शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

डी.एस.कुलकर्णींना 'घरघर' ! 124 मालमत्तांवर टाच, जप्तीची अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 10:21 IST

ठेवीदारांची फसवणूक केल्याने सध्या कारागृहात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांची मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना शासनाने जारी केली आहे.

पुणे -  ठेवीदारांची फसवणूक केल्याने सध्या कारागृहात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांची मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना शासनाने जारी केली आहे. त्यामुळे आता ठेवीदारांना त्यांच्या ठेवीचे पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडल्याचे पाहायला मिळत आहे. शासनाने प्रसिद्ध केलेल्या या अधिसूचनेत विविध ठिकाणी असलेल्या 124 जागा, विविध कंपनीच्या नावावरील तसेच वैयक्तिक अशी एकूण 276 बँक खाती आणि महागड्या आलिशान गाड्यांसह 46 दुचाकी व चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. 

डीएसके यांच्या पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष तसेच कंपन्यांच्या नावावर या जागा, बँक खाती आणि वाहने आहेत. डीएसके यांच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर, कोल्हापूर आणि मुंबई येथील पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे) संरक्षण अधिनियम १९९९ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करुन त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्या मालमत्तांची यादी पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने करुन पुढील कारवाईसाठी जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात आली होती. तत्कालिन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी याची जबाबदारी मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार करुन सुमारे तीन महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठवले होते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता ही अधिसूचना जाहीर झाली आहे.

पुढील प्रक्रिया कशी असेल?अधिसूचनेद्वारे शासनाने डीएसके यांची ही मालमत्ता आता जप्त केली आहे. यापुढे त्या प्रत्येक मालमत्तेचे मूल्य किती असेल, हे निश्चित केले जाईल. त्यानंतर तिचा लिलाव केला जाईल. जो अधिक बोली बोलेले, त्याच्या नावावर ही मालमत्ता होईल. या मालमत्ता तारण ठेवून डीएसके यांनी कर्ज घेतले असेल तर त्या बँका न्यायालयात अर्ज करुन आपला क्लेम मांडू शकतील. लिलावातून आलेल्या पैसे एका स्वतंत्र बँक खात्यात जमा केले जातील. त्यानंतर ठेवीदारांची यादी तयार करुन ती न्यायालयात सादर होईल. न्यायालय जो आदेश देईल, त्यानुसार त्याप्रमाणात ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील. ही प्रक्रीया खूप प्रदीर्घ असून त्याला वर्षाहून अधिक काळही लागू शकतो. शासकीय यंत्रणा किती वेगाने लिलाव सुरु करते. त्याला कसा व किती प्रतिसाद मिळतो. त्यानंतर न्यायालय किती लवकर यावर निर्णय देते, यावर ठेवीदारांना त्यांचे पैसे कधी मिळणार यावर ते अवलंबून आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस.कुलकर्णीCrimeगुन्हा