शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST

आंबेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम आदिवासी भागातील भातशेती, भातपिके, रस्ते आणि पूल यांचे माेठे नुकसान झाले. याची पाहणी गृहमंत्री ...

आंबेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम आदिवासी भागातील भातशेती, भातपिके, रस्ते आणि पूल यांचे माेठे नुकसान झाले. याची पाहणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी केली. या वेळी त्यांनी उगलेवाडी गोहे, चिखली, तळेघर, कुशिरे, माळीण, बोरघर, डिंभे या गावांना भेटी देत तेथील नागरिकांची संवाद साधला. या वेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या पूर्वा वळसे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम, माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, जिल्हा परिषद सदस्या रूपाली जगदाळे, पंचायत समिती सदस्या इंदूताई लोहकरे, प्रकाश घोलप, मारुती लोहकरे, सलिम तांबोळी, मारुती केंगले, भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष सुरेश कौदरे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे, रत्नाकर कोडीलकर, दत्ता कौदरे, प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, कार्यकारी अभियंता बी. एन. बहीर, तहसीलदार रमा जोशी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यात माळीणसारखी पाच गावे धोकाग्रस्त आहेत. ह्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. यासाठी कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांचे विमा काढण्यासाठी गावोगावी माणसे नेमावीत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. यातून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. वाहून गेलेले रस्ते व पुलांचे काम लवकरात लवकर सुरू करा. आदिवासी भागातील आदिवासी बांधवांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता कोरोणा लसीकरण करून घ्यावे. तळेघर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएम सुरु केले जाईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

चौकट

आदिवासी विकास महामंडळ घाट्यात असल्यामुळे हिरडा खरेदी बंद केली आहे. शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळावर अवलंबून न राहता वेगवेगळे पर्याय शोधले पाहिजे. आदिवासी लोकांनी हिरडा प्रक्रिया व हिरड्याच्या बाजार पेठेत उतरण्याची तयारी केली पाहिजे. - दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

फोटो : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात झालेल्या शेतीच्या व बांधबंदिस्तांच्या नुकसानीची पाहणी करताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.