शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

त्यांचं पोट दुखायचं राहिलं नाही, मराठा अन् ओबीसी समाजाने मोर्चे काढावेत असं त्यांना वाटतंय : अजित पवारांचं टीकास्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 13:51 IST

विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे: अजित पवार..

पुणे : मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षाकडून याच मुद्द्यांचा संदर्भ घेत महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच मराठा आरक्षण आणि पाच मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोल्हापुरात उद्या राज्य सरकारला आव्हान देत खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाचे शस्र उपसले आहे. मात्र, याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे. 

पुण्यात अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले. पवार म्हणाले, त्यांचं पोट दुखायचं राहिलं नाही. त्यांना मराठा, ओबीसी समाजाने मोर्चे काढावेत असं वाटतंय. मात्र, त्यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. तसेच मानाच्या दिंड्यांना विश्वासात घेऊनच बसने वारी करण्याचा मार्ग काढलेला आहे. काही पक्षीय लोकं वेगळं काहीतरी निष्पन्न व्हावं असं वाटतं अशा शब्दात विरोधकांवर टीका केली आहे.

कोल्हापुरात खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मूक मोर्चावर भाष्य करताना त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मोर्चास्थळी जाणार आहे. त्यावेळी ते भूमिका मांडणार आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यपाल आणि पंतप्रधान यांना भेटलो आहोत. ५ जुलैला अधिवेशन आहे,त्यात नवीन विषय घेण्यात येईल.

नाना पटोलेंनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवायचं ठरलं आहे. नानांनी त्यांची भूमिका व्यक्त केली आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार, पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. सोनियाजी, उद्धव ठाकरे, आणि शरद पवार साहेबांनी एकत्र येत हे सरकार स्थापन केलं आहे. 

मराठवाड्यात १२८ एकर जमीन राज्याने टेंडर काढलं होतं. त्याचा उपयोग मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या आत आला म्हणून कोरोना निर्बंधात शिथिलता आणली आहे. जर कोरोना रुग्णसंख्या वाढली तर कठोर निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.

राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपावर भूमिका स्पष्ट करताना जनतेने राम मंदिरासाठी हातभार लावला आहे. एवढा मोठा आरोप होत असेल तर वस्तुस्थिती जनतेला कळायला हवी असे अजित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणAjit Pawarअजित पवारBJPभाजपाPoliticsराजकारण