शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

त्रास झाला नाही तर लशीचा परिणाम नाही, हा गैरसमजच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी की नाही? घेतली तर त्रास होतो का? मग न घेतलेलीच बरी! ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी की नाही? घेतली तर त्रास होतो का? मग न घेतलेलीच बरी! मला काहीच झाले नाही, मग कशाला पाहिजे लस? कोरोनाबाधितांची संख्या वाढत असूनही अशा प्रश्नांचे गुऱ्हाळ मात्र संपायला तयार नाही.

या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांबरोबर लोकमतने संपर्क साधला. त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीबाबतचे गैरसमज दूर करताच लस का गरजेची आहे, याचेही सविस्तर स्पष्टीकरण दिले. कोरोनाला हरवायचे असेल तर सर्वांनीच मनात कोणतीही शंका न बाळगता लस घ्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

* लस घेतल्यावर होणारा त्रास एक किंवा फार तर दोन दिवसांच्या वर टिकत नाही. साध्या औषधांनी तो बराही होतो. त्यामुळे त्रासाचे कारण देत लस टाळणे चुकीचे आहे.

* लशीची अॅलर्जी असणे असे उदाहरण लाखात एक म्हणजे अगदीच दुर्मिळ आहे. लशीची अॅलर्जी आहे, असे काहीच नसते.

* लस म्हणजे तेच विषाणू सौम्य प्रमाणात शरीरात सोडतात. त्यामुळे या प्रकाराशी आपल्याला सामना करायचा आहे, असे शरीरात निश्चित होते. मग त्यानंतर तोच विषाणू अन्य मार्गाने शरीरात प्रवेश करता झाला, तर त्याची मात्रा चालत नाही किंवा अगदी कमी चालते. लस घेण्याचा हा मोठाच फायदा आहे.

* असाध्य आजार असलेल्यांनी प्राधान्याने लस घ्यायला हवी. कोरोना विषाणू अशा कमकुवत झालेल्या गोष्टींवर, त्यातही किडनी वगैरेवर हल्ला करतो.

* कोरोना विषाणू काही वय पाहून हल्ला करत नाही. तो कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी लस हाच सध्याचा एकमेव उपाय आहे.

* विषाणू जवळ येऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर, गर्दी टाळणे व लस घेणे ही चतु:सूत्री पाळली तर आपण कोरोनाचा नक्की पराभव करू शकतो.

डॉ. अच्युत जोशी

कन्सल्टिंग फिजीशियन

----//

* लस दिल्यानंतर शरीरात बाहेरून येणाऱ्या विषाणूंच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिपिंड (अँटिबॉडिज) तयार होतात. कोरोना विषाणूचा प्रतिरोध करण्यासाठी हे गरजेचे आहे.

* लस घेतली तिथे दंड दुखतो. काहींना अंगदुखी किंवा डोके दुखायला लागते. हे प्रमाण कमी आहे. मात्र त्रास झाला की लस परिणामकारक व नाही झाला तर लशीचा उपयोग झाला नाही हा गैरसमज आहे.

* मधुमेह किंवा असा आजार असलेल्यांनी प्राधान्याने लस घ्यायला हवी. त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते.

* लस घेतली याचा अर्थ कोरोनापासून १०० टक्के सुरक्षित असे नाही. तरीही कोरोना होऊ शकतो, पण त्याची तीव्रता एकदम कमी असेल. मात्र अशी उदाहरणे कमी आहेत.

* कोरोना झाला असेल तर लगेच लस घेऊ नये. त्यातून पूर्ण बरे झाल्यावर साधारण ३ ते ४ महिन्यांनी लस घेणे योग्य आहे.

डॉ. बाळासाहेब देशमुख

अध्यक्ष- इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे शाखा

---///

* लस दोन वेळा घेण्यामागे शास्रीय कारण आहे. लशीचे संशोधन झाल्यावर तिचा किती परिणाम लस घेणाऱ्याच्या शरीरावर होणार, म्हणजे किती अँटिबॉडीज तयार होणार हेही निश्चित होत असते. त्यावरून किती डोस द्यायचे हे ठरते. दुसरा डोस हा पहिल्या डोसचा परिणाम वाढवणारा असतो.

* याच कारणासाठी पहिला डोस घेतल्यानंतर दिलेल्या मुदतीनंतर दुसरा डोस घेणे गरजेचे असते. कारण त्यातून पहिल्या डोसमुळे तयार झालेल्या अँटिबॉडीजना बळ मिळणार असते. म्हणूनच पहिला डोस घेतल्यावर दिलेल्या मुदतीत दुसरा डोस घ्यायलाच हवा. त्याशिवाय सुरक्षेचे वर्तुळ तयार होणार नाही.

* पहिला डोस घेतला आणि दिलेल्या मुदतीत दुसरा मिळाला नाही तरी त्याचा दुष्परिणाम काहीच नाही. उलट पहिल्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणाराच असतो. तीन महिन्यांनंतर दुसरा डोस घेतला तरी चालेल.

* आता काही कंपन्या फक्त एकच डोस पुरेसा असलेल्या लशींचे उत्पादन करत आहेत. त्यावरचे त्यांचे संशोधन पूर्ण झाले आहे. या लसींचा एकच डोस घेतला तरी चालू शकते, कारण ते संशोधनातून ठरलेले असते.

* कोरोना विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे तो शरीरातील काही अवयवांवर थेट आघात करतो व ते कमकुवत करतो किंवा त्यांचे कार्य पूर्ण थांबवतो. त्यामुळेच आधीच अनियंत्रित मधुमेह, किडनी किंवा तत्सम आजारांनी कमकुवत झालेल्या रूग्णांनी तर ही लस प्राधान्याने घ्यायलाच हवी.

* लसीकरण ऐच्छिक आहे. पण कोरोना विषाणूचा संसर्ग करण्याचा वेग लक्षात घेता, प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घेणे गरजेचेच आहे. ते राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे समजले गेले तरी हरकत नाही.

- डॉ. सुभाष साळुंखे,

माजी महासंचालक, आरोग्य

विद्यमान तांत्रिक सल्लागार, कोरोना राज्य कक्ष