शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

रेशनवर धान्य मिळेना, चूल पेटणार तरी कशी? नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:16 IST

धान्यवाटप करण्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आता रेशन दुकानदार संघटनेने केली आहे

पुणे : रेशनवरील गहू आणि तांदूळ वेळेत मिळत नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. धान्याची उचल वेळेत न केल्याने अन्नधान्य पुरवठा अधिकारी कार्यालयाने धान्याची उचल उशिरा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मंत्रालयातील अन्नधान्य पुरवठा विभागाकडे केली आहे. नोव्हेंबरचे धान्य महिनाअखेरपर्यंत मिळत असल्यास धान्यवाटप कसे करावे, असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. त्यामुळे धान्यवाटप करण्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आता रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.

शहरात गेल्या तीन महिन्यांपासून धान्यवाटप वेळेत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच सप्टेंबरमध्येही तांदळाचे पूर्ण वाटप झाले नव्हते. शहरासाठी महिन्याला ४ हजार टन तांदळाची गरज असते. मात्र, सप्टेंबरमधील ११० टन तांदूळ मिळाला नव्हता. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना तांदळाचे वाटप झालेच नाही. तरीदेखील या लाभार्थ्यांना सप्टेंबरमधील तांदळाचे वाटप ऑक्टोबरमध्ये करण्याची परवानगी दुकानदारांना देण्यात आली नाही. हीच स्थिती ऑक्टोबरमध्येही कायम होती. ४ हजार टनांपैकी गोंदिया जिल्ह्यातून १ हजार ९०० टन तांदूळ मिळणार होता. ऑक्टोबरचे १९ दिवस संपले तरीदेखील हा तांदूळ अद्याप शहरात दाखल झालेला नव्हता. ऑक्टोबरअखेरीस दिवाळी सण असतानाही ग्राहकांना धान्य मिळत नसल्याने त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले होते. यामुळे ग्राहक व दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते.

नोव्हेंबरमध्येही धान्यवाटप उशिरा सुरू झाले आहे. बुधवारपर्यंत (दि. २१) अनेक दुकानांमध्ये गहू व तांदूळ दिला जात आहे. हे धान्य ३० नोव्हेंबरपर्यंतच वितरित करावे लागणार आहे. ई पॉस मशिनमुळे तांत्रिकदृष्ट्या मात्र, हे शक्य नसल्याने धान्यवाटप करण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी केली आहे. नोव्हेंबरमध्ये गहूदेखील वेळेत मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून वेळेवर धान्य मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांचा रोष दुकानदारांना सहन करावा लागतो. धान्यवाटप नीट होत नसल्याचे कारण देत दुकानांची तपासणी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. एकीकडे धान्यवाटप कोट्यानुसार न देता दुसरीकडे चौकशी केली जात आहे.

धान्याची वेळेत उचल झाली नाही हे खरे 

याबाबत प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ म्हणाले, “सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचा धान्याचा कोटा दुकानदारांपर्यंत पोहचला होता. नोव्हेंबरचाही धान्य कोटा दिला आहे. मात्र, धान्याची वेळेत उचल झाली नाही हे खरे आहे. त्याबाबत धान्य उचलणाऱ्या कंत्राटदाराला आत्तापर्यंत दर तीन दिवसाला एक अशा चार नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच या संदर्भातील अहवाल मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणीदेखील या प्रस्तावात करण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून धान्यवाटपाची साखळी तुटली आहे. महिन्याचे धान्य हे आदल्या महिन्याच्या अखेरीस मिळणे अपेक्षित असते. धान्याची उचल उशिरा झाल्यास जास्तीत जास्त तीन तारखेपर्यंत धान्य मिळाल्यास सात तारखेपासून धान्य वाटपास सुरुवात करता येते. दर महिन्याच्या सात तारखेला अन्नसुरक्षा दिन साजरा करून धान्य वाटपाला सुरुवात करण्यात येते. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून धान्य वेळेतच मिळत नसल्याने ग्राहकांना वितरण वेळेत होत नाही. - गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे

डिसेंबरचे धान्यवाटप धान्य उचल सोमवारपासून सुरू झाली असून, पुढील आठवड्यात दुकानदारांपर्यंत धान्य पोहोच केले जाणार आहे. - प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारfoodअन्नHealthआरोग्यGovernmentसरकारMONEYपैसा