शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पालकमंत्री म्हणतात, जपून वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 04:09 IST

मोर्चे-आंदोलनाने काही होणार नाही; धरणांत २० टक्के कमी पाणीसाठा

पुणे : पुण्याचे निम्याहून अधिक पाणी कमी केल्याने पुणेकरांमध्ये प्रचंड संताप आणि धास्ती असताना पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठा वाढविण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. महापालिका आयुक्त यावर अपील करणार आहेत. धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के पाणीसाठा कमी आहे. मोर्चे, आंदोलने करून धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार नाही. माझ्या घरासह प्रत्येक पुणेकराला पाणी जपून वापरावे लागणार आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन गिरीश बापट यांनी केले.स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायझरी फोरमची दुसरी बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बापट म्हणाले, सध्या पाण्यावरून शहरी-ग्रामीण वाद सुरु आहे. परंतु धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता प्रत्येकाला पाणी अत्यंत जपून वापरावे लागणार आहे. खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्यातून उसासाठी पाणी सोडले जाते असा गैरसमज पसरविला जात आहे. परंतु ग्रामीण भागात देखील पाण्याची गंभीर परिस्थिती असून, तेथील लोकसंख्येला पिण्यासाठी व जनावरांच्या चारा-पाण्यासाठी हे पाणी सोडण्यात येते आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने गुरुवारी दिलेल्या आदेशाविरोधात महापालिका आयुक्त अपील करणार आहेत.खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत घालवण्यासाठी नियोजन केले जात आहे. धरणात असलेला पाण्याचा साठा लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे आहे. शहरातील पाईपलाईन गेली तीस वर्षांपासून खराब झालेली असल्याने वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर शहरातील पाणी वितरण पद्धतीत आणि वॉल सोडण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी गाड्या धुण्यासाठी आणि बागांसाठी वापरले जाता कामा नये. बेबी कॅनॉल आणि उजव्या कालव्याची दुरुस्ती केली जाणार आहे. ही दुरुस्ती केल्यानंतर ग्रामीण आणि शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल. टेमघर धरणाच्या गळतीमुळे ते रिकामे करण्यात आले आहे. त्याची दुरुस्ती झाल्यानंतर ३ टीएमसी पाणी मिळेल.शहरात पाण्याची ही परिस्थिती कुणाच्याही चुकीमुळे निर्माण झालेली नाही, तर निसर्गामुळे निर्माण झाली आहे. शहराला मिळणारे पाणी ११५० एमएलडीच्या खाली येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दरम्यान, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने गुरुवारी दिलेल्या आदेशाविरोधात महापालिका आयुक्त लवकरच अपील करणार असल्याचे बापट यांनी येथे सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईgirish bapatगिरीष बापटPuneपुणे