शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

मुळा-मुठा नद्यांच्या झाल्या गटारगंगा; पुणेकरांचे आरोग्य बिघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 05:12 IST

९ ठिकाणी आहेत शुद्धीकरण केंद्रे; परंतु प्रक्रिया न करताच दररोज ७५० दशलक्ष सांडपाणी नदीत

- अभिजित कोळपेपुणे : प्रतिदिन जवळपास ७५० दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला, तरी प्रक्रिया केंद्रांची क्षमताच कमी आहे. शिवाय अनेक ठिकाणी प्रक्रिया होण्यापूर्वीच हे पाणी नद्यांमध्ये सोडले जात असल्याने पुण्यातील ‘मुळा आणि मुठा’ गटारगंगा बनल्या आहेत. त्याचा परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होत आहे.

पुण्याची लोकसंख्या ५२ लाखांच्याही पुढे गेली आहे. पुण्यात प्रतिदिन ७५० दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. या पाण्यावर शहरातील वेगवेगळ्या भागांत ९ ठिकाणी प्रक्रिया केली जाते. मात्र, या केंद्रांची क्षमताच कमी असल्याने बाहेर येणारे पाणी गटारासारखेच असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे पाणी खडकवासला धरणापासून खाली मुठा नदीपात्रात सोडले जाते. औंधकडून पुण्यात येणाऱ्या मुळा नदीतही असेच घाण पाणी सोडले जाते. शिवाय या दोन्ही नद्यांमध्ये अनेक कारखान्यांकडून रसायनयुक्त दूषित पाणीही मोठ्या प्रमाणात सोडले जाते. संगमवाडी येथे या नद्यांचा संगम होतो. तेथे नदीतील पाणी गटाराप्रमाणेच झाले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सांडपाणी मिसळले जाते त्या मुठा नदीतील पाण्याचा उपयोग हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यांतील १०० पेक्षा अधिक गावांतील शेतकरी आपल्या ७६ हजार ९८१ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी करतात. पुढे हे पाणी उजनी धरणात जाते. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी, तसेच शेती व औद्योगिक कारखान्यांच्या वापरासाठी हे पाणी वापरले जाते. शिवाय मुळा-मुठा नदीकाठच्या अनेक गावांतील नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरतात. या गावांत गॅस्ट्रो, विषमज्वर, कॉलरा व पोटाच्या विकारांची समस्या उद्भवत असल्याचे डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पुण्यातून दररोज वेगवेगळ्या भागांतून निघणाºया सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ९ ठिकाणी प्रक्रिया केंद्रे असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण केंद्राचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांनी दिली. मैलापाणी एकत्रित करून आणण्याचे काम महापालिका करीत आहे़ मात्र, ही वाहिनी ब्लॉक झाल्यावर चेम्बर फोडण्याचे प्रकार सातत्याने होत असतात़ त्यामुळे हे मैलापाणी थेट नदीत जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रदूषणामुळे मुळा-मुठा नदीत जिवंतपणाच राहिला नाही़ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कार्यक्षमता केवळ ४० टक्क्यांपर्यंतच आहे.अनेक ठिकाणी हे मैलापाणी तसेच नदीत सोडले जाते. हेच पाणी पुढे उजनी धरणात जाते. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या पुणे, सोलापूर जिल्ह्यांतील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्याविरोधात आम्ही पुणे महापालिकेशी लढा देत असल्याचे नदी प्रदूषणावर काम करणारे कल्पेश यादव यांनी सांगतले.

प्रक्रिया केंद्रे नावालाच

पालिकेने नदीमध्ये मैलापाणी जाऊ नये म्हणून हजारो कोटी खर्चून ९ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत़ पालिकेला यातून कुठलेही उत्पन्न मिळत नाही. या केंद्रांतील सांडपाणी पुन्हा नदीत येते. त्यामुळे ही केंद्रे केवळ नावालाच चालू आहेत.-प्रमोद देवकर पाटील,अध्यक्ष, कर्तव्य जनमंच

टॅग्स :environmentपर्यावरणriverनदीWaterपाणीPuneपुणे