शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'मला कोणाचीच भीती नाही', भाई, दादांची शाइन; मोक्कातील आरोपींना मिळतोय जामीन

By नम्रता फडणीस | Updated: January 16, 2025 15:10 IST

पुण्याच्या रस्त्यावर उतरून वाहनांची तोडफोड, कोयत्याचा धाक दाखवून दहशत, खंडणी मागण्यापर्यंतची भयानक कृत्य करणाऱ्यांना मिळतोय जामीन

पुणे : सोनसाखळी चोरीची घटना असो की, मारहाणीचे प्रकार असोत, अशा किरकोळ गुन्ह्यांमध्ये देखील पोलिसांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली जात असल्याने या कायद्याचे गांभीर्यच आरोपींमध्ये राहिलेले नाही. निव्वळ गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आरोपींवर मोक्काची कारवाई करून पोलिस स्वत:ची पाठ थोपटून घेत असले, तरी न्यायालयात आरोपींवरील गुन्हाच सिद्ध होत नसल्याने मोक्कातील आरोपींना जामीन मिळत असल्याची वस्तुस्थिती आहे. गेल्या पाच वर्षांत ८०१ आरोपींना जामीन मिळाल्याने ‘भाई’ ‘दादा’ यांचे चांगलेच फावले आहे.

मी इथला भाई आहे, मला कोणाचीच भीती नाही, असे सांगत बिनधास्तपणे सराईत आरोपी पुण्याच्या रस्त्यावर उतरत असून, वाहनांची तोडफोड करणे, कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरविणे किंवा अगदी खंडणी मागण्यापर्यंतची भयानक कृत्य केली जात आहेत. विशेष म्हणजे यात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग हा यातील एक चिंतेचा विषय बनला आहे. या मुलांवर मोक्काअंतर्गत कारवाई होत नाही आणि या मुलांना जामीनही लवकर मिळतो, अशा मानसिकतेमुळे टोळीप्रमुखांकडून सर्रासपणे बहुतांश गुन्हेगारी कृत्यात अल्पवयीन मुलांना सहभागी करून घेतले जात आहे. गेल्या काही वर्षांत पुण्यातील काही घटनांमधून ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी उचल आरोपीला आणि लाव मोक्का, अशी पोलिसांची भूमिका झाली आहे. मोक्काची शंभरी. पन्नाशी असा गाजावाजा करून काही तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी आपली पाठही थोपटून घेतली खरी; तरीही गुन्हेगारीचा आलेख चढाच राहिला आहे. किरकोळ गुन्ह्यांमध्ये आरोपीवर मोक्का लावला जात असल्यामुळे न्यायालयात आरोपींवरील गुन्हा सिद्ध होण्यास पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे मोक्कातील आरोपी जामिनावर सुटत असल्याचे निरीक्षण वकिलांनी नोंदविले आहे.

आरोपीवर मोक्का कधी लागतो?

एखाद्या आरोपीचे संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध प्रस्थापित झाल्यास मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येते. या कायद्यातील तरतुदीनुसार, अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षांत दोन गुन्ह्यांत आरोपपत्र सादर होणे बंधनकारक आहे. ‘मोक्का’ कायद्यातील २१ (३) या कलमानुसार, आरोपीला अटकपूर्व जामीन मिळत नाही. या कायद्यांतर्गत दोषींना जन्मठेप आणि पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

मोक्कामध्ये आरोपीला जामीन मिळत नाही, मात्र आरोपीवर मोक्का लागतच नसेल, तर काही अपवादात्मक प्रकरणात जामीन द्यावा, अशी तरतूद आहे. पोलिसांनी मोक्काची कलमे जर चुकीच्या पद्धतीने लावली असतील, तर आरोपीला जामीन हा मिळतोच. संघटित गुन्हेगारी, आर्थिक देवाणघेवाण आणि संघटित गुन्हेगारी करून त्या पैशांचा स्वतः:च्या टोळीसाठी आर्थिक फायदा करणे या तीन गोष्टी सिद्ध झाल्या, तरच आरोपींवर मोक्का लावला जातो. मात्र, गुन्हेगाराला आत ठेवायचा म्हणून पोलिसांकडून मोक्का लावला जातो. मोक्का संदर्भातील मूळ गोष्टीच विचारात न घेतल्याने न्यायालयात मोक्का टिकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, यात एखादा मोक्का अंतर्गत कारवाई केलेला तरुण आठ वर्षांनी तुरुंगाबाहेर येतो, तेव्हा त्याला पुन्हा गुन्हेगारीत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. - ॲड. विजयसिंह ठोंबरे, फौजदारी वकील, जिल्हा व सत्र न्यायालय

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयjailतुरुंगadvocateवकिल