शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रेशनवर धान्य मिळेना, चूल पेटणार तरी कशी? नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:16 IST

धान्यवाटप करण्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आता रेशन दुकानदार संघटनेने केली आहे

पुणे : रेशनवरील गहू आणि तांदूळ वेळेत मिळत नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. धान्याची उचल वेळेत न केल्याने अन्नधान्य पुरवठा अधिकारी कार्यालयाने धान्याची उचल उशिरा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मंत्रालयातील अन्नधान्य पुरवठा विभागाकडे केली आहे. नोव्हेंबरचे धान्य महिनाअखेरपर्यंत मिळत असल्यास धान्यवाटप कसे करावे, असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. त्यामुळे धान्यवाटप करण्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आता रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.

शहरात गेल्या तीन महिन्यांपासून धान्यवाटप वेळेत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच सप्टेंबरमध्येही तांदळाचे पूर्ण वाटप झाले नव्हते. शहरासाठी महिन्याला ४ हजार टन तांदळाची गरज असते. मात्र, सप्टेंबरमधील ११० टन तांदूळ मिळाला नव्हता. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना तांदळाचे वाटप झालेच नाही. तरीदेखील या लाभार्थ्यांना सप्टेंबरमधील तांदळाचे वाटप ऑक्टोबरमध्ये करण्याची परवानगी दुकानदारांना देण्यात आली नाही. हीच स्थिती ऑक्टोबरमध्येही कायम होती. ४ हजार टनांपैकी गोंदिया जिल्ह्यातून १ हजार ९०० टन तांदूळ मिळणार होता. ऑक्टोबरचे १९ दिवस संपले तरीदेखील हा तांदूळ अद्याप शहरात दाखल झालेला नव्हता. ऑक्टोबरअखेरीस दिवाळी सण असतानाही ग्राहकांना धान्य मिळत नसल्याने त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले होते. यामुळे ग्राहक व दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते.

नोव्हेंबरमध्येही धान्यवाटप उशिरा सुरू झाले आहे. बुधवारपर्यंत (दि. २१) अनेक दुकानांमध्ये गहू व तांदूळ दिला जात आहे. हे धान्य ३० नोव्हेंबरपर्यंतच वितरित करावे लागणार आहे. ई पॉस मशिनमुळे तांत्रिकदृष्ट्या मात्र, हे शक्य नसल्याने धान्यवाटप करण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी केली आहे. नोव्हेंबरमध्ये गहूदेखील वेळेत मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून वेळेवर धान्य मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांचा रोष दुकानदारांना सहन करावा लागतो. धान्यवाटप नीट होत नसल्याचे कारण देत दुकानांची तपासणी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. एकीकडे धान्यवाटप कोट्यानुसार न देता दुसरीकडे चौकशी केली जात आहे.

धान्याची वेळेत उचल झाली नाही हे खरे 

याबाबत प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ म्हणाले, “सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचा धान्याचा कोटा दुकानदारांपर्यंत पोहचला होता. नोव्हेंबरचाही धान्य कोटा दिला आहे. मात्र, धान्याची वेळेत उचल झाली नाही हे खरे आहे. त्याबाबत धान्य उचलणाऱ्या कंत्राटदाराला आत्तापर्यंत दर तीन दिवसाला एक अशा चार नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच या संदर्भातील अहवाल मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणीदेखील या प्रस्तावात करण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून धान्यवाटपाची साखळी तुटली आहे. महिन्याचे धान्य हे आदल्या महिन्याच्या अखेरीस मिळणे अपेक्षित असते. धान्याची उचल उशिरा झाल्यास जास्तीत जास्त तीन तारखेपर्यंत धान्य मिळाल्यास सात तारखेपासून धान्य वाटपास सुरुवात करता येते. दर महिन्याच्या सात तारखेला अन्नसुरक्षा दिन साजरा करून धान्य वाटपाला सुरुवात करण्यात येते. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून धान्य वेळेतच मिळत नसल्याने ग्राहकांना वितरण वेळेत होत नाही. - गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे

डिसेंबरचे धान्यवाटप धान्य उचल सोमवारपासून सुरू झाली असून, पुढील आठवड्यात दुकानदारांपर्यंत धान्य पोहोच केले जाणार आहे. - प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारfoodअन्नHealthआरोग्यGovernmentसरकारMONEYपैसा