शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

तळीये गावाच्या मदतीसाठी 'माळीण' सरसावलं; तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणत मदतीचा हात पुढं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 3:52 PM

पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर देखील ७ वर्षांपूर्वी अशाचप्रकारे डोंगर कोसळून मोठी जीवितहानी झाली होती.

पुणे : महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळून अनेक कुटुंब उध्वस्त झाली तर अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला. अद्यापही शोधकार्य सुरु असून काही नागरिक बेपत्ता आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर देखील ७ वर्षांपूर्वी अशाचप्रकारे डोंगर कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. पण आता हेच 'माळीण' सामाजिक बांधिलकी जपत तळिये गावाच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. 

कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, वर्धा, चिपळूण, पुणे, सातारा अशा बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून दुसरीकडे दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून जनावरे वाहून गेली आहेत तर लाखांवर नागरिकांचे स्थलांतरण कऱण्यात आले आहे. महाड तालुक्यातील तळीये गावावर देखील दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात अनेक कुटुंब जमीनदोस्त झाली. तसेच जवळपास ढिगाऱ्याखालून तब्बल ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून. अद्यापही ३२ नागरिक बेपत्ता आहे येथील नागरिकांवर  या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी काही काळ लागणार आहे. राज्य सरकारसह सामाजिक संस्था देखील तळीये गावाच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.याच दरम्यान आता पुणे जिल्ह्यातील माळीण गावाने आदर्श उभा केला असून तळीये गावाच्या मदतीसाठी २५ हजारांची आर्थिक मदत दिली आहे.

माळीणच्या नागरिकांनी तळीये गावाच्या मदतीसाठी २५ हजारांचा धनादेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला आहे.या पार्श्वभूमीवर माळीणच्या नागरिकांनी तळीये गावावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटावर आपल्या भावना व्यक्त करताना ''आम्ही तुमचं दुःख जाणतो..'' म्हटले आहे. माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी २५ हजाराची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली आहे.

७ वर्षांपूर्वीच्या 'त्या' काळरात्रीची आठवण ताजी....पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वसलेल्या माळीण गावावर देखील ३० जुलै २०१४ च्या रात्री मोठं संकट कोसळले होतं. डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४४ घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. तर १५१ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या ६ वर्षात या गावातील नागरिक पुन्हा एकदा उभे राहिले आहेत. माळीण गावातील नागरिकांनी तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणून तळीयेतील ग्रामस्थांच्या मदतीसाठी मोठी मदत देऊ केली आहे. 

जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा; तळीये ग्रामस्थांची मागणी तळीये येथे मागील पाच दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आजही पथकांकडून सुरु असलेलं रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. मात्र यावेळी नागरिकांनी पथकाला जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी केली.याचवेळी आमच्या पुनर्वसनाचा तातडीने विचार करून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे.

टॅग्स :Puneपुणेmahad-acमहाडRainपाऊसfloodपूरAccidentअपघातState Governmentराज्य सरकारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील