शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

हॅलो, मी मुख्यमंत्री बोलतोय... सरपंचांशी साधला संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:41 PM

आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर तालुक्यांमधील साधारण ३० सरपंचांशी थेट संवाद..

ठळक मुद्देपाणी, चाराटंचाईबाबत केली चर्चाचारा डेपोच्या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन 

बारामती : हॅलो, मी मुख्यमंत्री बोलतोय, तुमच्या गावात पाण्याची काय परिस्थिती आहे?’  दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक बंधारे, तलाव तसेच प्रकल्पातील पाणी खोल गेले आहे. अशा परिस्थितीत कोरड्या पात्रातील गाळ हा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. पाऊस सुरू होण्यापूर्वी शक्यतो मे महिन्यातच याबाबतीत गतीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर तालुक्यांमधील साधारण ३० सरपंचांशी थेट संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातीळ दुष्काळाची परिस्थिती पाहता सरपंचांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. तालुक्यातील पाणीटंचाई, चाराटंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर साबळेवाडी, काऱ्हाटी , मोरगाव, खराडेवाडी, कटफळ आदी ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सध्या गावाला भेडसावणारे प्रश्न मांडले. या वेळी साबळेवाडीचे सरपंच गणेश शिंदे यांनी ‘राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे; मात्र वन विभाग व रेल्वे प्रशासन जागेला मंजुरी देत नाहीत,’ अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉन्फरन्स कॉलवर असणारे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना याप्रश्नी लक्ष घालून अहवाल द्यावा, अशी सूचना केली. तसेच, साबळेवाडीचे सरपंच शिंदे यांनी शिरसाई योजनेतील पाण्याचा कोटा वाढवून मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे  केली. तर, मोरगावचे सरपंच नीलेश केदारी यांनी ‘नाझरेचे पाणी १५ दिवसांत संपेल; त्यामुळे मोरगाव प्रादेशिक पाणी योजनेला जेजुरी एमआयडीसीचे पाणी जोडून मिळावे,’ अशी मागणी केली. तसेच, खराडेवाडीचे सरपंच दत्तात्रय खराडे व काºहाटीचे सरपंच बबन जाधव यांनी ‘चारा छावणीऐवजी चारा डेपो टंचाईग्रस्त गावांमध्ये सुरू करावा,’ अशी मागणी केली. .......* दोन दिवसांत मंत्रालयामध्ये बैठक होईल, त्यावेळी हा विषय चर्चेला घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच, काऱ्हाटी सरपंच जाधव यांनी ‘१ जूनपर्यंत शेतकºयांना पीककर्ज मिळावे, अशी मागणी केली. दरम्यान, या वेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह जिरायती भागातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. ..........

आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर या ७ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ पुणे जिल्ह्यात आज अखेर ५१२ विधंण विहिरीद्वारे, ५२ नळ-पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करून, १० तात्पुरत्या नळ-पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून व ५७ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.

................

पिण्याच्या पाण्याच्या नळ-पाणीपुरवठा योजनांची ७.७५ कोटी इतकी विद्युत देयकाची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे.  सर्व नळ-पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात एकूण ३ शासकीय चारा छावण्या उघडण्यात आलेल्या आहेत. त्यात अद्याप जनावरे दाखल नाहीत. सेवाभावी संस्थांच्या २ छावण्या उघडण्यात आल्या असून त्यामध्ये १३५ जनावरे दाखल आहेत. 

............

जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ७ तालुक्यांतील ८३७ गावांतील १ लाख ७२ हजार ५५३ शेतकºयांना ६६ कोटी ४३ लाख इतकी रक्कम वाटप केलेली आहे. 

.............

जिल्ह्यातील एकूण १९  हजार 39 शेतकºयांनी पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी ६ कोटी ४६ लाख अदा करण्यात येणार आहे. त्यापैकी ६  कोटी ४४ लाख इतकी रक्कम ८ हजार ४१५ शेतकºयांना अदा 

 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत २.५५ लाख शेतकºयांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३८ हजार शेतकºयांना २ हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण  ७ कोटी ५० लाख इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकºयांना लाभ देण्याचे काम सुरू आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ७२८ कामे सुरू असून त्यावर २ हजार ६३७ मजूर उपस्थित आहेत. सर्वात जास्त ५१० मजूर इंदापूर तालुक्यात असून सर्वात कमी ३४ मजूर जुन्नर तालुक्यात आहेत. जिल्ह्यामध्ये ७ हजार ९५३ कामे शेल्फवर आहेत.......

दुष्काळ निवारणासाठी सरपंच आणि जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाचा संवाद घडवून आणणारा हा उपक्रम राबविल्याबद्दल बारामती तालुक्यातील सरपंच नीलेश केदारी यांनी बारामती सरपंच संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

दुष्काळाच्या प्रश्नावर थेट सरपंचांशी मोबाईलवर चर्चा करून समस्या जाणून घेतल्याबद्दल आजच्या संवादादरम्यान अनेक सरपंचांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. .........

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळsarpanchसरपंच