शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

रेशनवर धान्य मिळेना, चूल पेटणार तरी कशी? नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:16 IST

धान्यवाटप करण्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आता रेशन दुकानदार संघटनेने केली आहे

पुणे : रेशनवरील गहू आणि तांदूळ वेळेत मिळत नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. धान्याची उचल वेळेत न केल्याने अन्नधान्य पुरवठा अधिकारी कार्यालयाने धान्याची उचल उशिरा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मंत्रालयातील अन्नधान्य पुरवठा विभागाकडे केली आहे. नोव्हेंबरचे धान्य महिनाअखेरपर्यंत मिळत असल्यास धान्यवाटप कसे करावे, असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. त्यामुळे धान्यवाटप करण्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आता रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.

शहरात गेल्या तीन महिन्यांपासून धान्यवाटप वेळेत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच सप्टेंबरमध्येही तांदळाचे पूर्ण वाटप झाले नव्हते. शहरासाठी महिन्याला ४ हजार टन तांदळाची गरज असते. मात्र, सप्टेंबरमधील ११० टन तांदूळ मिळाला नव्हता. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना तांदळाचे वाटप झालेच नाही. तरीदेखील या लाभार्थ्यांना सप्टेंबरमधील तांदळाचे वाटप ऑक्टोबरमध्ये करण्याची परवानगी दुकानदारांना देण्यात आली नाही. हीच स्थिती ऑक्टोबरमध्येही कायम होती. ४ हजार टनांपैकी गोंदिया जिल्ह्यातून १ हजार ९०० टन तांदूळ मिळणार होता. ऑक्टोबरचे १९ दिवस संपले तरीदेखील हा तांदूळ अद्याप शहरात दाखल झालेला नव्हता. ऑक्टोबरअखेरीस दिवाळी सण असतानाही ग्राहकांना धान्य मिळत नसल्याने त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले होते. यामुळे ग्राहक व दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते.

नोव्हेंबरमध्येही धान्यवाटप उशिरा सुरू झाले आहे. बुधवारपर्यंत (दि. २१) अनेक दुकानांमध्ये गहू व तांदूळ दिला जात आहे. हे धान्य ३० नोव्हेंबरपर्यंतच वितरित करावे लागणार आहे. ई पॉस मशिनमुळे तांत्रिकदृष्ट्या मात्र, हे शक्य नसल्याने धान्यवाटप करण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी केली आहे. नोव्हेंबरमध्ये गहूदेखील वेळेत मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून वेळेवर धान्य मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांचा रोष दुकानदारांना सहन करावा लागतो. धान्यवाटप नीट होत नसल्याचे कारण देत दुकानांची तपासणी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. एकीकडे धान्यवाटप कोट्यानुसार न देता दुसरीकडे चौकशी केली जात आहे.

धान्याची वेळेत उचल झाली नाही हे खरे 

याबाबत प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ म्हणाले, “सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचा धान्याचा कोटा दुकानदारांपर्यंत पोहचला होता. नोव्हेंबरचाही धान्य कोटा दिला आहे. मात्र, धान्याची वेळेत उचल झाली नाही हे खरे आहे. त्याबाबत धान्य उचलणाऱ्या कंत्राटदाराला आत्तापर्यंत दर तीन दिवसाला एक अशा चार नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच या संदर्भातील अहवाल मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणीदेखील या प्रस्तावात करण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून धान्यवाटपाची साखळी तुटली आहे. महिन्याचे धान्य हे आदल्या महिन्याच्या अखेरीस मिळणे अपेक्षित असते. धान्याची उचल उशिरा झाल्यास जास्तीत जास्त तीन तारखेपर्यंत धान्य मिळाल्यास सात तारखेपासून धान्य वाटपास सुरुवात करता येते. दर महिन्याच्या सात तारखेला अन्नसुरक्षा दिन साजरा करून धान्य वाटपाला सुरुवात करण्यात येते. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून धान्य वेळेतच मिळत नसल्याने ग्राहकांना वितरण वेळेत होत नाही. - गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे

डिसेंबरचे धान्यवाटप धान्य उचल सोमवारपासून सुरू झाली असून, पुढील आठवड्यात दुकानदारांपर्यंत धान्य पोहोच केले जाणार आहे. - प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारfoodअन्नHealthआरोग्यGovernmentसरकारMONEYपैसा