शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

जलयुक्तमध्ये आणखी २00 गावे

By admin | Updated: October 2, 2015 01:07 IST

जलयुक्त शिवार योजनेमध्ये गेल्या वर्षी जिल्ह्यातील २00 गावांची निवड करण्यात आली होती. येथे झालेली कामे पाहून आमचे गावही यात असावे, अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे

पुणे : जलयुक्त शिवार योजनेमध्ये गेल्या वर्षी जिल्ह्यातील २00 गावांची निवड करण्यात आली होती. येथे झालेली कामे पाहून आमचे गावही यात असावे, अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे. या वर्षी आणखी या योजनेसाठी आॅक्टोबरमध्ये २00 गावांची निवड केली जाणार असून, निकषात बसणाऱ्या गावांनी प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन आज जिल्हाधिकारी सौरव राव यांनी केले.जिल्हा परिषदेत खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आवाहन केले. पाण्याच्या वैयक्तिक योजना करण्यापेक्षा जलशिवारमध्ये जास्तीत जास्त गावे समाविष्ट करून गावातील पाण्याचा सार्वजनिक प्रश्न सोडवा, असे आवाहनही केले.बैठकीत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना व विषयांचा आढावा घेण्यात आला. यात एकात्मिक पाणलोट कार्यक्रमाचा आढावा झाल्यानंतर आढळराव-पाटील यांनी आज पाण्याची जास्त गरज आहे. हे लक्षात घेऊन पाणलोट विकास अंतर्र्गत योजना जलयुक्तअंतर्र्गत राबवून पाण्याची टंचाई दूर करा, अशा सूचना दिल्या. या कामाचेही आता आॅडिट होणार असून, याची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या वेळी जिल्ह्यातील ७/१२ संगणकीकरण योजनेचाही आढावा घेण्यात आला. यात भोर व मुळशी तालुक्यात ही योजना यशस्वी झाली असून, इतर तालुक्यांतील नोंदीचे कामही संपत आले असल्याचे अधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले. यात काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यासाठी नवीन ‘व्हर्जन’ उपलब्ध केले असून, आता ही योजना सुरळीत सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले. मुळशीचे सभापती यांनी मात्र यात अनेक अडचणी येत असल्याचे सांगत या आॅनलाईन नोंदीमुळे इतर हक्काची नावे आली नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवरही पूर्वीच्या शेतकऱ्यांची नावे आल्याचे लक्षात आणून दिले. त्यावर जगताप यांनी तसे झाले असल्यास इतर हक्कात जिल्हा परिषदेचे नाव घेण्याच्या सूचना देऊ, असे सांगितले. यावर मुख्यधिकाऱ्यांनी बीडीओंना सूचना करून शासकीय मालकीच्या जागांचे ७/१२ काढून घ्या व असे काही घडले आहे का, याची माहिती तत्काळ द्या, अशा सूचना केल्या. सिंचन विहिरींच्या बाबतीत सदस्यांनी २0१३ साली झालेल्या सव्हेक्षणावर आक्षेप घेत भूजल सर्व्हेक्षण पुन्हा करण्याची मागणी केली. मात्र, जानेवारी २0१६ मध्ये ते होणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी जेथे पाणी उपलब्ध आहे तेथेच विहीर घेण्यास सरकार परवानगी देते. त्यामुळे जी गावे सेफझोनमध्ये येतात त्या गावांचे प्रस्ताव द्या, असे सांगितले. भूजलसर्व्हेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून चर्चा करू, असेही या वेळी सांगण्यात आले.इंदिरा आवास योजनेचा आढावा जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक दिनेश डोके यांनी घेतला. यात जागा नसल्याने जिल्ह्यात सुमारे १८ हजार लाभार्थींनी घरकुल बांधता येत नसल्याचे निदर्शनास आणले. यावर आढळराव -पाटील यांनी आता जागेसाठी राज्याचे ५० हजार व केंद्राचे २0 असे ७0 हजार देण्याचा प्रस्ताव आहे. तो लवकरच मंजूर होणार असून, त्यामुळे जागेअभावी वंचित लाभार्थींना याचा फायदा होवून ही समस्या सुटेल, असे सांगितले. (प्रतिनिधी)या वेळी आढळराव-पाटील यांनी आंबेगावचे सभापती व बीडोओ आले आहेत का, असे विचारले. मात्र, ते उपस्थित नव्हते. यावर आढळराव यांनी मी गेल्या आठ वर्षे या समितीचा अध्यक्ष आहे. मात्र, प्रत्येक बैैठकीला ते गैरहजर असतात. यावर मुख्याधिकाऱ्यांनी हा विषय सावरता घेत मला तसे कळविले असल्याचे सांगितले. मग आढळराव यांनी मला आपण हे का कळविले नाही, असा सवाल केला.जलयुक्त शिवार अभियानामध्ये २00 पैकी ४७ गावे जलयुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहिर केले आहे. १५ आॅगस्ट रोजी या गावांमध्ये झालेल्या ग्रामसभांत ही गावे जलयुक्त झाल्याचे ठराव करण्यात आले आहेत.