाई ऐवजी चार-पाच हजार घेऊन केली जाते मांडवली...

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ असल्याने राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत.  परंतु आज ही ग्रामीण भागात लग्न समारंभ धुमधडाक्यात सुरू असून, दारापुढे मंडप टाकून करण्यात येत असलेल्या लग्नात सर्रास 300-500 व-हाडी हजेरी लावत आहे. याकडे पोलिस मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, कारवाई करण्याऐवजी केवळ चार- पाच हजार रुपयांची माडवली करून शेकडोंच्या उपस्थितीला एक प्रकारे  संहमतीच देत आहेत. 

गेल्या एक महिन्यात शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा उद्रेकच झाला आहे. दोन-तीन हजारांच्या घरात असलेल्या रुग्ण संख्येने आता तब्बल बारा हजारांचा टप्पा क्रॉस केला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यात ग्रामीण भागात लग्न समारंभ व दशक्रिया विधीमध्ये शेकडो , हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत असल्याचे लक्षात आल्यावर यावर देखील कडक निर्बंध घालत लग्नांसाठी  50 तर दशक्रिया विधीसाठी 20 लोकांची अट घातली आहे गेल्या एक वर्षांपासून ही अट लागू असली तरी लोक काही केल्या ऐकत नसून आजही ग्रामीण भागात लग्नासाठी 300-500 पट्टीत लोक उपस्थित राहतात. यामध्ये केवळ लग्न एखाद्या हाॅल मध्ये न करता नवरा किंवा नवरीच्या घरा समोर मंडप टाकून लग्न समारंभ अत्यंत धुमधडाक्यात केले जात आहे. 

जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातच दारापुढे लग्नाचा नवीन फंडा सुरू झाला आहे. परंतु या दारा पुढच्या लग्नात वऱ्हाड्यांच्या उपस्थितीकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. काही गावांत पोलिस कारवाईला जातात देखील पण केवळ चार-पाच हजार रुपयांची वसुली करून हजारोंच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे. ही बाब जिल्ह्यात कोरोनाचा आणखी उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकते.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरambegaonआंबेगावMancharमंचरKhedखेडmarriageलग्नPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस