शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

रेशनवर धान्य मिळेना, चूल पेटणार तरी कशी? नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:16 IST

धान्यवाटप करण्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आता रेशन दुकानदार संघटनेने केली आहे

पुणे : रेशनवरील गहू आणि तांदूळ वेळेत मिळत नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. धान्याची उचल वेळेत न केल्याने अन्नधान्य पुरवठा अधिकारी कार्यालयाने धान्याची उचल उशिरा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मंत्रालयातील अन्नधान्य पुरवठा विभागाकडे केली आहे. नोव्हेंबरचे धान्य महिनाअखेरपर्यंत मिळत असल्यास धान्यवाटप कसे करावे, असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. त्यामुळे धान्यवाटप करण्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आता रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.

शहरात गेल्या तीन महिन्यांपासून धान्यवाटप वेळेत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच सप्टेंबरमध्येही तांदळाचे पूर्ण वाटप झाले नव्हते. शहरासाठी महिन्याला ४ हजार टन तांदळाची गरज असते. मात्र, सप्टेंबरमधील ११० टन तांदूळ मिळाला नव्हता. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना तांदळाचे वाटप झालेच नाही. तरीदेखील या लाभार्थ्यांना सप्टेंबरमधील तांदळाचे वाटप ऑक्टोबरमध्ये करण्याची परवानगी दुकानदारांना देण्यात आली नाही. हीच स्थिती ऑक्टोबरमध्येही कायम होती. ४ हजार टनांपैकी गोंदिया जिल्ह्यातून १ हजार ९०० टन तांदूळ मिळणार होता. ऑक्टोबरचे १९ दिवस संपले तरीदेखील हा तांदूळ अद्याप शहरात दाखल झालेला नव्हता. ऑक्टोबरअखेरीस दिवाळी सण असतानाही ग्राहकांना धान्य मिळत नसल्याने त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले होते. यामुळे ग्राहक व दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते.

नोव्हेंबरमध्येही धान्यवाटप उशिरा सुरू झाले आहे. बुधवारपर्यंत (दि. २१) अनेक दुकानांमध्ये गहू व तांदूळ दिला जात आहे. हे धान्य ३० नोव्हेंबरपर्यंतच वितरित करावे लागणार आहे. ई पॉस मशिनमुळे तांत्रिकदृष्ट्या मात्र, हे शक्य नसल्याने धान्यवाटप करण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी केली आहे. नोव्हेंबरमध्ये गहूदेखील वेळेत मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून वेळेवर धान्य मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांचा रोष दुकानदारांना सहन करावा लागतो. धान्यवाटप नीट होत नसल्याचे कारण देत दुकानांची तपासणी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. एकीकडे धान्यवाटप कोट्यानुसार न देता दुसरीकडे चौकशी केली जात आहे.

धान्याची वेळेत उचल झाली नाही हे खरे 

याबाबत प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ म्हणाले, “सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचा धान्याचा कोटा दुकानदारांपर्यंत पोहचला होता. नोव्हेंबरचाही धान्य कोटा दिला आहे. मात्र, धान्याची वेळेत उचल झाली नाही हे खरे आहे. त्याबाबत धान्य उचलणाऱ्या कंत्राटदाराला आत्तापर्यंत दर तीन दिवसाला एक अशा चार नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच या संदर्भातील अहवाल मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणीदेखील या प्रस्तावात करण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून धान्यवाटपाची साखळी तुटली आहे. महिन्याचे धान्य हे आदल्या महिन्याच्या अखेरीस मिळणे अपेक्षित असते. धान्याची उचल उशिरा झाल्यास जास्तीत जास्त तीन तारखेपर्यंत धान्य मिळाल्यास सात तारखेपासून धान्य वाटपास सुरुवात करता येते. दर महिन्याच्या सात तारखेला अन्नसुरक्षा दिन साजरा करून धान्य वाटपाला सुरुवात करण्यात येते. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून धान्य वेळेतच मिळत नसल्याने ग्राहकांना वितरण वेळेत होत नाही. - गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे

डिसेंबरचे धान्यवाटप धान्य उचल सोमवारपासून सुरू झाली असून, पुढील आठवड्यात दुकानदारांपर्यंत धान्य पोहोच केले जाणार आहे. - प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारfoodअन्नHealthआरोग्यGovernmentसरकारMONEYपैसा