शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

Maharashtra Bandh: पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जाण्यासाठी पुकारला बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 2:29 PM

महाविकास आघाडीने पुढाकार घेत पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जावा म्हणून बंद पुकारला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारबद्दल देशात तीव्र नाराजीची भावना

पुणे : लखीमपूर हत्या, वर्षभराचे शेतकरी आंदोलन याकडे पंतप्रधान लक्ष द्यायला तयार नाहीत. नागरिकांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहचावा या उद्देशाने बंद पुकारला आहे असे महाविकास आघाडीने स्पष्ट केले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी पुण्यात काँग्रेस भवनमध्ये शुक्रवारी दुपारी महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबर ला पुकारलेल्या बंद मागची भूमिका विषद केली.

''केंद्र सरकारबद्दल देशात तीव्र नाराजीची भावना आहे. शेतकरी आंदोलन, लखीमपूर प्रकरण, राज्यातील नेत्यांच्या नातेवाईकांना सरकारी एजन्सीचा वापर करून त्रास या सर्व प्रकारांबद्दल जनतेत संताप आहे. महाराष्ट्र नेहमीच देशहिताच्या भूमिकेतून काम करत आला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीने पुढाकार घेत पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जावा म्हणून बंद पुकारला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.''

आमदार चेतन तुपे, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, लोकायत चे नीरज जैन यावेळी उपस्थित होते. ''रिक्षा पंचायत, लोकायत यासारख्या समविचारी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येईल, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.''

११ ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद 'ची हाक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने ' महाराष्ट्र बंद 'ची हाक दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी बंद पाळावा, असे आवाहन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मिळून केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा