शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कल्याणीनगर प्रकरणावरून गरीब आणि श्रीमंतांना वेगळे कायदे असल्याचे स्पष्ट दिसतंय - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:50 IST

पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळले नसल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी

पुणे : ‘कल्याणी नगर घटनेतील आरोपीला अवघ्या १५ तासांत जामीन मिळतो, हे अत्यंत गंभीर आहे. यातून गरीब आणि श्रीमंतांना वेगळे कायदे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे अत्यंत आक्षेपार्ह आणि सामान्यांना न्याय नाकारणारे आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळले नसल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी,’ अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

पटोले म्हणाले की, कल्याणी नगर येथील घटना अत्यंत गंभीर आहे. तरीही पाेलिसांनी कार चालकाची वैद्यकीय तपासणी केली नाही. दोघांचा मृत्यू झाल्यानंतरही किरकोळ कलमे लावून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले आणि त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता का, ज्यामुळे आरोपी मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पोलिस ठाण्यामध्ये होता. त्या आमदाराची या प्रकरणात नेमकी भूमिका काय? कारचालक मुलाच्या वडिलांचे कुख्यात माफियाशी संबंध असल्याचेही समजते. याबाबत काय ते स्पष्ट करावे.

एवढी तत्परता का दाखवतात गृहमंत्री?

ज्या बेकायदेशीर घटनांमध्ये भाजपचा काही संबंध असतो वा इतर संबंध असतात त्या ठिकाणीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने जातात. एरवी ते कोणतेच प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत. मग याच प्रकरणात एवढी तत्परता का? या प्रकरणात पुण्याचे पालकमंत्री मात्र कुठेच दिसत नाहीत, हेही आश्चर्याचे आहे, असेही प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliceपोलिसCourtन्यायालय