शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

नुसता दुष्काळ हाय; पाणी नाय, गाव सोडावं लागेल! पुरंदरच्या नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 13:15 IST

दहा पंधरा दिवसांत संपेल. मग काय करायचे ? गाव सोडावं लागेल, जिकडं पाणी असल तिकडं जावं लागेल, पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थांची व्यथा

श्रीकिशन काळे

पुणे : ‘‘गेल्या तीन-चार वर्षात पाऊसच पडला नाय, नुसता दुष्काळ हाय, आता पाण्यासाठी फिरावं लागतं. नाझरे धरणात हाय थोडं पाणी, पण तेही आता दहा-पंधरा दिवसांत संपेल. मग काय करायचे ? गाव सोडावं लागेल, जिकडं पाणी असल तिकडं जावं लागेल,’’ अशी दुष्काळाची व्यथा पुरंदर तालुक्यातील आणि नाझरे धरणाजवळ राहणाऱ्या ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या तीन-चार वर्षांमध्ये चांगला पाऊस झाला नाही. गेल्या वर्षी केवळ ३३४ मिमी पावसाची नोंद झाली. नाझरे धरणात तर पाणीच साठले नाही. तिथे केवळ मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला पहायला मिळत आहे. नाझरे धरणात पाणी नसल्यामुळे बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यासाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या तीन नळ प्रादेशिक योजना बंद पडल्या आहेत. या योजनांद्वारे २२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता. पण, नाझरे धरणातील पाणी संपल्याने सध्या पाणीपुरवठा थांबवलेला आहे. म्हणून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

नाझरे धरणावर मोरगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पुरंदर तालुक्यातील मावडी तर बारामती तालुक्यातील मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रूक, आंबी खुर्द, भोंडवेवाडी, बाबुर्डी, शेरेवाडी, लोणी भापकर, माळवाडी, काटी, जळगाव कप, जळगाव सुपे, भिलारवाडी, कऱ्हावागज, अंजनगाव या गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो. तर पारगाव- माळशिरस योजनेवर कोळविहरे हे गाव तसेच नाझरे प्रादेशिक योजनेवर नाझरे कप, नाझरे सुपे, पांडेश्वर आदी पाच गावे अवलंबून आहेत. बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यातील २२ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

पूर्वी कधीच नाझरे गावाला आणि परिसरात पाणी कमी पडत नव्हते. पण आता मात्र नदी कोरडी पडली, धरण कोरडे पडलेय. नाझरे गावात पूर्वी छोटा पूल होता. त्यावरून पाणी वाहायचे. म्हणून नवीन मोठा पूल बांधला. आता छोट्या पुलावरून देखील पाणी वाहत नाही. नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे ठाक पडलंय. राजकारणी लोकांनी आता काही तरी सोय करावी. मते मागायला येतील आता. दुष्काळात पाणी नाही मिळालं तर गाव सोडायची पाळी येईल. कुठं तरी जाऊन बिगारी काम करावे लागेल. जनावरांचे लय हाल आहेत. त्यांना पाणी विकत आणावे लागतेय. पिण्याच्या पाण्याचा जारही ३० रुपयांना मिळतोय. विकत घेऊन पाणी प्यावे लागतय. लय अवघड परिस्थिती हाय. - उत्तम शिंदे, ग्रामस्थ, नाझरे गाव

माझ्या चाळीस-पन्नास जित्राब (मेंढ्या) हाय. त्यांना तर पाणी लागतय. चारा नसला तरी एकवेळ ठिकय, पण पाणी पाहिजे. उन्ह एवढं तापतय त्यामुळे अंगातून नुसता घाम येतोय. या नाझरे धरणात तर पाणीच राहिलं नाही. आता नुसता गाळ हाय. दहा दिवस पाणी पुरेल, नंतर काय करायचे हा प्रश्नय. पाणी नाय मिळालं तर गावच सोडावं लागणार. त्याशिवाय पर्यायच नाय. - कामा महानवत, मेंढपाळ

मी लहानपणापासून धरणाजवळच राहतोय. पूर्वी धरण भरलेलं असायचे. आता तीन-चार वर्षे झाली धरणात पाणीच थांबेना. खाली विहिरी, बोअर घेतल्याने पाझर तिकडे जातोय. धरणात गाळ पण लय साठलाय. तो आता काढला जातोय, पण तो गाळबी कोणी घेऊन जाईना. आता यंदा निसर्गाने कृपा केली तर काही तरी होईल. नाय तर लय बेकार अवस्था येईल. रोजगारबी मिळेना कुठे ? पाणी नाही तर काहीच नाय. लोकांनी करायचे तरी काय ? - राजू चंदर बर्डे, ग्रामस्थ, नाझरे गाव

- नाझरे धरणांची क्षमता ०.५९ टीएमसी- गतवर्षी अवघा ३३४ मिलिमीटर पाऊस- गतवर्षी या धरणांत होता ०.३२ टीएमसी पाणीसाठा- आता धरणात ० पाणीसाठा

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरWaterपाणीDamधरणRainपाऊसSocialसामाजिक