शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य ते करत राहीन...! क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे घेणार हातात नांगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:53 IST

अजिंक्य रहाणे हा आता शेती उद्योगात उतरणार असून, शेती क्षेत्रातील स्टार्ट अप्स आणि लघू उद्योजकांच्या वाढीस मदत करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे

पुणे : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे हा आता शेती उद्योगात उतरणार असून, शेती क्षेत्रातील स्टार्ट अप्स आणि लघू उद्योजकांच्या वाढीस मदत करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे. अजिंक्य रहाणे आणि सहकारी काही कृषी तंत्रज्ञान स्टार्ट अप्समध्ये बियाणे गुंतवणूक करतील. यासाठी ते १ कोटी रुपयांच्या निधीपासून सुरुवात करतील. पुढील काही महिन्यांत आणि वर्षांमध्ये येण्यासाठी आणि फंडाचा आकार वाढविण्यासाठी आणि प्रभाव वाढविण्यासाठी त्यातून इतर गुंतवणूकदारांना प्रेरणा मिळणार आहे.

महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला पाठिंबा आणि बळकट करण्याच्या ध्येयाचा एक भाग म्हणून मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चर या क्षेत्रातील काम करीत आहे. त्या निमित्ताने कृषी तंत्रज्ञान नवउद्यमींसाठी उपक्रमाचे उद्घाटन अजिंक्य रहाणे याच्या हस्ते झाले. एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबने, क्रीडा पत्रकार विक्रम साठ्ये यांनी रहाणे यांच्याशी संवाद साधला.

सन २०१४-१५ मध्ये श्रीलंकेत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत कळले. तेव्हापासून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार होता. त्यानंतर, एमसीसीआयएच्या संपर्कात आल्यावर काहीतरी करण्याच्या विचाराला रचनात्मक रूप मिळाले आहे. आपले शेतकरी, कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे हे खरे हीरो आहेत. मला गुंतवणुकीतून काहीही अपेक्षा नाही. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची भावना आहे. नवउद्यमींची काम करण्याची किती तळमळ आहे, त्याचा किती प्रभाव आहे हे महत्त्वाचे आहे, अशी भावना अजिंक्यने व्यक्त केली.

अडचणीच्या काळात स्वतःवर आणि प्रत्येक सहकाऱ्यावर विश्वास ठेवावा लागतो. ॲडलेडचा सामना हरल्यावर प्रत्येकावर विश्वास ठेवून कर्णधार म्हणून कामगिरी करून घ्यावी लागली. निकालाचा विचार न करता, सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. यश-अपयश म्हणजे प्रसिद्धी, सामनावीर होणे, धावा करणे एवढेच नाही. शतक केले, शून्यावर बाद झालो, यापेक्षा मला जे आवडते ते करत राहणे, उणिवा दूर करत राहणे, कौशल्य वाढवत राहणे आवश्यक आहे. आपले अपयश आपण मान्य केले पाहिजे, असे रहाणे यांनी सांगितले.

काेरोना काळात वेगवेगळ्या पातळीवर मदतीचे काम करत होतो. त्यावेळी अजिंक्यने मदतीचा हात दिला होता. एमसीसीआयएतर्फे काही नवउद्यमींची निवड केली जाईल. त्यातून काही नवउद्यमींना अजिंक्यकडून भांडवल उपलब्ध करून दिले जाईल, असे गिरबने यांनी सांगितले.

अपयश आल्यावर शून्यापासूनच सुरुवात करावी

शेतकरी कधी निवृत्त होत नाही. त्यामुळे माझ्याकडून शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य आहे, ते करीत राहीन. मी शेतकरी कुटुंबातला आहे. क्रिकेट आणि शेतीमध्ये एक साम्य आहे. नुकसान झाले की, शून्यातून सुरुवात करावी लागते, तसेच क्रिकेटमध्येही आहे. अपयश आल्यावर शून्यापासूनच सुरुवात करावी लागते. - अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू.

टॅग्स :FarmerशेतकरीAjinkya Rahaneअजिंक्य रहाणेSocialसामाजिकfoodअन्नMONEYपैसाbusinessव्यवसाय