शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

मुंबईतील पूर ; दर तासाला किती अन् कोठे साचणार पाणी हे समजायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 13:54 IST

नागरिक व प्रशासनाला किमान २ ते ३ तास आधी माहिती मिळणे आवश्यक

ठळक मुद्दे पेंडसे कमिटीच्या अहवालावर अंमलबजावणी अर्धवटच

विवेक भुसे- 

पुणे : मुंबईतील २६ जुलै २००५ मधील पूरानंतर स्थापन झालेल्या पेंडसे कमिटीच्या शिफारशीची गेल्या १२ वर्षात पूर्णपणे अंमलबजावणी न झाल्याने अजूनही मुंबईकरांना कोठे कधी किती पाणी साचणार आहे, याची माहिती मिळू शकत नाही. ४ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर ही परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली. मुंबईकरांना गेल्या तासाभरात किती पाऊस झाला हे आता समजू शकते. पण या पावसामुळे नेमके कोणत्या भागात व किती पाणी साचेल, हे समजणे शक्य आहे, असे या कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ.जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.

या पावसाळ्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते आय फ्लोज ही मुंबईला पुराचा इशारा देणार्‍या प्रणालीचे उद्घाटन झाले.

पेंडसे कमिटीविषयी डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, आय फ्लोज ही प्रणाली सुरु झाली. तिची शिफारस आमच्या कमिटीने केली होती. मुंबईतील २००५ च्या पुरानंतर चितळे समितीच्या शिफारशीनुसार तत्कालीन सिंचन सचिव एम. डी. पेंडसे याच्या नेतृत्वाखाली भविष्यात अशी परिस्थिती कमी करण्यासाठी उपाय योजना सुचविण्यासाठी हायड्रोलॉजी युनिटची स्थापना केली गेली. या समितीचे सदस्य जलविज्ञान, रिमोट सेन्सिंग, समुद्रशास्त्र, हवामानशास्त्र, पूर भविष्यावाणी अशा विविध क्षेत्रांचे तज्ञ होते. कमिटीने इस्त्रोच्या मदतीने मुंबईचा उच्च रेझोल्यूशन टोपोग्राफिक नकाशा तयार करुन घेतला.  जगभरात अशी कोठे सिस्टिम आहे, याचा अभ्यास केला. तेथील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले. मुंबईच्या प्रत्येक क्षेत्रात सारखा पाऊस पडत नाही. मागील वेळी सांताक्रुझला विक्रमी पाऊस झाला, तेव्हा कुलाब्यात मामुली पाऊस झाला होता. यंदा कुलाब्याच्या जवळपासही सांताक्रुझला पाऊस झाला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात किती पाऊस पडतो, हे मोजण्यासाठी अ‍ॅटोमॅटिक रेनगेज बसविण्याची शिफारस केली होती. ते काम बहुतांश झाले आहे. 

समितीने पडणार्‍या पावसाची तीव्रता लक्षात घेऊन त्यावेळची भरती आहोटीची स्थिती कशी राहील. त्यामुळे कोणत्या भागात किती पाणी साचेल, त्याचा मुंबईकरांवर काय परिणाम होईल, हे सर्व मिडियापर्यंत, लोकांपर्यंत पोहचविण्याची एक कायमस्वरुपी व्यवस्था करण्याचे सुचविले होते. त्यात केवळ हवामान विभागच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीचा समावेश करुन त्यांचे युनिट तयार करण्यास सांगितले होते. पावसाळा संपला की लोक विसरुन जातात. त्याप्रमाणे २००९ मध्ये आमची कमिटी गुंडाळण्यात आली.

लोकांपर्यंत ही माहिती पोहचविण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरु करण्याची शिफारस आम्ही केली होती. ते अजून झालेले नाही. जसा आता पावसाचा अंदाज अगोदर देता येऊ शकतो, तसेच पुढील २ ते ३ तासात कोणत्या भागात किती पाणी साचू शकेल, याचा अंदाज देता येऊ शकतो. चिन्नईमध्ये ही सिस्टिम २०१५ च्या विक्रमी पुरानंतर उभारण्यात आली आहे. त्याची शिफारस आम्ही केली होती. पण १२ वर्षाहून अधिक काळानंतर आता ही सिस्टिम उभी रहात आहे. यंदा पडलेल्या पावसाच्या वेळी ही सिस्टिम काय करत होती, हे समजले पाहिजे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले़ .....* किती पाऊस पडणार व कोणत्या भागात हे अजूनही समजू शकत नाही.* किती पाऊस पडला, हे समजू लागले, पण कोठे पाणी साचणार हे अजूनही समजत नाही.* किमान २ ते ३ तास आधी माहिती मिळणे आवश्यक.* लोकांच्या माहितीसाठी स्वतंत्र वेबसाईट अजूनही नाही.* या पुराच्या वेळी आय फ्लोज सिस्टिम नेमके काय करत होती, हे लोकांना समजले पाहिजे.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईRainपाऊसweatherहवामानUddhav Thackerayउद्धव ठाकरे