शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती भागातील दुष्काळ हटेना

By admin | Updated: September 13, 2016 01:22 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती भागाच्या नशिबी असणारी दुष्काळाची पीडा मागील पाच वर्षांपासून हटेना.

बारामती / मोरगाव : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाच्या नशिबी असणारी दुष्काळाची पीडा मागील पाच वर्षांपासून हटेना. पाण्याचे कायमच दुर्भिक्ष्य असणाऱ्या या परिसरात पुरंदर व जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना वाजत-गाजत आणल्या गेल्या. मात्र या सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने आजही या पसिरात पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. सध्या जनाई-शिरसाई योजनेतून सुपे परिसरात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सलग पाचव्या वर्षी जिरायती भागाला पावसाने हुलकावणी दिली. सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसाच्या भरवशावर येथील शेतकऱ्यांनी खरिपाच्या सुमारे ११ हजार हेक्टरवर पेरण्या केल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने बाजरी व चारापिकांचे क्षेत्र अधिक होते. मात्र मागील तीन महिन्यांपासून पावसाने या भागात तोंड दाखवले नाही. त्यामुळे खरीप हंगाम पुरता वाया गेला. यानंतर येणारा रब्बी हंगामदेखील शेतकऱ्यांना तारणार का, या चिंतेत सध्या येथील शेतकरी आहे. तालुक्याच्या पश्चिम भाग कायम दुष्काळी म्हणून प्रसिद्ध आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या जोगवडी, आंबी, मोरगाव, तरडोली, मुर्टी, मोराळवाडी, लोणी भापकर, सायबाचीवाडी, मोडवे, जळगाव, भिलारवाडी आदी गावे लाभक्षेत्रात येतात. मागील दोन वर्षांपूर्वी विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने या योजनेचे उद्घाटन केले. परंतु या योजनेचे पाणी तालुक्याच्या जिरायती भागात केवळ उद्घाटनापुरतेच, तर बहुतांश योजनेचे काम अपूर्णावस्थेत आहे. या भागातील गावांना टंचाई निवारण निधीतून या योजनेचे वीजबिल भरण्यासाठी जिरायती भाग पाणी परिषद व शेतकऱ्यांनी जनावरांसहित तरडोली येथे २ जुलै रोजी आंदोलन केले. मात्र तरीही येथील जनता शेतीसाठी पाणी पाणी करीत आहे. यामुळे जनतेच्या दु:खावर फुंकर मारण्यासाठी सहा गावांतील मूठभर लोकांसाठी पाणी सोडले जाणार आहे. खरीप तर गेलाच, पण रब्बीची पेर तरी या आशेवर शेतकरी आहेत. यासाठी शेतकरी नेहमीसारखी पुरंदर उपसा सिंचनच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. (वार्ताहर)