शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

‘कर्मयोगी’च्या पंचवार्षिक निवडणुकीतून राष्ट्रवादीची माघार; भाजपला उमेदवारी देताना कसोटी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 18:55 IST

शेतकऱ्यांच्या दृष्टीने कर्मयोगी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याची उत्सुकता सभासदांना होती

ठळक मुद्देकारखाना हा राजकारणाचे माध्यम नसून गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रपंच चालविण्याचे साधनकारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे गरजेचे

कळस : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेऊन पळ काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाराजी वाढली असून भाजपला उमेदवारी देताना कसोटी लागणार आहे.

राज्यातील महत्त्वाचा सहकारी साखर कारखाना व अनेक उपपदार्थ निर्मिती असलेल्या या कारखान्यात राष्ट्रवादीचे विद्यमान मंत्री व आमदार पक्षाचा असताना निवडणुकीतून माघारी घेणे धक्कादायक समजले जात आहे. माजी मंत्री पाटील यांच्यावर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातील नेत्यांनी या निवडणुकीतून पळ काढला आहे. पहिल्या फळीतील नेते निवडणूक लढविण्यास तयार नसल्याने हा निर्णय झाला असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ग्रामपंचायत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक मात्र कर्मयोगी साखर कारखान्याची निवडणुकीपासून का पळ काढला आहे आहेत. हा मोठा प्रश्न आहे. कर्मयोगी साखर कारखान्यात स्वर्गीय शंकरराव पाटील यांचे मोठे योगदान राहीले आहे. त्यानंतर माजी मंत्री पाटील यांनी कारखान्याची धुरा सांभाळली.

कर्मयोगी साखर कारखान्याबरोबरच माजी मंत्री पाटील यांनी दुसऱ्या सहकारी तत्वावरील निरा भिमा कारखाना सुरू केला. त्या ठिकाणी मागील सहा महिन्यात निवडणुक बिनविरोध पार पाडली. त्या ठिकाणीही राष्ट्रवादीने पळ काढला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने कर्मयोगी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याची उत्सुकता सभासदांना होती. मात्र  राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

कारखाना निवडणूक लढवली तरी कारखान्याचा कारभार चांगल्या पद्धतीने करता येईल, अशी स्थिती नाही सहकार क्षेत्रातील अनुभवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. मात्र जाणीवपूर्वक सदस्यत्व रद्द करून उमेदवारीपासून कायेदशीररित्या दूर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे अनुभव नसलेल्या उमेदवारांचा पॅनल उभा करून फक्त राजकारणासाठी राजकारण करणे आम्हाला योग्य वाटत नाही. कारखाना हा राजकारणाचे माध्यम नसून गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रपंच चालविण्याचे साधन आहे.

कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. याचा विचार करून सदर निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वत:चे पॅनल उभे करणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतलेला आहे, असे स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकाव्दारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिले आहे. निरा भिमा साखर कारखान्यानंतर कर्मयोगी साखर कारखान्यात राष्ट्रवादीने पळ काढल्याने आगामी जिल्हा बँक, नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीत त्याचा परिणाम होणार आहे. यासाठी राष्ट्रवादीत अंतर्गत कलह कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :DhanoriधानोरीPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसSugar factoryसाखर कारखाने