शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

धाडसाने चोरटे पकडले, पण ३७ वर्षांनी फिर्यादच घेतली मागे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 1:58 PM

तब्बल ३७ वर्षांपूर्वी सोन्याची साखळी चोेरणाऱ्या चोरट्यांना महिलेने धाडसाने पकडले. मात्र,जामीन मिळाल्याने आरोपी फरार झाले

ठळक मुद्देलोकअदालतीत असाही न्याय : महिलेचे न्यायालयाचे खेटे वाचले बसमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेत गळ्यातील ९०० रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरी

पुणे : तब्बल ३७ वर्षांपूर्वी सोन्याची साखळी चोेरणाऱ्या चोरट्यांना महिलेने धाडसाने पकडले. मात्र,जामीन मिळाल्याने आरोपी फरार झाले आणि फियार्दी महिलेलाच न्यायालयात खेटे घालण्याची वेळ आली. त्यामुळे लोकअदालतीत गुन्हा मागे घेण्यात आला. प्रवासादरम्यान ९०० रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरीला गेल्या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची फिर्याद तब्बल ३७ वर्षांनी मागे घेत हा दावा निकाली काढण्यात आला. शनिवारी झालेल्या लोक न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांच्या न्यायालयाने हे प्रकरण मिटवले. लक्ष्मीबाई ज्ञानोबा सरडे (घटनेच्या दिवशीचे वय ३०, रा. सरडे वस्ती, लोणीकंद) या  १७ जानेवारी १९८१ रोजी त्यांच्या आई मंजूबाई बबन राकसे व गावातील दोन महिलांसह भोसरी येथे राहणा-या त्यांच्या बहिणीकडे निघाल्या होत्या. येरवड्यात कर्नल हायस्कूलसमोर असलेल्या पीएमपीच्या स्टॉपवरून भोसरीसाठी बस पकडली. या प्रवासा दरम्यान बसमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९०० रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरली. चोरी होत असताना सरडे यांना गळ््याजवळ कोणाचा तरी हात असल्याचे लक्षात आले होते. मात्र गाडीत गर्दी व हातात बॅग असल्याने त्यांना त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र बस काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांना गळ््यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी आईच्या मदतीने त्वरीत संशय असलेल्या तीन व्यक्तींना पकडले. चोरट्यांना एक महिलेने पकडले म्हणून बसमधील इतर प्रवाशी त्यावेळी अवाक झाले होते. या प्रकरणात सरडे यांनी तक्रार दिली होती.        फिर्यादीनुसार बादल सुंदर गागडे, विकास गुलचंद बागडे आणि सुरेश प्रसाद भाट (सर्व रा. सर्वे नंबर ८, येरवडा) यांना येरवडा पोलिसांनी या प्रकरणात अटक केली होती. त्यानुसार त्यांचा तपास करून त्यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर ते फरार झाले आहेत. अद्याप ते हाती न आल्याने हा गुन्हा प्रलंबित होता. त्यामुळे फिर्यादी यांनी तब्बल ३७ वर्षांनी हा गुन्हा लोक अदालतीमध्ये मागे घेतला. त्यामुळे हा खटला निकाली लागला. फिर्यादी यांनी न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे आणि रविंद्र कांबळे यांनी प्रयत्न केले. समन्समुळे मुलाने बोलणे सोडले. गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. खटल्याच्या संदर्भात एक दिवस फिर्यादी समन्स पाठविला होता. तो त्यांच्या मुलाच्या हाती लागला. न्यायालयातून समन्स आल्याचे पाहून तो फियार्दींवरच चिडला. न्यायालयाची नोटीस आली म्हणजे आपल्या आईने काहीतरी चुकीचे काम केले, अशी भावना त्याचा मनात निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने फियार्दीबरोबर बोलणेच सोडून दिले होती, अशी माहिती सरकारी वकील वामन कोळी यांनी दिली. या प्रकारामुळे आजही न्यायालयीन कामकाजाबात भिती असल्याचे पुढे येते, असल्याचे कोळी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाtheftचोरीPoliceपोलिसCourtन्यायालय