शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चार प्रकल्पांतील ७० टक्के बाधितांच्या मोबदल्याची चौकशी पूर्ण; महिनाभरात अहवाल राज्य सरकारकडे जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:13 IST

उर्वरित आदेशांची पडताळणी महिनाभरात पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे

पुणे : सुमारे ७० वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांमधील बाधितांना अजूनही लाभ मिळत नसल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर अशा सर्व प्रकल्प बाधितांच्या लाभाची चौकशी करण्याचे काम जिल्ह्यातही सुरू आहे. त्यानुसार चार प्रकल्पांच्या बाधितांना वाटप केलेल्या ४ हजार आदेशांपैकी आतापर्यंत सुमारे ७० टक्के अर्थात दोन हजार आठशे आदेशांची चौकशी पूर्ण झाली आहे. उर्वरित आदेशांची पडताळणी महिनाभरात पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

कोयना प्रकल्प बाधितांनी उच्च न्यायालयात केलेल्या अनेक याचिकांमध्ये लाभ मिळाला नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयाने केलेल्या निरीक्षणानंतर अजूनही साठ ते सत्तर वर्षांनंतर लाभ मिळवण्यासाठी प्रकल्प बाधितांना न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. त्यामुळे प्रकल्पबाधितांची नेमकी स्थिती काय आहे, अशी विचारणा मदत व पुनर्वसन विभागाला करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने १९७६ पूर्वी राज्यातील सर्व सिंचन प्रकल्पांमध्ये संपादित झालेली जमीन, त्यातील प्रकल्प बाधित, जमिनींचे निवाडे, मोबदला म्हणून दिलेल्या रकमा, तसेच काहींनी न्यायालयाच्या माध्यमातून दोनदा लाभ मिळवला का, याची पडताळणी करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन विभागाला दिले होते.

सदर आदेशानुसार जिल्ह्यातील १९७६ पूर्वीच्या सहा प्रकल्पांपैकी पानशेत, वरसगाव, नाझरे आणि पवना या धरण प्रकल्पांमधील बाधितांना देण्यात आलेल्या मोबदल्यांची चौकशी जिल्हा पुनर्वसन विभागाकडून सुरू केली आहे. उजनी प्रकल्पातील बाधितांना सोलापूर जिल्ह्यात तर वीर धरणाच्या बाधितांना सातारा जिल्ह्यात मोबदला देण्यात आला होता.

जिल्ह्यातील या चार प्रकल्पग्रस्तांना एकूण ४ हजार २० वाटप आदेश अर्थात प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला देण्यात आला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर तत्कालिन निवाड्यानुसार या मूळ प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत सुमारे ७० टक्के अर्थात २ हजार ८०० आदेश तपासण्यात आले आहेत. त्यातील ३० टक्के अर्थात ९०० नावे जुळली आहेत. याचाच अर्थ जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार मोबदला दिलेले प्रकल्पग्रस्त खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. उर्वरित नावांची संबंधित तहसीलदारांकडून गावपातळीवर चौकशी सुरू करण्यात आली आहे. यातील काही प्रकल्पग्रस्त मृत झाले असल्याने त्यांच्या वारसांची चौकशी करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शिल्लक राहिलेल्या ३० टक्के आदेशांचीही पडताळणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

 

ही चौकशी पूर्ण करण्यासाठी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने फेब्रुवारीअखेरची मुदत दिली आहे. मात्र, या मुदतीत ही चौकशी पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे ही मुदत ३१ मार्च करावी, अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडून विभागाला करण्यात आली आहे. - स्वप्नील मोरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीKoyana Damकोयना धरण