शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

इंदापूर उपसासिंचन योजना राबविण्याची मागणीसाठी शेतकऱ्यांचे सिंचनभवनवर उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 14:21 IST

ग्रामीण भागातील शेतीला उन्हाळी आवर्तन मिळत नसल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे

कळस : खडकवासला धरणसाखळीतील पाण्यावरून पुणे शहर व ग्रामीण भागातील शेतकरी यांच्यात नेहमीच वाद होत आहे. ग्रामीण भागातील शेतीला उन्हाळी आवर्तन मिळत नाही. परिणामी शेती व्यवसाय अडचणीत आला आहे.

त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजनी जलाशयावरुन उपसा जलसिंचन योजना राबविण्याची मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील सिंचन भवनसमोर शुक्रवारी (ता. २३) रोजी शेतकरी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी एका शेतकऱ्यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली.

सकाळी ११ वाजता सिंचन भवन गेटसमोर आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी बाबामहाराज खारतोडे, विजय गावडे,रमेश खारतोडे, निवृत्ती गायकवाड, दादासाहेब खारतोडे आकाश पवार यांची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाणी योजना मंजूर न झाल्यास आंदोलन आक्रमक करण्यात येईल असे सांगितले.

इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या जीवावरील ३६ गावे, सणसर कटच्या माध्यमातून पाणी मिळणारी २२ गावे अशा ६८ गावांतील शेतीसिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या काही वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या जीवावरील शेती व्यवसाय अनियमित आवर्तनामुळे अडचणीत आला आहे. कालव्याच्या पाण्याची शाश्वती राहिली नसल्याने, येथील शेतकरी हतबल झाले आहेत. खडकवासला धरणाच्या मूळ प्रकल्प आराखड्यातील मंजूर पाणी कोटा गेल्या कित्येक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना मिळला नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. यावेळी भाषणे चालु असताना एका युवा शेतकऱ्यानी बाटलीचे टोपण उघडून अंगावर बाटलीतील द्रव ओतून घेण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagitationआंदोलनSocialसामाजिकGovernmentसरकार