शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पालकमंत्री म्हणतात, जपून वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 04:09 IST

मोर्चे-आंदोलनाने काही होणार नाही; धरणांत २० टक्के कमी पाणीसाठा

पुणे : पुण्याचे निम्याहून अधिक पाणी कमी केल्याने पुणेकरांमध्ये प्रचंड संताप आणि धास्ती असताना पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठा वाढविण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. महापालिका आयुक्त यावर अपील करणार आहेत. धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के पाणीसाठा कमी आहे. मोर्चे, आंदोलने करून धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार नाही. माझ्या घरासह प्रत्येक पुणेकराला पाणी जपून वापरावे लागणार आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन गिरीश बापट यांनी केले.स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायझरी फोरमची दुसरी बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बापट म्हणाले, सध्या पाण्यावरून शहरी-ग्रामीण वाद सुरु आहे. परंतु धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता प्रत्येकाला पाणी अत्यंत जपून वापरावे लागणार आहे. खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्यातून उसासाठी पाणी सोडले जाते असा गैरसमज पसरविला जात आहे. परंतु ग्रामीण भागात देखील पाण्याची गंभीर परिस्थिती असून, तेथील लोकसंख्येला पिण्यासाठी व जनावरांच्या चारा-पाण्यासाठी हे पाणी सोडण्यात येते आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने गुरुवारी दिलेल्या आदेशाविरोधात महापालिका आयुक्त अपील करणार आहेत.खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत घालवण्यासाठी नियोजन केले जात आहे. धरणात असलेला पाण्याचा साठा लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे आहे. शहरातील पाईपलाईन गेली तीस वर्षांपासून खराब झालेली असल्याने वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर शहरातील पाणी वितरण पद्धतीत आणि वॉल सोडण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी गाड्या धुण्यासाठी आणि बागांसाठी वापरले जाता कामा नये. बेबी कॅनॉल आणि उजव्या कालव्याची दुरुस्ती केली जाणार आहे. ही दुरुस्ती केल्यानंतर ग्रामीण आणि शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल. टेमघर धरणाच्या गळतीमुळे ते रिकामे करण्यात आले आहे. त्याची दुरुस्ती झाल्यानंतर ३ टीएमसी पाणी मिळेल.शहरात पाण्याची ही परिस्थिती कुणाच्याही चुकीमुळे निर्माण झालेली नाही, तर निसर्गामुळे निर्माण झाली आहे. शहराला मिळणारे पाणी ११५० एमएलडीच्या खाली येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दरम्यान, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने गुरुवारी दिलेल्या आदेशाविरोधात महापालिका आयुक्त लवकरच अपील करणार असल्याचे बापट यांनी येथे सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईgirish bapatगिरीष बापटPuneपुणे