शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

...अखेर इंदापूर’साठी उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 15:35 IST

खडकवासला , निरा डावा कालव्याचा पाणी प्रश्न सुटणार: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

कळस: इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिचंन व निरा डावा कालव्यावरील बावीस गावांतील शेतीसाठी उजनी जलाशयातुन पाच टीएमसी पाणी उचलण्यास  राज्य शासनाची  परवानगी मिळाली आहे.त्यामुळे आता तालुक्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याने शेतीला अच्छे दिन येणार आहेत.

या प्रस्तावावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्वाक्षरी झाली आहे. जलसंपदा मंत्रालयाने याबाबत शासन निर्णय पारित केला आहे ,अशी  माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली .खडकवासला कालव्यावरील शेटफळगढे पासुन बेडशिंगे पर्यंत ३६ गावांना उन्हाळी आवर्तनात टंचाई निर्माण होत होती .तसेच निरा डावा कालव्यावरील  २२ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्यमंत्री भरणे प्रयत्नशील होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नियोजनानाखाली गेल्या काही वर्षांपासून मंत्री भरणे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री भरणे यांच्या प्रयत्नान यश आले आहे. दि २२ एप्रिल रोजी या प्रस्तावावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची अंतिम स्वाक्षरी झाली आहे .या योजनेसाठी येथील जनतेची आग्रही मागणी होती. 

याबाबत माहिती देताना मंत्री भरणे म्हणाले, कुंभारगांव परिसरातील उजनी जलाशयातुन १० हजार एच.पी. क्षमतेच्या विद्युत पंपाद्वारे पाणी उचलले जाणार  आहे. ते पाणी सुमारे १० कि.मी. अंतरावरील शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकले जाणार आहे. तेथुन हे पाणी खडकवासला कालव्यातुन बेडसिंगे पर्यंतच्या शेती सिंचनासाठीही पाणी वापरले जाणार आहे. सणसर जोड कालवातुन नीरा डाव्या कालव्यावरील बावीस  गावातील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे .दोन्ही कालव्यावरील सुमारे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे. सदर योजनेसाठी सुमारे ६०० कोटी रुपयेचा निधी खर्च होणार आहे  या योजनेसाठी दोन वषार्चा कालावधी जाणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले आहेत.—————————————...तालुक्यातील सिंचन प्रश्न सुटणार तालुक्यातील महत्वकांक्षी या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. चार महिन्यात होणार योजनेचा सर्व्हे  तातडीने  पूर्ण केला जाणार आहे. लाकडी निंबोडी नंतर हा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे .यामुळे तालुक्यातील सिंचन प्रश्न सुटणार आहे.दत्तात्रेय भरणे ,राज्यमंत्री

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणेWaterपाणीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेUjine Damउजनी धरण