शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील पूर ; दर तासाला किती अन् कोठे साचणार पाणी हे समजायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 13:54 IST

नागरिक व प्रशासनाला किमान २ ते ३ तास आधी माहिती मिळणे आवश्यक

ठळक मुद्दे पेंडसे कमिटीच्या अहवालावर अंमलबजावणी अर्धवटच

विवेक भुसे- 

पुणे : मुंबईतील २६ जुलै २००५ मधील पूरानंतर स्थापन झालेल्या पेंडसे कमिटीच्या शिफारशीची गेल्या १२ वर्षात पूर्णपणे अंमलबजावणी न झाल्याने अजूनही मुंबईकरांना कोठे कधी किती पाणी साचणार आहे, याची माहिती मिळू शकत नाही. ४ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर ही परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली. मुंबईकरांना गेल्या तासाभरात किती पाऊस झाला हे आता समजू शकते. पण या पावसामुळे नेमके कोणत्या भागात व किती पाणी साचेल, हे समजणे शक्य आहे, असे या कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ.जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.

या पावसाळ्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते आय फ्लोज ही मुंबईला पुराचा इशारा देणार्‍या प्रणालीचे उद्घाटन झाले.

पेंडसे कमिटीविषयी डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, आय फ्लोज ही प्रणाली सुरु झाली. तिची शिफारस आमच्या कमिटीने केली होती. मुंबईतील २००५ च्या पुरानंतर चितळे समितीच्या शिफारशीनुसार तत्कालीन सिंचन सचिव एम. डी. पेंडसे याच्या नेतृत्वाखाली भविष्यात अशी परिस्थिती कमी करण्यासाठी उपाय योजना सुचविण्यासाठी हायड्रोलॉजी युनिटची स्थापना केली गेली. या समितीचे सदस्य जलविज्ञान, रिमोट सेन्सिंग, समुद्रशास्त्र, हवामानशास्त्र, पूर भविष्यावाणी अशा विविध क्षेत्रांचे तज्ञ होते. कमिटीने इस्त्रोच्या मदतीने मुंबईचा उच्च रेझोल्यूशन टोपोग्राफिक नकाशा तयार करुन घेतला.  जगभरात अशी कोठे सिस्टिम आहे, याचा अभ्यास केला. तेथील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले. मुंबईच्या प्रत्येक क्षेत्रात सारखा पाऊस पडत नाही. मागील वेळी सांताक्रुझला विक्रमी पाऊस झाला, तेव्हा कुलाब्यात मामुली पाऊस झाला होता. यंदा कुलाब्याच्या जवळपासही सांताक्रुझला पाऊस झाला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात किती पाऊस पडतो, हे मोजण्यासाठी अ‍ॅटोमॅटिक रेनगेज बसविण्याची शिफारस केली होती. ते काम बहुतांश झाले आहे. 

समितीने पडणार्‍या पावसाची तीव्रता लक्षात घेऊन त्यावेळची भरती आहोटीची स्थिती कशी राहील. त्यामुळे कोणत्या भागात किती पाणी साचेल, त्याचा मुंबईकरांवर काय परिणाम होईल, हे सर्व मिडियापर्यंत, लोकांपर्यंत पोहचविण्याची एक कायमस्वरुपी व्यवस्था करण्याचे सुचविले होते. त्यात केवळ हवामान विभागच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीचा समावेश करुन त्यांचे युनिट तयार करण्यास सांगितले होते. पावसाळा संपला की लोक विसरुन जातात. त्याप्रमाणे २००९ मध्ये आमची कमिटी गुंडाळण्यात आली.

लोकांपर्यंत ही माहिती पोहचविण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरु करण्याची शिफारस आम्ही केली होती. ते अजून झालेले नाही. जसा आता पावसाचा अंदाज अगोदर देता येऊ शकतो, तसेच पुढील २ ते ३ तासात कोणत्या भागात किती पाणी साचू शकेल, याचा अंदाज देता येऊ शकतो. चिन्नईमध्ये ही सिस्टिम २०१५ च्या विक्रमी पुरानंतर उभारण्यात आली आहे. त्याची शिफारस आम्ही केली होती. पण १२ वर्षाहून अधिक काळानंतर आता ही सिस्टिम उभी रहात आहे. यंदा पडलेल्या पावसाच्या वेळी ही सिस्टिम काय करत होती, हे समजले पाहिजे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले़ .....* किती पाऊस पडणार व कोणत्या भागात हे अजूनही समजू शकत नाही.* किती पाऊस पडला, हे समजू लागले, पण कोठे पाणी साचणार हे अजूनही समजत नाही.* किमान २ ते ३ तास आधी माहिती मिळणे आवश्यक.* लोकांच्या माहितीसाठी स्वतंत्र वेबसाईट अजूनही नाही.* या पुराच्या वेळी आय फ्लोज सिस्टिम नेमके काय करत होती, हे लोकांना समजले पाहिजे.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईRainपाऊसweatherहवामानUddhav Thackerayउद्धव ठाकरे