शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो सापांची जीवनदायिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:10 IST

खेड्या गावात राहून सापांविषयी जाणून घेतले आणि हजारो सापांना जीवदान देण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्या म्हणजे सुजाता बोरकर. ...

खेड्या गावात राहून सापांविषयी जाणून घेतले आणि हजारो सापांना जीवदान देण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्या म्हणजे सुजाता बोरकर. गेली २० वर्षांपासून त्या सापांना पकडून निसर्गात सोडत आहेत. सर्पजीवनदायिनी असेच त्यांना म्हटले जाते. सुजाता रामचंद्र बोरकर, नारायणपूर

—————————-

लहानपणी साप चावल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. ते दृश्य पाहिल्यानंतर सापावर काम करायचे ठरवले. तेव्हा त्यांच्या गावी वन विभागाचे गोपाळ ननावरे साप पकडायला यायचे. त्यांच्याकडून साप कसा पकडायचा याची माहिती त्यांनी घेतली. सापाविषयी पुस्तके वाचली. त्यातून थोडीफार माहिती समजली. त्यानंतर पहिल्यांदाच एका ठिकाणी साप पकडायला त्या गेल्या. तेव्हा तो नाग होता. पण तिथे घाबरून चालणार नव्हते, म्हणून त्यांनी एका काठीने त्या नागाला हात न लावता एका डब्यात पकडले. त्यानंतर त्यांची भीती गेली आणि मग साप पकडायला सुरुवात झाली. आजपर्यंत हजारो साप पकडून निसर्गात सोडले आहेत.

साप दिसल्यानंतर नागरिक घाबरतात. त्याला मारून टाकतात. पण सुजाता त्याबाबत जनजागृती करत आहेत. साप मारू नका, त्यांना निसर्गात सोडून द्या, असे आवाहन त्या करतात. शाळांमध्ये जाऊन सापांची माहिती देतात. सापांची माहिती देण्यासाठी त्या महाराष्ट्रभर फिरल्या आहेत. २००१ पासून त्या सापांना पकडतात. त्या साप पकडायला शिकल्यानंतर आता त्यांच्या भाच्याला प्रशिक्षण देत आहेत. तसेच लोकांमध्ये जाऊन याबाबत माहिती देतात.

सापांसोबतच त्या पक्षी, प्राणी यांनाही मदत करतात. एखादा पक्षी, प्राणी जखमी असेल, तर त्यावर उपचार करतात. त्यानंतर वन विभाग किंवा निसर्गात सोडतात. लहान मुलांना वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगतात. ज्यांना रोपं हवी असतील, त्यांना ते देतात. त्यामुळे निसर्गसंवर्धनाचे काम त्या अविरहीत करत आहेत.

——————

...अग्नी दिल्यावर त्याचे पाय हलत होते !

मी खूप लहान होते, तेव्हा आमच्या वस्तीवर एका मुलाला साप चावला. तेव्हा सापाविषयी अधिक माहिती नव्हती. तसेच लोकांमध्ये जागृती नव्हती. तो मुलगा बेशुद्ध झाला होता. बराच वेळ वस्तीवर तो मुलगा बेशुद्ध पडून होता. त्या लोकांना वाटले की, साप चावल्याने हा मरण पावला आहे. त्यामुळे त्या मुलाला अग्नी देण्यात आला. पण जेव्हा अग्नी पेटला, त्यानंतर त्या मुलाचे पाय हलताना दिसले. पण त्या मुलाला नंतर वाचवता आले नाही. ती घटना माझ्या मनावर कोरली गेली. तेव्हापासून सापाविषयी जाणून घेऊ लागले. जर तेव्हा सापांविषयी माहिती असती, तर तो मुलगा वाचला असता, अशा भावना सुजाता बोरकर यांनी व्यक्त केल्या.