शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

नुसता दुष्काळ हाय; पाणी नाय, गाव सोडावं लागेल! पुरंदरच्या नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 13:15 IST

दहा पंधरा दिवसांत संपेल. मग काय करायचे ? गाव सोडावं लागेल, जिकडं पाणी असल तिकडं जावं लागेल, पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थांची व्यथा

श्रीकिशन काळे

पुणे : ‘‘गेल्या तीन-चार वर्षात पाऊसच पडला नाय, नुसता दुष्काळ हाय, आता पाण्यासाठी फिरावं लागतं. नाझरे धरणात हाय थोडं पाणी, पण तेही आता दहा-पंधरा दिवसांत संपेल. मग काय करायचे ? गाव सोडावं लागेल, जिकडं पाणी असल तिकडं जावं लागेल,’’ अशी दुष्काळाची व्यथा पुरंदर तालुक्यातील आणि नाझरे धरणाजवळ राहणाऱ्या ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या तीन-चार वर्षांमध्ये चांगला पाऊस झाला नाही. गेल्या वर्षी केवळ ३३४ मिमी पावसाची नोंद झाली. नाझरे धरणात तर पाणीच साठले नाही. तिथे केवळ मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला पहायला मिळत आहे. नाझरे धरणात पाणी नसल्यामुळे बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यासाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या तीन नळ प्रादेशिक योजना बंद पडल्या आहेत. या योजनांद्वारे २२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता. पण, नाझरे धरणातील पाणी संपल्याने सध्या पाणीपुरवठा थांबवलेला आहे. म्हणून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

नाझरे धरणावर मोरगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पुरंदर तालुक्यातील मावडी तर बारामती तालुक्यातील मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रूक, आंबी खुर्द, भोंडवेवाडी, बाबुर्डी, शेरेवाडी, लोणी भापकर, माळवाडी, काटी, जळगाव कप, जळगाव सुपे, भिलारवाडी, कऱ्हावागज, अंजनगाव या गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो. तर पारगाव- माळशिरस योजनेवर कोळविहरे हे गाव तसेच नाझरे प्रादेशिक योजनेवर नाझरे कप, नाझरे सुपे, पांडेश्वर आदी पाच गावे अवलंबून आहेत. बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यातील २२ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

पूर्वी कधीच नाझरे गावाला आणि परिसरात पाणी कमी पडत नव्हते. पण आता मात्र नदी कोरडी पडली, धरण कोरडे पडलेय. नाझरे गावात पूर्वी छोटा पूल होता. त्यावरून पाणी वाहायचे. म्हणून नवीन मोठा पूल बांधला. आता छोट्या पुलावरून देखील पाणी वाहत नाही. नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे ठाक पडलंय. राजकारणी लोकांनी आता काही तरी सोय करावी. मते मागायला येतील आता. दुष्काळात पाणी नाही मिळालं तर गाव सोडायची पाळी येईल. कुठं तरी जाऊन बिगारी काम करावे लागेल. जनावरांचे लय हाल आहेत. त्यांना पाणी विकत आणावे लागतेय. पिण्याच्या पाण्याचा जारही ३० रुपयांना मिळतोय. विकत घेऊन पाणी प्यावे लागतय. लय अवघड परिस्थिती हाय. - उत्तम शिंदे, ग्रामस्थ, नाझरे गाव

माझ्या चाळीस-पन्नास जित्राब (मेंढ्या) हाय. त्यांना तर पाणी लागतय. चारा नसला तरी एकवेळ ठिकय, पण पाणी पाहिजे. उन्ह एवढं तापतय त्यामुळे अंगातून नुसता घाम येतोय. या नाझरे धरणात तर पाणीच राहिलं नाही. आता नुसता गाळ हाय. दहा दिवस पाणी पुरेल, नंतर काय करायचे हा प्रश्नय. पाणी नाय मिळालं तर गावच सोडावं लागणार. त्याशिवाय पर्यायच नाय. - कामा महानवत, मेंढपाळ

मी लहानपणापासून धरणाजवळच राहतोय. पूर्वी धरण भरलेलं असायचे. आता तीन-चार वर्षे झाली धरणात पाणीच थांबेना. खाली विहिरी, बोअर घेतल्याने पाझर तिकडे जातोय. धरणात गाळ पण लय साठलाय. तो आता काढला जातोय, पण तो गाळबी कोणी घेऊन जाईना. आता यंदा निसर्गाने कृपा केली तर काही तरी होईल. नाय तर लय बेकार अवस्था येईल. रोजगारबी मिळेना कुठे ? पाणी नाही तर काहीच नाय. लोकांनी करायचे तरी काय ? - राजू चंदर बर्डे, ग्रामस्थ, नाझरे गाव

- नाझरे धरणांची क्षमता ०.५९ टीएमसी- गतवर्षी अवघा ३३४ मिलिमीटर पाऊस- गतवर्षी या धरणांत होता ०.३२ टीएमसी पाणीसाठा- आता धरणात ० पाणीसाठा

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरWaterपाणीDamधरणRainपाऊसSocialसामाजिक