शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

पावसामुळे आवक घटली, भाज्यांनी शंभरी ओलांडली; पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर, गड्डी ७० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:03 IST

राज्यातील काही भागांत जोरदार पावसामुळे भाज्यांची काढणी थांबली असून काही भागांत पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले आहे

पुणे : मागील आठवड्यात पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यात काही भाज्यांचे नुकसान झाले आहे, तर काही भाज्यांची तोडणी थांबली आहे. त्यामुळे एकीकडे बाजारातील फळभाज्यांची आवक घटली असून दुसरीकडे ग्राहकांकडून भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बहुतांश प्रकारच्या भाज्यांच्या दराने शंभरी ओलांडली आहे. भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसामुळे दराची स्थिती काही दिवस टिकून राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.

मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात इतर वेळी राज्य आणि परराज्यातून सुमारे ९० ट्रकची आवक होते. गेल्या काही दिवसांत ही आवक घटली आहे. राज्यातील काही भागांत जोरदार पावसामुळे भाज्यांची काढणी थांबली आहे, तर काही भागांत पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले आहे. तसेच सद्यस्थितीत बाजारात विक्रीसाठी दाखल होत असलेल्या भाज्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या मालाचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या मालाला अधिकचा दर मिळत असल्याने सध्या पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.पावसाच्या विश्रांतीनंतर ही भाज्या महाग

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुणे जिल्ह्यासह विभागात जोरदार ते मुसळधार पाऊस पडला. या पावसात काढणीच्या आलेल्या भाज्यांची तोडणी न करता आल्यामुळे नुकसान झाले. तसेच पालेभाज्यांचेही मोठे नुकसान झाले. मध्येच चार दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पावसातून शिल्लक राहिलेल्या भाज्यांची तोडणी सुरू झाली होती. मात्र, पुन्हा सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढणार नसल्याचे दरात वाढ राहील असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

भाज्यांचे किलोचे दर

गवार : १२०शेवगा : १०० ते १२०मटार : १२० ते १६०दोडका : १०० ते १२०भेंडी : १०० ते १२०सिमला मिरची : १०० ते १२०

मेथीची जुडी ७० रुपये; सामान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब

पावसाला सुरुवात झाली की, पालेभाज्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळत नाही. तसेच चांगल्या दर्जाच्या भाज्यांची आवक कमी झाल्याने परिणामी दरवाढ प्रचंड प्रमाणात होते. यामुळे गुरुवारी किरकोळ बाजारात मेथीच्या गड्डीची ६० ते ७० रुपयांनी विक्री करण्यात आली. आतापर्यंतचा हा उच्चांकी दर असल्याचे किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले. तसेच कोथिंबीर, पालक, अंबाडी, कांदापात या पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत. या भाज्यांच्या गड्डीचा दर ३० ते ४० रुपयापर्यंत गेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून पालेभाज्यादेखील गाबय झाल्या असल्याने सामान्यांनी जगावे तरी कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेvegetableभाज्याfoodअन्नRainपाऊसweatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्यWomenमहिलाMONEYपैसा