शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पुणे ते गोवा सायकल प्रवासातून पर्यावरणाचा संदेश;अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचा वापर वाढविण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 20:08 IST

१७ जणांनी एकत्र येत सायकलवरुन पुणे ते गोवा (कोस्टल मार्ग) असा ५५५ किमीचा प्रवास करतानाचा पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

पुणे : शालेय विद्यार्थी, डॉक्टर, बिल्डर, पोलीस निरीक्षक, माहिती तंत्रज्ञान तज्ञ, उद्योजक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या १७ जणांनी एकत्र येत सायकलवरुन पुणे ते गोवा (कोस्टल मार्ग) असा ५५५ किमीचा प्रवास करतानाचा पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. त्याचबरोबर सायकलसारख्या वाहनांचा वापर करुन अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. 

कोथरुड येथील अनुसंधा अ‍ॅडव्हेंचर या संस्थेने आयोजित केलेल्या सायकल सफरीत समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, त्यांचा मुलगा गौरांग ताम्हाणे, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या शल्य चिकित्सक स्वप्ना आठवले, उद्योजक अमोल व प्राची उपळेकर, चार्टर्ड अकाऊंटंट विजय अनपट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ डॉ. भीमाप्पा देसाई, अनिकेत जोशी, रणजित, सीमा ननवरे, प्रसाद खांडेकर, शिला नगरकर व त्यांचा मुलगा आकाश नगरकर, सुधा कानडे, निलाक्षी बक्षी या तीन बहिणी अशा विविध क्षेत्रातील सायकलपटूंनी हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. यात वय वर्षे १४ ते ५६ वर्षापर्यंतच्या वयोगटातील विविध क्षेत्रातील १७ सायकलपटू सहभागी झाले होते. 

पुण्यातून ६ डिसेंबर रोजी हा प्रवास सुरु झाला. रोज साधारण १०० पेक्षा अधिक किलोमीटर सायकल चालविणे. नंतर तिथेच एका गावात मुक्काम आणि दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे पुन्हा पुढचा मार्गक्रमण हा त्यांचा नित्य नियम झाला. पुणे - महाड -गुहागर - पावस - देवगड - मालवण - गोवा असा ५५५ प्रवास या गटाने ११ डिसेंबर रोजी पूर्ण केला.

आपल्या सायकल प्रवासात त्यांनी विविध ठिकाणी थांबून सायकल प्रवासाचे महत्व, पर्यावरण पुरकता तसेच दैनंदिन व्यायामाचे महत्व, इकोटुरिझम या गोष्टींचे सध्याच्या काळात असलेले महत्व स्थानिक लोकांपर्यंत पोहचविले. या सायकल प्रवासाविषयी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी सांगितले की, हा एक विलक्षण वेगळा अनुभव होता. या सायकल प्रवासासाठी गेल्या ४ महिन्यांपासून तयारी करीत होतो. या उपक्रमासाठी सुट्टी मिळावी, म्हणून दिवाळीत सुट्टी नको असे पोलीस उपायुक्त कविता नारनवरे यांना सांगितले होते. त्यांनीही तातडीने या उपक्रमासाठी सुट्टी मंजूर केली. त्यामुळेच हे शक्य झाले. 

गेल्या ४ महिन्यांपासून शनिवार, रविवार भोर, लवासासह शहरालगतच्या विविध घाटापर्यंत सायकल चालविण्याचा सराव करीत असे. या प्रवासातच चढाच्यावेळी कोणता गिअर वापरावा, उताराच्या वेळी कोणता गिअर वापरावा याचे मार्गदर्शन १४ वर्षाच्या मुलाकडून मिळाले. चढावर सायकल चालविताना मोठे कष्ट घ्यावे लागतात. तर उतार आल्यावर सायकल चालविण्याची मौज वेगळीच असते. जीवनातही तसेच आहे. जीवनात संघर्षाचे अनेक प्रंसग येतात. त्यातून निभावून जाण्यासाठी मोठी कष्ट करावे लागतात. मात्र चांगले दिवसही येत असतात़ त्याचा आनंद घ्यायचा असतो. जीवनाचे हे तत्वज्ञान सायकल प्रवासात मुलाच्याही मनावर बिंबविण्यात यश आले, याचा आनंदही मिळाला, असे विष्णु ताम्हाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण