शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना ‘हायटेन्शन’चा झटका!

By admin | Updated: February 22, 2015 22:57 IST

कोरेगाव भीमा व डिंंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील ४० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे जळून खाक झाला.

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व डिंंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील ४० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे जळून खाक झाला. शेतकऱ्यांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे. तर विद्युत कंपनीचे अधिकाऱ्यांनी विद्युत निरीक्षकाच्या अहवालानंतरच जबाबदारी स्पष्ट होईल, असे सांगितले. आज दुपारी दीडच्या सुमारास डिंंग्रजवाडी गावच्या हद्दीत वीज पारेषण कंपनीच्या उच्च क्षमतेच्या वीजवाहिन्यांखाली असणाऱ्या उसाला वाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागली. क्षणात आगीचे डोंब उच्च क्षमतेच्या तारांच्या उंचीपेक्षाही वरती गेले होते. या क्षेत्राच्या शेजारीच ऊसतोड करणाऱ्या मजुरांनी व शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुपारचे कडक ऊन व सोसाट्याचा वारा यामुळे आगीने मोठ्या प्रमाणावर क्षेत्र व्यापून टाकले होते. आग आटोक्यात आणणे शक्य होत नसल्याने व त्यात वीजपुरवठाही खंडित झाल्याने वीजपंप चालू होत नसल्याने आग विझवण्यात अडचणी येत असल्याचे माजी उपसरपंच मधुकर गव्हाणे यांनी सांगितले.या घटनेची माहिती शिक्रापूर पोलिसांना व रांजणगाव, शिरूर येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. दरम्यान, आगीला वाऱ्याची साथ मिळाल्याने आग पूर्वेकडून पश्चिमेकडे जात डिंंग्रजवाडी हद्दीतून कोरेगाव हद्दीतील उसाच्या शेतापर्यंत पोहोचली. आगीच्या भक्ष्यस्थानी उसाचे फडच्या फड शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर खाक झाले. उसाच्या फडातील काही ऊस तोडून आग रोखण्याचा प्रयत्न कोरेगावातील हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष कचरू ढेरंगे यांच्या पुढाकाराने काही शेतकऱ्यांनी केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या उसाचे फ ड व इतर पिके आगीच्या तडाख्यातून वाचवण्यात यश आले. दरम्यान, अग्निशमन यंत्रणा मात्र जळीत क्षेत्रापर्यंत पोहोचू शकलीच नाही. दरम्यान, घटनास्थळाची पाहणी व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वीजवाहिन्यांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळेच आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असले तरीही नेमकी आग उच्च दाब वाहिनीमुळे लागली, की कमी दाब क्षमतेच्या वाहिन्यांमुळे लागली, याचे निश्चित कारण शोधण्यात येत आहे; तसेच याबाबत विद्युत निरीक्षकांना जळिताची माहिती दिली असून विद्युत निरीक्षकांनी घटनास्थळी पाहणी करून दोषनिश्चिती केल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगितले. नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर व कोषाध्यक्ष भानुदास सरडे यांनी सांगितले. (वार्ताहर)