शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Guillain Barre Syndrome: "भात, चीज आणि पनीर खाणं टाळा"; गुइलेन बॅरे सिंड्रोमपासून वाचण्यासाठी एम्सच्या डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:23 IST

GBS Prevention Tips: जीबीएस हा एक हा अत्यंत दुर्मिळ आजार असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे आता तज्ञ्जांकडून आहाराची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केलं जात आहे.

Guillain Barre Syndrome: गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजारामुळे सध्या राज्यात चिंतेंचे वातावरण आहे. पुण्यात जीबीएस आजाराचे एकाच दिवसात २८ रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या १०१ वर पोहोचली आहे. त्यातील १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सोलापूरमध्ये एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असून व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. जीबीएस हा एक हा अत्यंत दुर्मिळ आजार असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे आता तज्ञ्जांकडून आहाराची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केलं जात आहे.

पुण्यातील जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांमागे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू महत्त्वाचं कारण आहे. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीमुळे सामान्यतः पोटात संक्रमण होते आणि तो जीबीएसच्या वाढीचे कारण ठरत आहे. जीबीएस सामान्यतः व्हायरल किंवा विषाणूच्या संसर्गानंतर होतो. दूषित किंवा कमी शिजवलेलं मांस, पाश्चर न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनाने हा जीवाणूची लागण होते. त्यामुळे आता तज्ञ्जांकडून काही या आजाराची लागण टाळण्यासाठी काही पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जात आहेत.

एम्स दिल्ली मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ.प्रियंका सेहरावत यांनी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. या आजारापासून वाचायचे असेल तर बाहेरचे अन्न खाणे टाळा. हे या आजाराचे मुख्य कारण असल्याचे डॉक्टर प्रियंका सेहरावत यांनी म्हटलं. "जरी याची इतर अनेक कारणे असली तरी हे एक कारण आहे ज्याबद्दल आपणा सर्वांना माहित असणे आवश्यक आहे. कारण हे आपण टाळू शकतो. त्यासाठी तुम्ही बाहेरचे अन्न खाऊ नका आणि अशुद्ध पाणी पिऊ नका. महत्त्वाचे म्हणजे चीज, पनीर, भात यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करू नका.  तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीची विशेष काळजी घ्या. हे देखील लक्षात ठेवा की हा आजार दोन आठवड्यांच्या आत उपचाराने बरा केला जातो," असं  प्रियंका सेहरावत यांनी म्हटलं.

पनीर, तांदूळ आणि चीजमध्ये जीवाणूंची शक्यता जास्त असते कारण त्यांच्यात जास्त आर्द्रता असते. चीज आणि पनीर हे दुग्धजन्य पदार्थ आहेत, म्हणून जर ते योग्यरित्या साठवले गेले नाहीत तर ते लिस्टेरिया, साल्मोनेला हे जीवाणू तयार होण्याची शक्यता असता. तर शिजवलेल्या भातामध्ये बॅसिलस सेरियस असू शकतो जे सामान्य तापमानावर विषाणू तयार करू शकतात.

गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे

हात आणि पाय सुन्न होणे

हात आणि पायांना मुंग्या येणे

स्नायूंची कमजोरी

चेहरा, डोळे, छाती आणि हातपाय यांच्या स्नायूंचा अर्धांगवायू

छातीचे स्नायू अर्धांगवायू झाल्यामुळे श्वास घेण्यात समस्या

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स