शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पावसामुळे आवक घटली, भाज्यांनी शंभरी ओलांडली; पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर, गड्डी ७० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:03 IST

राज्यातील काही भागांत जोरदार पावसामुळे भाज्यांची काढणी थांबली असून काही भागांत पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले आहे

पुणे : मागील आठवड्यात पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यात काही भाज्यांचे नुकसान झाले आहे, तर काही भाज्यांची तोडणी थांबली आहे. त्यामुळे एकीकडे बाजारातील फळभाज्यांची आवक घटली असून दुसरीकडे ग्राहकांकडून भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बहुतांश प्रकारच्या भाज्यांच्या दराने शंभरी ओलांडली आहे. भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसामुळे दराची स्थिती काही दिवस टिकून राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.

मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात इतर वेळी राज्य आणि परराज्यातून सुमारे ९० ट्रकची आवक होते. गेल्या काही दिवसांत ही आवक घटली आहे. राज्यातील काही भागांत जोरदार पावसामुळे भाज्यांची काढणी थांबली आहे, तर काही भागांत पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले आहे. तसेच सद्यस्थितीत बाजारात विक्रीसाठी दाखल होत असलेल्या भाज्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या मालाचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या मालाला अधिकचा दर मिळत असल्याने सध्या पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.पावसाच्या विश्रांतीनंतर ही भाज्या महाग

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुणे जिल्ह्यासह विभागात जोरदार ते मुसळधार पाऊस पडला. या पावसात काढणीच्या आलेल्या भाज्यांची तोडणी न करता आल्यामुळे नुकसान झाले. तसेच पालेभाज्यांचेही मोठे नुकसान झाले. मध्येच चार दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पावसातून शिल्लक राहिलेल्या भाज्यांची तोडणी सुरू झाली होती. मात्र, पुन्हा सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढणार नसल्याचे दरात वाढ राहील असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

भाज्यांचे किलोचे दर

गवार : १२०शेवगा : १०० ते १२०मटार : १२० ते १६०दोडका : १०० ते १२०भेंडी : १०० ते १२०सिमला मिरची : १०० ते १२०

मेथीची जुडी ७० रुपये; सामान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब

पावसाला सुरुवात झाली की, पालेभाज्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळत नाही. तसेच चांगल्या दर्जाच्या भाज्यांची आवक कमी झाल्याने परिणामी दरवाढ प्रचंड प्रमाणात होते. यामुळे गुरुवारी किरकोळ बाजारात मेथीच्या गड्डीची ६० ते ७० रुपयांनी विक्री करण्यात आली. आतापर्यंतचा हा उच्चांकी दर असल्याचे किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले. तसेच कोथिंबीर, पालक, अंबाडी, कांदापात या पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत. या भाज्यांच्या गड्डीचा दर ३० ते ४० रुपयापर्यंत गेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून पालेभाज्यादेखील गाबय झाल्या असल्याने सामान्यांनी जगावे तरी कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेvegetableभाज्याfoodअन्नRainपाऊसweatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्यWomenमहिलाMONEYपैसा