Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 18:34 IST2025-06-15T18:25:54+5:302025-06-15T18:34:30+5:30
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्यांच्याकडून घटनेची माहिती घेण्यात येत आहे.

Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
मावळ ( पिंपरी चिंचवड) - पुणे जिल्ह्यातील मावळ येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. यात बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला आहे. घटनास्थळी तळेगाव पोलीस,पिंपरी चिंचवड अग्निशामक दल, पी एम आर डी ए अग्निशामक दल, लष्कराचे एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्यांच्याकडून घटनेची माहिती घेण्यात येत आहे.
यावेळी रोहित पवार म्हणाले, आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत कशी मिळेल असा आहे. जे लोक अडकलेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नदीपात्रात अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
रोहित पवार यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. मावळमध्ये (पुणे) कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून सहाहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं तर २० ते २५ जण वाहून गेल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. गुजरातमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात २७० जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेतून आपण सावरत नाही तोच मन सुन्न करणारी ही दुसरी दुर्घटना घडली. वाहून गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असावेत आणि सुखरुप परतावेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना! मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
मावळमध्ये (पुणे) कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून सहाहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं तर २० ते २५ जण वाहून गेल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. गुजरातमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात २७० जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेतून आपण सावरत नाही तोच मन सुन्न…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 15, 2025
दरम्यान, कुंड मळा येथे नैसर्गिक रांजणखळगे आहे. नदीच्या प्रवाहामध्ये रांजणखळले असल्याने पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानंतर त्या ठिकाणी जखमी किंवा मृतांचा शोध घेणे अवघड असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मावळ परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दुर्घटना झाल्यानंतर घटनास्थळी मावळचे आमदार सुनील शेळके पोचले आहे. घटनास्थळी क्रेन पाचारण केले आहे. पाण्यात कोसळलेला पुलाचा लोखंडी भाग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.'
सांगाड्याखाली लोक अडकण्याची शक्यता
ज्यावेळेस पुल कोसळला त्यावेळी पुन्हा वर शंभर ते दीडशे पर्यटक उभे होते. तसेच पुलाखालील भागामध्ये ही काहीजण नदीकाठी बसले होते. अचानक फुल कोसळल्याने त्याखाली अनेक जण दबले गेले आहेत. त्यांचा अशी शक्यता प्रत्यक्षदर्शनी वर्तविली आहे.