शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

कल्याणीनगर प्रकरणावरून गरीब आणि श्रीमंतांना वेगळे कायदे असल्याचे स्पष्ट दिसतंय - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:50 IST

पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळले नसल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी

पुणे : ‘कल्याणी नगर घटनेतील आरोपीला अवघ्या १५ तासांत जामीन मिळतो, हे अत्यंत गंभीर आहे. यातून गरीब आणि श्रीमंतांना वेगळे कायदे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे अत्यंत आक्षेपार्ह आणि सामान्यांना न्याय नाकारणारे आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळले नसल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी,’ अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

पटोले म्हणाले की, कल्याणी नगर येथील घटना अत्यंत गंभीर आहे. तरीही पाेलिसांनी कार चालकाची वैद्यकीय तपासणी केली नाही. दोघांचा मृत्यू झाल्यानंतरही किरकोळ कलमे लावून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले आणि त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता का, ज्यामुळे आरोपी मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पोलिस ठाण्यामध्ये होता. त्या आमदाराची या प्रकरणात नेमकी भूमिका काय? कारचालक मुलाच्या वडिलांचे कुख्यात माफियाशी संबंध असल्याचेही समजते. याबाबत काय ते स्पष्ट करावे.

एवढी तत्परता का दाखवतात गृहमंत्री?

ज्या बेकायदेशीर घटनांमध्ये भाजपचा काही संबंध असतो वा इतर संबंध असतात त्या ठिकाणीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने जातात. एरवी ते कोणतेच प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत. मग याच प्रकरणात एवढी तत्परता का? या प्रकरणात पुण्याचे पालकमंत्री मात्र कुठेच दिसत नाहीत, हेही आश्चर्याचे आहे, असेही प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliceपोलिसCourtन्यायालय