शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

विलंब लागला तरी चालेल, लग्नाची घाई कुणाला? सध्याच्या तरूण - तरूणींची मानसिकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:25 IST

पालकांकडूनही मुला-मुलींच्या लग्नासाठी फारसा आग्रह धरला जात नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.

ठळक मुद्देलग्नापेक्षा मुली करिअरला अधिक प्राधान्यतरूणींच्या अपेक्षा पूर्ण करणे तरूणांसमोरचे मोठे आव्हान

पुणे : अहो, सविता आता पस्तीशीला आलीये; तिचं लग्न करायचंय का नाही? नक्की कुठं अडलंय? असा खोचक प्रश्न नातेवाईक किंवा शेजारच्या मंडळीकडून कुटुंबांना अनेकदा विचारला जातो. मात्र, तरूण-तरूणींना त्याची पर्वा नाही. गेल्या काही वर्षांमधला वाढत्या घटस्फोटांचा विचार करता ’लग्न’ म्हणजे तडजोड हेच आता तरूण-तरूणींना मान्य नाही. मनपसंद जोडीदार मिळण्यासाठी लग्नाला विलंब लागला तरी चालेल, हरकत नाही. इथं घाई कुणाला आहे? अशाप्रकारची मानसिकता तरूण पिढीमध्ये तयार झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांकडूनही मुला-मुलींच्या लग्नासाठी फारसा आग्रह धरला जात नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.

एक काळ असा होता, वयाची विशी उलटल्यानंतर कुटुंबात मुली़च्या लग्नाची चर्चा सुरू होई. मुलीला जे काही पुढे शिकायचे आहे ते ती नव-याच्या घरी जाऊन शिकेल, अशी मुलींच्या आई-वडिलांची विचारसरणी होती. मात्र, लग्नापेक्षा मुली करिअरला अधिक प्राधान्य देऊ लागल्यानंतर हे चित्र काहीसे बदलत गेले. आज तरूणी तरूणांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. किंबहुना तरूणांपेक्षा जास्त कमवत आहेत. त्यामुळे करिअरिस्ट तरूणींच्या लग्नाच्या बोहल्यावर चढताना तरूणांकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत आणि या अपेक्षाच तरूणतरूणींच्या लग्नाच्या विलंबास कारणीभूत ठरत आहेत. तरूणींच्या अपेक्षा पूर्ण करणे तरूणांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे तर जोपर्यंत मनासारखी मुलगी मिळत नाही तोपर्यंत लग्नासाठी थांबण्याची तरूणांनी तयारी दर्शविली आहे.

''आजही पत्रिका बघूनच विवाह जुळविण्याकडे वधू-वरांच्या कुटुंबियांचा कल आहे. पत्रिका जुळत नसल्यामुळे अनेक तरूण-तरूणींच्या विवाहांना विलंब लागत आहे. यातच ओळखीमध्येच नातेसंबंध जुळले पाहिजेत अशी देखील त्यांची इच्छा आहे.  याशिवाय तरूण-तरूणींना जोडीदार सुंदरच हवाय. भावी पत्नी कमवती पाहिजे अशी तरूणांची अपेक्षा आहे तर पत्नी कमावती हवी असेल तर माझ्यापेक्षा भावी पतीचे पँकेज हे दुप्पट हवे असा तरूणींचा हट्ट आहे. पुण्याचा विचार केला तर तरूणींना पुण्यातलाच जोडीदार हवाय आणि तो देखील एकाच क्षेत्रातला असावा असा त्यांचा आग्रह आहे.  तरूण-तरूणींना जोपर्यंत हवा तसा जोडीदार मिळत नाही तोपर्यंत त्यांचे पालक देखील विवाहासाठी अटटहास करत नाहीत अशी माहिती वधू वर सूचक केंद्राच्या विराज तावरे यांनी दिली.''  वय वाढले म्हणून कुणाच्याही गळ्यात वरमाला का घालायची

''मला मनासारखा जोडीदार हवा आहे. उगाचच लग्नासाठी तडजोड करणे मला पटत नाही. वरासाठीची शोध मोहीम सुरू आहे. वय वाढले म्हणून कुणाच्याही गळ्यात वरमाला का घालायची? मी स्वत: कमावते. त्यामुळे मी स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी आहे. जेव्हा मनपसंद जोडीदार मिळेल तेव्हा लग्न करेन. मला लग्न करण्याची मुळीच घाई नसल्याचं अपर्णा मोघे म्हणाली.'' 

तरुणींच्या अपेक्षाच खूप वाढल्या आहेत 

''आजच्या काळात तरूणींच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. तरूणाचा पुण्यामुंबईत फ्लँट हवा. त्याला इतकेच पँकेज हवे. घरात सासू-सासरे नकोत. सुरूवातीलाच तरूणी त्यांच्या अपेक्षा सांगत असल्याने मग पुढे नातं जुळवण्याचा प्रश्नच येत नाही. यातच  माझा आणि आमच्या कुटुंबाचा पत्रिकेवर अधिक विश्वास आहे. पत्रिका जुळत असेल तरच आम्ही पुढची बोलणी करतो. अनेकदा त्या जुळतात पण स्वभाव, आवडीनिवडी जुळत नाहीत. त्यामुळे विवाह जुळण्यास अडचणी येत असल्याचे संग्राम मुळेने सांगितले आहे.'' 

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नSocialसामाजिकFamilyपरिवार