शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

Maharashtra Election 2019 : उद्योगपतींना कर्जमाफी; शेतकरी मात्र देशोधडीला : शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 1:27 PM

शेतकऱ्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे.

ठळक मुद्देतळेगावमध्ये युती सरकारवर टीकाराज्यात उद्योगधंदे बंद पडत चाललेत, बेरोजगारी वाढत आहे

तळेगाव दाभाडे : राज्यात उद्योगधंदे बंद पडत चाललेत, बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. स्त्रियांना कसलीच सुरक्षितता नाही. केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगार विरोधी असून उद्योगपतींना कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी देताना शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. राज्याच्या विकासाचे दावे करणारे राज्य सरकार सत्तेचा नेमका कुणासाठी वापर करत आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी उपस्थित केला. तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत ते शुक्रवारी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी खासदार नाना नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, एसआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, अत्याचारात वाढ झाली आहे. शासनाची जेट विमान कंपनी बंद पडली. वीस हजार कामगार बेरोजगार झाले. आघाडी सरकारच्या काळात सुस्थितीत असलेल्या विविध सरकारी कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे बंद पडल्या आहेत, असे पवार म्हणाले.सूत्रसंचालन दत्तात्रय पडवळ आणि सुभाष जाधव यांनी केले. तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी आभार मानले.

एकीकडे मोठी थकबाकी असल्याने अडचणीत आलेल्या बँकेला सरकारी तिजोरीतून ८१ हजार कोटी रुपयांची मदत सरकार देते, तर दुसरीकडे नैसर्गिक संकटांनी अडचणीत आलेल्या शेतकºयांकडून शेतीकर्जाच्या वसुलीसाठी भांडीकुंडी जप्तीचा बडगा सरकार उगारत आहे. कर्जबाजारी शेतकºयांसाठी राज्य सरकार सत्तेचा वापर करत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी