शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 19:02 IST

लोकांची मानसिकता बदलणे ही काळाची गरज...

ठळक मुद्देसिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभभाषणाला मराठीतून सुरूवात  

पुणे : ‘निर्भया’ नंतर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत देशातील कायदे अधिक कडक केले. मात्र, तरीही देशात बलात्काराच्या घटना होत आहेत. ही निंदनीय बाब असून या घटना थांबविण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. त्यासाठी शालेय जीवनापासूनच सर्व विद्यार्थ्यांमध्ये चांगले मुल्य रुजविण्याची आवश्यकता असून देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचे, संस्कृतिचे, परंपरांगत चालत आलेल्या चांगल्या गोष्टींचे जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रविवारी केले.लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळाव्या पदवीदान समारंभ प्रसंगी व्यंकय्या नायडू बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, प्र-कुलगुरू तथा विद्यापीठाच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित होते. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. तसेच विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक पदवी प्रदान केले.व्यंकय्या नायडू म्हणाले, आपल्या आई-वडिलांचा ,गुरूंजणांचा, वडीलधाऱ्यांचा, ज्येष्ठांचा व आपल्या बहिणींचा आदर ठेवण्याबाबत मुलांना लहानपनापासून शिकवले पाहिजे. समाजात गुरूचे स्थान महत्त्वाचे असून शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविला पाहिजे. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते.जीवनात निर्माण झालेल्या आव्हानांकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. तसेच समाजातील राक्षसांना संपवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व प्रशासकीय कौशल्यांची आवश्यकता आहे. लोकांची मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपल्या संस्कृती आणि इतिहासाचा आधार घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांनी मनोगत व्यक्त केले. --विद्यापीठांच्या क्रमवारीत वाढ व्हावी...इंग्रज अधिकारी मेकॉले याने देशाला दिलेल्या शिक्षण पध्दतीत बदल करणे गरजेचे आहे. त्यातच देशाचा इतिहास चूकीच्या पध्दतीने लिहिला असून खरा इतिहास समाजपर्यंत पोहचत नाही, अशी खंत व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली. तसेच जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत पहिल्या ३०० मध्ये भारतातील एकही विद्यापीठ येत नाही. परंतु, त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले पाहिजे. मात्र, आपल्या आई-वडिलासाठी, समाजासाठी, मातृभूमिच्या सेवेसाठी परत आले पाहिजे, असेही व्यंकय्या नायडू म्हणाले.........भाषणाला मराठीतून सुरूवात  व्यंकय्या नायडू यांनी पदवी प्रदान समारंभ प्रसंगी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सिंबायोसिसचा गौरव करताना व्यंकय्या नाडू म्हणाले, सध्या ‘वसुधैव कुटुंबकम’चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी सिंबायोसिसमध्ये शिक्षणासाठी येत आहेत, ही गौरवाची बाब आहे.

टॅग्स :Puneपुणेsymbiosisसिंबायोसिस