शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 19:02 IST

लोकांची मानसिकता बदलणे ही काळाची गरज...

ठळक मुद्देसिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभभाषणाला मराठीतून सुरूवात  

पुणे : ‘निर्भया’ नंतर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत देशातील कायदे अधिक कडक केले. मात्र, तरीही देशात बलात्काराच्या घटना होत आहेत. ही निंदनीय बाब असून या घटना थांबविण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. त्यासाठी शालेय जीवनापासूनच सर्व विद्यार्थ्यांमध्ये चांगले मुल्य रुजविण्याची आवश्यकता असून देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचे, संस्कृतिचे, परंपरांगत चालत आलेल्या चांगल्या गोष्टींचे जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रविवारी केले.लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळाव्या पदवीदान समारंभ प्रसंगी व्यंकय्या नायडू बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, प्र-कुलगुरू तथा विद्यापीठाच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित होते. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. तसेच विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक पदवी प्रदान केले.व्यंकय्या नायडू म्हणाले, आपल्या आई-वडिलांचा ,गुरूंजणांचा, वडीलधाऱ्यांचा, ज्येष्ठांचा व आपल्या बहिणींचा आदर ठेवण्याबाबत मुलांना लहानपनापासून शिकवले पाहिजे. समाजात गुरूचे स्थान महत्त्वाचे असून शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविला पाहिजे. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते.जीवनात निर्माण झालेल्या आव्हानांकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. तसेच समाजातील राक्षसांना संपवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व प्रशासकीय कौशल्यांची आवश्यकता आहे. लोकांची मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपल्या संस्कृती आणि इतिहासाचा आधार घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांनी मनोगत व्यक्त केले. --विद्यापीठांच्या क्रमवारीत वाढ व्हावी...इंग्रज अधिकारी मेकॉले याने देशाला दिलेल्या शिक्षण पध्दतीत बदल करणे गरजेचे आहे. त्यातच देशाचा इतिहास चूकीच्या पध्दतीने लिहिला असून खरा इतिहास समाजपर्यंत पोहचत नाही, अशी खंत व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली. तसेच जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत पहिल्या ३०० मध्ये भारतातील एकही विद्यापीठ येत नाही. परंतु, त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले पाहिजे. मात्र, आपल्या आई-वडिलासाठी, समाजासाठी, मातृभूमिच्या सेवेसाठी परत आले पाहिजे, असेही व्यंकय्या नायडू म्हणाले.........भाषणाला मराठीतून सुरूवात  व्यंकय्या नायडू यांनी पदवी प्रदान समारंभ प्रसंगी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सिंबायोसिसचा गौरव करताना व्यंकय्या नाडू म्हणाले, सध्या ‘वसुधैव कुटुंबकम’चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी सिंबायोसिसमध्ये शिक्षणासाठी येत आहेत, ही गौरवाची बाब आहे.

टॅग्स :Puneपुणेsymbiosisसिंबायोसिस