शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

त्यांचं पोट दुखायचं राहिलं नाही, मराठा अन् ओबीसी समाजाने मोर्चे काढावेत असं त्यांना वाटतंय : अजित पवारांचं टीकास्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 13:51 IST

विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे: अजित पवार..

पुणे : मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षाकडून याच मुद्द्यांचा संदर्भ घेत महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच मराठा आरक्षण आणि पाच मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोल्हापुरात उद्या राज्य सरकारला आव्हान देत खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाचे शस्र उपसले आहे. मात्र, याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे. 

पुण्यात अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले. पवार म्हणाले, त्यांचं पोट दुखायचं राहिलं नाही. त्यांना मराठा, ओबीसी समाजाने मोर्चे काढावेत असं वाटतंय. मात्र, त्यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. तसेच मानाच्या दिंड्यांना विश्वासात घेऊनच बसने वारी करण्याचा मार्ग काढलेला आहे. काही पक्षीय लोकं वेगळं काहीतरी निष्पन्न व्हावं असं वाटतं अशा शब्दात विरोधकांवर टीका केली आहे.

कोल्हापुरात खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मूक मोर्चावर भाष्य करताना त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मोर्चास्थळी जाणार आहे. त्यावेळी ते भूमिका मांडणार आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यपाल आणि पंतप्रधान यांना भेटलो आहोत. ५ जुलैला अधिवेशन आहे,त्यात नवीन विषय घेण्यात येईल.

नाना पटोलेंनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवायचं ठरलं आहे. नानांनी त्यांची भूमिका व्यक्त केली आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार, पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. सोनियाजी, उद्धव ठाकरे, आणि शरद पवार साहेबांनी एकत्र येत हे सरकार स्थापन केलं आहे. 

मराठवाड्यात १२८ एकर जमीन राज्याने टेंडर काढलं होतं. त्याचा उपयोग मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या आत आला म्हणून कोरोना निर्बंधात शिथिलता आणली आहे. जर कोरोना रुग्णसंख्या वाढली तर कठोर निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.

राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपावर भूमिका स्पष्ट करताना जनतेने राम मंदिरासाठी हातभार लावला आहे. एवढा मोठा आरोप होत असेल तर वस्तुस्थिती जनतेला कळायला हवी असे अजित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणAjit Pawarअजित पवारBJPभाजपाPoliticsराजकारण