शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Guillain Barre Syndrome: "भात, चीज आणि पनीर खाणं टाळा"; गुइलेन बॅरे सिंड्रोमपासून वाचण्यासाठी एम्सच्या डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:23 IST

GBS Prevention Tips: जीबीएस हा एक हा अत्यंत दुर्मिळ आजार असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे आता तज्ञ्जांकडून आहाराची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केलं जात आहे.

Guillain Barre Syndrome: गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजारामुळे सध्या राज्यात चिंतेंचे वातावरण आहे. पुण्यात जीबीएस आजाराचे एकाच दिवसात २८ रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या १०१ वर पोहोचली आहे. त्यातील १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सोलापूरमध्ये एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असून व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. जीबीएस हा एक हा अत्यंत दुर्मिळ आजार असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे आता तज्ञ्जांकडून आहाराची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केलं जात आहे.

पुण्यातील जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांमागे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू महत्त्वाचं कारण आहे. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीमुळे सामान्यतः पोटात संक्रमण होते आणि तो जीबीएसच्या वाढीचे कारण ठरत आहे. जीबीएस सामान्यतः व्हायरल किंवा विषाणूच्या संसर्गानंतर होतो. दूषित किंवा कमी शिजवलेलं मांस, पाश्चर न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनाने हा जीवाणूची लागण होते. त्यामुळे आता तज्ञ्जांकडून काही या आजाराची लागण टाळण्यासाठी काही पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जात आहेत.

एम्स दिल्ली मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ.प्रियंका सेहरावत यांनी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. या आजारापासून वाचायचे असेल तर बाहेरचे अन्न खाणे टाळा. हे या आजाराचे मुख्य कारण असल्याचे डॉक्टर प्रियंका सेहरावत यांनी म्हटलं. "जरी याची इतर अनेक कारणे असली तरी हे एक कारण आहे ज्याबद्दल आपणा सर्वांना माहित असणे आवश्यक आहे. कारण हे आपण टाळू शकतो. त्यासाठी तुम्ही बाहेरचे अन्न खाऊ नका आणि अशुद्ध पाणी पिऊ नका. महत्त्वाचे म्हणजे चीज, पनीर, भात यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करू नका.  तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीची विशेष काळजी घ्या. हे देखील लक्षात ठेवा की हा आजार दोन आठवड्यांच्या आत उपचाराने बरा केला जातो," असं  प्रियंका सेहरावत यांनी म्हटलं.

पनीर, तांदूळ आणि चीजमध्ये जीवाणूंची शक्यता जास्त असते कारण त्यांच्यात जास्त आर्द्रता असते. चीज आणि पनीर हे दुग्धजन्य पदार्थ आहेत, म्हणून जर ते योग्यरित्या साठवले गेले नाहीत तर ते लिस्टेरिया, साल्मोनेला हे जीवाणू तयार होण्याची शक्यता असता. तर शिजवलेल्या भातामध्ये बॅसिलस सेरियस असू शकतो जे सामान्य तापमानावर विषाणू तयार करू शकतात.

गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे

हात आणि पाय सुन्न होणे

हात आणि पायांना मुंग्या येणे

स्नायूंची कमजोरी

चेहरा, डोळे, छाती आणि हातपाय यांच्या स्नायूंचा अर्धांगवायू

छातीचे स्नायू अर्धांगवायू झाल्यामुळे श्वास घेण्यात समस्या

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स