शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

'शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य ते करत राहीन...! क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे घेणार हातात नांगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:53 IST

अजिंक्य रहाणे हा आता शेती उद्योगात उतरणार असून, शेती क्षेत्रातील स्टार्ट अप्स आणि लघू उद्योजकांच्या वाढीस मदत करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे

पुणे : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे हा आता शेती उद्योगात उतरणार असून, शेती क्षेत्रातील स्टार्ट अप्स आणि लघू उद्योजकांच्या वाढीस मदत करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे. अजिंक्य रहाणे आणि सहकारी काही कृषी तंत्रज्ञान स्टार्ट अप्समध्ये बियाणे गुंतवणूक करतील. यासाठी ते १ कोटी रुपयांच्या निधीपासून सुरुवात करतील. पुढील काही महिन्यांत आणि वर्षांमध्ये येण्यासाठी आणि फंडाचा आकार वाढविण्यासाठी आणि प्रभाव वाढविण्यासाठी त्यातून इतर गुंतवणूकदारांना प्रेरणा मिळणार आहे.

महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला पाठिंबा आणि बळकट करण्याच्या ध्येयाचा एक भाग म्हणून मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चर या क्षेत्रातील काम करीत आहे. त्या निमित्ताने कृषी तंत्रज्ञान नवउद्यमींसाठी उपक्रमाचे उद्घाटन अजिंक्य रहाणे याच्या हस्ते झाले. एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबने, क्रीडा पत्रकार विक्रम साठ्ये यांनी रहाणे यांच्याशी संवाद साधला.

सन २०१४-१५ मध्ये श्रीलंकेत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत कळले. तेव्हापासून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार होता. त्यानंतर, एमसीसीआयएच्या संपर्कात आल्यावर काहीतरी करण्याच्या विचाराला रचनात्मक रूप मिळाले आहे. आपले शेतकरी, कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे हे खरे हीरो आहेत. मला गुंतवणुकीतून काहीही अपेक्षा नाही. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची भावना आहे. नवउद्यमींची काम करण्याची किती तळमळ आहे, त्याचा किती प्रभाव आहे हे महत्त्वाचे आहे, अशी भावना अजिंक्यने व्यक्त केली.

अडचणीच्या काळात स्वतःवर आणि प्रत्येक सहकाऱ्यावर विश्वास ठेवावा लागतो. ॲडलेडचा सामना हरल्यावर प्रत्येकावर विश्वास ठेवून कर्णधार म्हणून कामगिरी करून घ्यावी लागली. निकालाचा विचार न करता, सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. यश-अपयश म्हणजे प्रसिद्धी, सामनावीर होणे, धावा करणे एवढेच नाही. शतक केले, शून्यावर बाद झालो, यापेक्षा मला जे आवडते ते करत राहणे, उणिवा दूर करत राहणे, कौशल्य वाढवत राहणे आवश्यक आहे. आपले अपयश आपण मान्य केले पाहिजे, असे रहाणे यांनी सांगितले.

काेरोना काळात वेगवेगळ्या पातळीवर मदतीचे काम करत होतो. त्यावेळी अजिंक्यने मदतीचा हात दिला होता. एमसीसीआयएतर्फे काही नवउद्यमींची निवड केली जाईल. त्यातून काही नवउद्यमींना अजिंक्यकडून भांडवल उपलब्ध करून दिले जाईल, असे गिरबने यांनी सांगितले.

अपयश आल्यावर शून्यापासूनच सुरुवात करावी

शेतकरी कधी निवृत्त होत नाही. त्यामुळे माझ्याकडून शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य आहे, ते करीत राहीन. मी शेतकरी कुटुंबातला आहे. क्रिकेट आणि शेतीमध्ये एक साम्य आहे. नुकसान झाले की, शून्यातून सुरुवात करावी लागते, तसेच क्रिकेटमध्येही आहे. अपयश आल्यावर शून्यापासूनच सुरुवात करावी लागते. - अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू.

टॅग्स :FarmerशेतकरीAjinkya Rahaneअजिंक्य रहाणेSocialसामाजिकfoodअन्नMONEYपैसाbusinessव्यवसाय