शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

शिक्षणाने जातीयव्यवस्था नष्ट होते : मा. म. देशमुख; शिवजयंतीनिमित्त पुण्यात समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 3:50 PM

तरुणांनी महापुरुषांचे विचार स्वीकारून विचारनिष्ठ झाले पाहिजे. असंघटित समाज हा बळी जाणारा समाज आहे. त्यांना संघटीत केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. मा. म. देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देमा. म. देशमुख यांचा ‘शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार’ देऊन सन्मानसुनिता पाटील या धाडसी महिलेस स्मशानसेवेबद्दल ‘महाराणी ताराराणी पुरस्कार’

पुणे : शिक्षणाने जातीव्यवस्था नष्ट करता येते. त्यामुळे बहुजनांनी शिक्षणाचे महत्व ओळखले पाहिजे. उत्सव जल्लोषात करण्यापेक्षा वैचारिक प्रबोधन केले पाहिजे. तरुणांनी महापुरुषांचे विचार स्वीकारून विचारनिष्ठ झाले पाहिजे. असंघटित समाज हा बळी जाणारा समाज आहे. त्यांना संघटीत केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. मा. म. देशमुख यांनी केले. आम्ही शिवरायांचे वारकरी, आम्हाला काय कोणाची भीती, समाजाच्या उन्नतीसाठी लेखणी घेतली हाती अशी व्याख्या करत शिवजयंतीनिमित्त शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन आयोजित प्रकाशन व पुरस्कार समारंभात देशमुख बोलत होते.  यावेळी शिवकार्यात योगदान दिल्याबददल प्रा. मा. म. देशमुख यांना ‘शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार’ देऊन ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच नाशिकच्या सुनिता पाटील या धाडसी महिलेस स्मशानसेवेबद्दल ‘महाराणी ताराराणी पुरस्कार’ देण्यात आला. दोन्ही पुरस्कारार्थींना प्रत्येकी शाल, तुळशीचे रोप, सन्मानचिन्ह, ग्रंथ व र. रु. ५०००/- अशा स्वरूपात प्रदान करण्यात आले.देशमुख म्हणाले, की पद, पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागू नका. जे काही करायचे आहे ते प्रामाणिकपणे समाजासाठी करा. समाज तुम्हाला उंचीवर नेऊन ठेवेल.डॉ. बाबा आढाव म्हणाले, की भारतीय संविधान हे हत्यार बनले आहे. देशापुढे संविधान टिकविण्याशिवाय पर्याय नाही. विचारांना कृतीचा आकार देण्याचे काम करावे. शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शैलजा मोळक यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञेश मोळक यांनी सूत्रसंचालन केले तर कैलास वडघुले यांनी आभार मानले. 

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावShivjayantiशिवजयंतीPuneपुणे