शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

शेतकऱ्यांना त्वरीत मदतीची आवश्यकता; सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:24 IST

जमिनी वाहून गेल्या आहेत, नुकसान भरपाई देता येईल पण जमीनच वाहून गेली त्याचे पुनर्वसन कसं करायचं हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

बारामती : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या संकटात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्वरित मदत आणि भरपाईची आवश्यकता आहे. सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत ,अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे.

बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीवर पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. जमिनीवाहून गेल्या आहेत. नुकसान भरपाई देता येईल पण जमीनच वाहून गेली त्याचे पुनर्वसन कसं करायचा हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. पवार यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या नुकसानीबाबत सरकार काय धोरण जाहीर करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान यापूर्वी कधीही झाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे. पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची भेट घेत येथील परिस्थिती त्यांच्या कानावर घातली आहे. तसेच जास्तीची मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्याकडून लवकरात लवकर निर्णय होतील या संकटग्रस्तांना उभे करण्यासाठी सरकार हातभार लावेल,अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRainपाऊसweatherहवामान अंदाजvegetableभाज्या