शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मुळा-मुठा नद्यांच्या झाल्या गटारगंगा; पुणेकरांचे आरोग्य बिघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 05:12 IST

९ ठिकाणी आहेत शुद्धीकरण केंद्रे; परंतु प्रक्रिया न करताच दररोज ७५० दशलक्ष सांडपाणी नदीत

- अभिजित कोळपेपुणे : प्रतिदिन जवळपास ७५० दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला, तरी प्रक्रिया केंद्रांची क्षमताच कमी आहे. शिवाय अनेक ठिकाणी प्रक्रिया होण्यापूर्वीच हे पाणी नद्यांमध्ये सोडले जात असल्याने पुण्यातील ‘मुळा आणि मुठा’ गटारगंगा बनल्या आहेत. त्याचा परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होत आहे.

पुण्याची लोकसंख्या ५२ लाखांच्याही पुढे गेली आहे. पुण्यात प्रतिदिन ७५० दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. या पाण्यावर शहरातील वेगवेगळ्या भागांत ९ ठिकाणी प्रक्रिया केली जाते. मात्र, या केंद्रांची क्षमताच कमी असल्याने बाहेर येणारे पाणी गटारासारखेच असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे पाणी खडकवासला धरणापासून खाली मुठा नदीपात्रात सोडले जाते. औंधकडून पुण्यात येणाऱ्या मुळा नदीतही असेच घाण पाणी सोडले जाते. शिवाय या दोन्ही नद्यांमध्ये अनेक कारखान्यांकडून रसायनयुक्त दूषित पाणीही मोठ्या प्रमाणात सोडले जाते. संगमवाडी येथे या नद्यांचा संगम होतो. तेथे नदीतील पाणी गटाराप्रमाणेच झाले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सांडपाणी मिसळले जाते त्या मुठा नदीतील पाण्याचा उपयोग हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यांतील १०० पेक्षा अधिक गावांतील शेतकरी आपल्या ७६ हजार ९८१ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी करतात. पुढे हे पाणी उजनी धरणात जाते. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी, तसेच शेती व औद्योगिक कारखान्यांच्या वापरासाठी हे पाणी वापरले जाते. शिवाय मुळा-मुठा नदीकाठच्या अनेक गावांतील नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरतात. या गावांत गॅस्ट्रो, विषमज्वर, कॉलरा व पोटाच्या विकारांची समस्या उद्भवत असल्याचे डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पुण्यातून दररोज वेगवेगळ्या भागांतून निघणाºया सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ९ ठिकाणी प्रक्रिया केंद्रे असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण केंद्राचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांनी दिली. मैलापाणी एकत्रित करून आणण्याचे काम महापालिका करीत आहे़ मात्र, ही वाहिनी ब्लॉक झाल्यावर चेम्बर फोडण्याचे प्रकार सातत्याने होत असतात़ त्यामुळे हे मैलापाणी थेट नदीत जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रदूषणामुळे मुळा-मुठा नदीत जिवंतपणाच राहिला नाही़ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कार्यक्षमता केवळ ४० टक्क्यांपर्यंतच आहे.अनेक ठिकाणी हे मैलापाणी तसेच नदीत सोडले जाते. हेच पाणी पुढे उजनी धरणात जाते. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या पुणे, सोलापूर जिल्ह्यांतील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्याविरोधात आम्ही पुणे महापालिकेशी लढा देत असल्याचे नदी प्रदूषणावर काम करणारे कल्पेश यादव यांनी सांगतले.

प्रक्रिया केंद्रे नावालाच

पालिकेने नदीमध्ये मैलापाणी जाऊ नये म्हणून हजारो कोटी खर्चून ९ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत़ पालिकेला यातून कुठलेही उत्पन्न मिळत नाही. या केंद्रांतील सांडपाणी पुन्हा नदीत येते. त्यामुळे ही केंद्रे केवळ नावालाच चालू आहेत.-प्रमोद देवकर पाटील,अध्यक्ष, कर्तव्य जनमंच

टॅग्स :environmentपर्यावरणriverनदीWaterपाणीPuneपुणे