शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandha: श्रीरामाचा खोटा जप करणाऱ्या भाजपकडून देशात रावणाचे कृत्य; विश्वजित कदम यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 15:21 IST

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदच्या निमित्ताने आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देएकत्र येऊन लखीमपूर घटनेचा निषेध करत भाजप रावणाचे दहन करणारजातीवादाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली

पुणे : उत्तरप्रदेश मधील लखीमपूर (lakhimpur) घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यात ठिकठिकाणी व्यापारी वर्ग, भाजी मार्केट यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रॅली, मोर्चा काढून बंद ला पाठिंबा देत आहेत. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदच्या निमित्ताने आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

''एका बाजूने महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन चांगले काम करत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर जीवघेण्यापर्यंतचे अत्याचार सुरु आहेत. आता नवरात्रीचे दिवस सुरु आहेत. दसऱ्याला रावण दहन केले जाते. श्रीरामाचा खोटा जप करणाऱ्या भाजपकडून देशात रावणाचे कृत्य सुरु आहे. सर्व शेतकरी संघटना, आघाडीचे तिन्ही पक्ष, सर्वसामान्य जनता, एकत्र येऊन लखीमपूर घटनेचा निषेध करत भाजप रावणाचे दहन करणार आहोत. असा हल्लाबोल कदम यांनी केंद्रावर (central government) केला आहे.'' 

''शेतकरी कायद्याच्या विरोधात अन्नदाता अकरा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान केंद्रातील मंत्री त्यांच्याकडे  डुंकूनही बघत नाहीत. त्यानंतर लखीमपूर घटनेत आपले शेतकरी भावंडं आंदोलन करताना त्यांना चिरडून टाकण्याचं काम भाजप मंत्र्याच्या मुलाने केले आहे. आपल्या देशातील ही घटना अतिशय निंदनीय असल्याचे ते म्हणाले आहेत.'' 

जातीवादाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली 

''शेतकरी आपला अन्नदाता आहे. आपले पूर्वज कशी ना कधी शेतकरी होते. याआधी सुद्धा भाजपने शेतकरी आंदोलनात अन्नदात्यावर गोळीबार करून शेतकऱ्यांची हत्या केली होती. आता हि लखीमपूरची घटना घडली आहे. देशात जातीवाद वाढत चालला होता. त्याला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार तयार केले. दोन महिन्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचे १९ हजार कोटींचे कर्जमाफ केले. याच काळात नकळत फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यामध्ये हे भाजप सरकार शेतकऱ्यांवर अत्याचार करत आहे. अत्याचारी रावणाचे दहन करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली आहे.''  

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदCentral Governmentकेंद्र सरकारVishwajeet Kadamविश्वजीत कदमcongressकाँग्रेस