शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

उजनी पाणी प्रश्न पुन्हा पेटला! धरणाच्या गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 6:28 PM

मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

ठळक मुद्देबळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक अनिल खोत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पांठीबा देत असल्याचे पत्र आंदोलकांना दिले

बाभुळगाव: इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी पाच टीएमसी पाणी मंजुरीचा आदेश शासनाने रद्द केला आहे. याप्रकरणी पुनर्विचार होऊन शासनाने रद्द केलेला आदेश पूर्ववत करून इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा पाणी प्रश्न तात्काळ निकालात काढण्यात यावा. अशा काही मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि शेतकऱ्यांनी उजनी धरण तरटगाव गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.  मागण्या मान्य झाल्याशिवाय शेतकरी मागे हटणार नसल्याचे पार्टीचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाच टीएमसी पाणी रद्द आदेशाचा पुनर्विचार व्हावा, उजनीतून मराठवाड्याला देण्यात येणारे २१ टीएमसी पाणी तात्काळ बंद करण्यात यावे, सोलापूरसाठी बेकायदेशीर सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात यावे. सोलापूर जिल्ह्यात धरणग्रस्तांच्या गावगुंडानी बळकावलेल्या जमिनी धरणग्रस्तांना परत करण्यात याव्यात. या मागण्यांसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे.

बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक अनिल खोत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पांठीबा देत असल्याचे पत्र आंदोलकांना यावेळी दिले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूरSolapurसोलापूरDamधरण